शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

अस्मानी पुरावर, माणुसकी ठरली वरचढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:34 IST

वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात दुर्गम ठिकाणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवरुखवाडीवर अस्मानी संकट कोसळले; पण या अस्मानी संकटावर माणुसकीचा ...

वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात दुर्गम ठिकाणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवरुखवाडीवर अस्मानी संकट कोसळले; पण या अस्मानी संकटावर माणुसकीचा मदत रुपाने आलेला पूर वरचढ ठरला. दुर्घटनाग्रस्त देवरुखवाडीच्या मदतीला वाईकर, अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात दिला.

गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरसह वाई तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता. वाईच्या पश्चिम भागात पावसामुळे हाहाकार माजला. अनेक ठिकाणी पूल वाहून गेल्याने दळणवळणाला मोठी अडचणी येत होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गोळेवाडी येथे भूस्खलन झाले, जोर येथे मायलेक पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्घटना घडली.

देवरुखवाडी-कोंढावळे (ता. वाई) येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अतिवृष्टीमुळे डोंगरावर भूस्खलन होऊन दगड, माती पाण्याच्या मिश्रणाचा मोठा प्रवाह २५ घरांची वस्ती असणाऱ्या देवरुखवाडीच्या दिशेने जोरदार वेगाने आला. दुर्दैवाने यात दोन मायलेकींचा मृत्यू झाला. सात घरे पूर्णपणे गाडली गेल्याने पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाली.

या नागरिकांचे दुःख हलके करण्यासाठी वाई तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. त्यांनी प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलेल्या पंचवीस कुटुंबांना अन्न, धान्य, किराणा माल, ब्लँकेट, जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी साहित्य दिले. यामध्ये सर्योदय सेवा ट्रस्ट, रोटरी क्लब, आरपीआय युवा आघाडी, कृष्णा सेवा कार्य समिती, यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वाई तालुका प्राथमिक शिक्षक, काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट, मानवता सेवा संघ यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली असून, मुंबईकर मित्र समूहाच्यावतीनेही मोठ्या प्रमाणावर मदत केली जाणार आहे. अस्मानी पुरावर, माणुसकीचा पूर वरचढ ठरला, असेच म्हणावे लागेल.

चौकट :-

जोर, गोळेवाडी अजूनही मदतीपासून वंचित...

मुसळधार पावसामुळे बोरगाव परिसरातील मुख्य रस्त्यावरील तीन पूल व जोर गोळेवाडी परिसरातील सहा पूल वाहून गेले आहेत. जोरला भूस्खलन होऊन तीन घरांचे नुकसान झाले व पुरात मायलेक वाहून गेले आहेत. गोळेवाडीलाही काही घरांचे नुकसान झाले; परंतु दळणवळण व्यवस्था कोलमडल्यामुळे अजून तेथील नागरिक मदतीपासून वंचित आहेत. दरम्यान, या दुर्गम भागात त्वरित मदत करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून नागरिक करत आहेत.

चौकट :-

सामाजिक संस्थांचे दातृत्व...

देवरुखवाडीवर आलेले संकट वाईच्या पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत असूनही या अतिवृष्टीवर माणुसकी वरचढ ठरली. अनेकांच्या घरावर मातीचे ढिगारे तर इतर नागरिकांना कापड्यानिशी बाहेर पडल्याने अडचण झाली होती. यावेळी रोटरी क्लब, वाई यांनी ७० नागरिकांच्या जेवणाची सोय केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मानवता सेवा संस्थेच्यावतीने किराणा व धान्य देण्यात आले. त्याबद्दलही नागरिकांनी समाधान व्यक्त केले.