शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी हरली कोवळी मने हेलावली!

By admin | Updated: September 3, 2015 22:14 IST

नागरिक बघ्याच्या भूमिकेत : अपघातातील जखमीला केली नववी, दहावीच्या मुलांनी मदत

सातारा : बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर त्सुकतेपोटी नागरिक खमीभोवती गराडा घालत असतात; पण जखमीला वेळेत रुग्णालयात नेण्यासाठी कोणीही पुढे येत नसते, हे आपण अनेकदा पाहात असतो. परंतु एकीकडे समाजाची संवेदना बोथट होत चालली असताना दुसरीकडे मात्र सदर बझारमधील कोवळ्या मुलांनी जखमीला मदत करून जीवनदान दिले. रक्तबंबाळ झालेल्या जखमीला पाहून या कोवळ्या मुलांची मने हेलावली. मात्र, जाणत्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने येथे माणुसकी हरल्याचे पाहायला मिळाले.अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे प्रचंड वाढले आहे. काही अपघात चालकांच्या चुकीमुळे तर काही अपघात ओबडधोबड असलेल्या रस्त्यांमुळे होत असतात. अपघातामध्ये जखमी होणाऱ्याला तत्काळ मदत मिळाल्यास त्याचा जीव वाचतो; परंतु जखमीला वेळेत मदत मिळत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अपघातानंतर जखमींच्याभोवती केवळ गराडा घालून ‘फोटोसेशन’ केले जाते; परंतु त्याला मदत करण्यास कोणी पुढे धजावत नाही. काहीजण पोलिसांची कटकट नको तर काहीजण आपल्याला काय करायचाय, या मानसिकतेत असतात.मात्र या सगळ्या जर तर ला सदर बझारमधील नववी, दहावीतील चार कोवळी मुले याला अपवाद ठरल.किरण चंद्रकांत जगदाळे (वय १५), सौरभ प्रताप खरात (१४), देवेश महेश नलावडे (१४), अथर्व संजय दिवेकर (१४) ही मुले बुधवारी सायंकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे क्लासला निघाली होती. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीजवळून ही मुले चालत जात असताना समोर चालेल्या एका सायकलस्वाराला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सायकलस्वार पाच ते दहा फूट उडून रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यातून आणि हाता-पायातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्याचवेळी तेथून बरेच नागरिक चालत, तर काहीजण कार, दुचाकीवरून जात होते. हे सर्वजण त्या जखमीभोवती थांबले; परंतु त्याला मदत करण्यासाठी कोणी पुढे आले नाही. सुमारे दहा मिनिटे तो जखमी रस्त्यावर विवळत पडला होता. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या या कोवळ्या मुलांनी त्या जखमीला उठवून उभे केले. दप्तराच्या कप्प्यात अडकविलेली वॉटर बॅग काढून त्याला पाणी पाजले. त्यानंतर त्यांनी १०८ ला फोन करून रुग्णावाहिकाही बोलावली. या मुलांची ही गडबड सुरू असताना जाणती माणसं मात्र बघ्याच्या भूमिकेत होती. (प्रतिनिधी)कोवळ्या मुलांचा आदर्श घ्या !जखमींना वेळेत मदत मिळाली तर शंभर टक्के त्यांचा जीव वाचतो. यासंदर्भात शासनाकडून जनजागृती केली जात आहे. परंतु अद्यापही लोकांमध्ये संवेदना जाग्या झाल्या नाहीत. या कोवळ्यामुलांनी एक जीव वाचवून कुटुंबाचा आधारवड जपला. हाच आदर्श इतरांनीही घ्यावा.