शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

माणुसकी हरली कोवळी मने हेलावली!

By admin | Updated: September 3, 2015 22:14 IST

नागरिक बघ्याच्या भूमिकेत : अपघातातील जखमीला केली नववी, दहावीच्या मुलांनी मदत

सातारा : बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर त्सुकतेपोटी नागरिक खमीभोवती गराडा घालत असतात; पण जखमीला वेळेत रुग्णालयात नेण्यासाठी कोणीही पुढे येत नसते, हे आपण अनेकदा पाहात असतो. परंतु एकीकडे समाजाची संवेदना बोथट होत चालली असताना दुसरीकडे मात्र सदर बझारमधील कोवळ्या मुलांनी जखमीला मदत करून जीवनदान दिले. रक्तबंबाळ झालेल्या जखमीला पाहून या कोवळ्या मुलांची मने हेलावली. मात्र, जाणत्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने येथे माणुसकी हरल्याचे पाहायला मिळाले.अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे प्रचंड वाढले आहे. काही अपघात चालकांच्या चुकीमुळे तर काही अपघात ओबडधोबड असलेल्या रस्त्यांमुळे होत असतात. अपघातामध्ये जखमी होणाऱ्याला तत्काळ मदत मिळाल्यास त्याचा जीव वाचतो; परंतु जखमीला वेळेत मदत मिळत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अपघातानंतर जखमींच्याभोवती केवळ गराडा घालून ‘फोटोसेशन’ केले जाते; परंतु त्याला मदत करण्यास कोणी पुढे धजावत नाही. काहीजण पोलिसांची कटकट नको तर काहीजण आपल्याला काय करायचाय, या मानसिकतेत असतात.मात्र या सगळ्या जर तर ला सदर बझारमधील नववी, दहावीतील चार कोवळी मुले याला अपवाद ठरल.किरण चंद्रकांत जगदाळे (वय १५), सौरभ प्रताप खरात (१४), देवेश महेश नलावडे (१४), अथर्व संजय दिवेकर (१४) ही मुले बुधवारी सायंकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे क्लासला निघाली होती. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीजवळून ही मुले चालत जात असताना समोर चालेल्या एका सायकलस्वाराला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सायकलस्वार पाच ते दहा फूट उडून रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यातून आणि हाता-पायातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्याचवेळी तेथून बरेच नागरिक चालत, तर काहीजण कार, दुचाकीवरून जात होते. हे सर्वजण त्या जखमीभोवती थांबले; परंतु त्याला मदत करण्यासाठी कोणी पुढे आले नाही. सुमारे दहा मिनिटे तो जखमी रस्त्यावर विवळत पडला होता. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या या कोवळ्या मुलांनी त्या जखमीला उठवून उभे केले. दप्तराच्या कप्प्यात अडकविलेली वॉटर बॅग काढून त्याला पाणी पाजले. त्यानंतर त्यांनी १०८ ला फोन करून रुग्णावाहिकाही बोलावली. या मुलांची ही गडबड सुरू असताना जाणती माणसं मात्र बघ्याच्या भूमिकेत होती. (प्रतिनिधी)कोवळ्या मुलांचा आदर्श घ्या !जखमींना वेळेत मदत मिळाली तर शंभर टक्के त्यांचा जीव वाचतो. यासंदर्भात शासनाकडून जनजागृती केली जात आहे. परंतु अद्यापही लोकांमध्ये संवेदना जाग्या झाल्या नाहीत. या कोवळ्यामुलांनी एक जीव वाचवून कुटुंबाचा आधारवड जपला. हाच आदर्श इतरांनीही घ्यावा.