शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

अस्मानी पुरावर, माणुसकी ठरली वरचढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:34 IST

वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात दुर्गम ठिकाणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवरुखवाडीवर अस्मानी संकट कोसळले; पण या अस्मानी संकटावर माणुसकीचा ...

वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात दुर्गम ठिकाणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवरुखवाडीवर अस्मानी संकट कोसळले; पण या अस्मानी संकटावर माणुसकीचा मदत रुपाने आलेला पूर वरचढ ठरला. दुर्घटनाग्रस्त देवरुखवाडीच्या मदतीला वाईकर, अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात दिला.

गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरसह वाई तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता. वाईच्या पश्चिम भागात पावसामुळे हाहाकार माजला. अनेक ठिकाणी पूल वाहून गेल्याने दळणवळणाला मोठी अडचणी येत होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गोळेवाडी येथे भूस्खलन झाले, जोर येथे मायलेक पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्घटना घडली.

देवरुखवाडी-कोंढावळे (ता. वाई) येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अतिवृष्टीमुळे डोंगरावर भूस्खलन होऊन दगड, माती पाण्याच्या मिश्रणाचा मोठा प्रवाह २५ घरांची वस्ती असणाऱ्या देवरुखवाडीच्या दिशेने जोरदार वेगाने आला. दुर्दैवाने यात दोन मायलेकींचा मृत्यू झाला. सात घरे पूर्णपणे गाडली गेल्याने पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाली.

या नागरिकांचे दुःख हलके करण्यासाठी वाई तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. त्यांनी प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलेल्या पंचवीस कुटुंबांना अन्न, धान्य, किराणा माल, ब्लँकेट, जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी साहित्य दिले. यामध्ये सर्योदय सेवा ट्रस्ट, रोटरी क्लब, आरपीआय युवा आघाडी, कृष्णा सेवा कार्य समिती, यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वाई तालुका प्राथमिक शिक्षक, काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट, मानवता सेवा संघ यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली असून, मुंबईकर मित्र समूहाच्यावतीनेही मोठ्या प्रमाणावर मदत केली जाणार आहे. अस्मानी पुरावर, माणुसकीचा पूर वरचढ ठरला, असेच म्हणावे लागेल.

चौकट :-

जोर, गोळेवाडी अजूनही मदतीपासून वंचित...

मुसळधार पावसामुळे बोरगाव परिसरातील मुख्य रस्त्यावरील तीन पूल व जोर गोळेवाडी परिसरातील सहा पूल वाहून गेले आहेत. जोरला भूस्खलन होऊन तीन घरांचे नुकसान झाले व पुरात मायलेक वाहून गेले आहेत. गोळेवाडीलाही काही घरांचे नुकसान झाले; परंतु दळणवळण व्यवस्था कोलमडल्यामुळे अजून तेथील नागरिक मदतीपासून वंचित आहेत. दरम्यान, या दुर्गम भागात त्वरित मदत करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून नागरिक करत आहेत.

चौकट :-

सामाजिक संस्थांचे दातृत्व...

देवरुखवाडीवर आलेले संकट वाईच्या पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत असूनही या अतिवृष्टीवर माणुसकी वरचढ ठरली. अनेकांच्या घरावर मातीचे ढिगारे तर इतर नागरिकांना कापड्यानिशी बाहेर पडल्याने अडचण झाली होती. यावेळी रोटरी क्लब, वाई यांनी ७० नागरिकांच्या जेवणाची सोय केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मानवता सेवा संस्थेच्यावतीने किराणा व धान्य देण्यात आले. त्याबद्दलही नागरिकांनी समाधान व्यक्त केले.