शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धरणे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे?

By admin | Updated: August 30, 2015 21:55 IST

चंद्रकांत पाटील : पिंपोडे बुद्रुक येथील बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी आघाडी सरकारवर घणाघात

वाठारस्टेशन : ‘आघाडी सरकारच्या कृतिशून्य कारभारामुळे सध्याची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वर्षे सत्ता असूनही धरणांची कामे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत कुठलाही स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी मिळावी, असे म्हणणार नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पाणी मिळवून देऊन स्वत:च्या पायावर उभे करू.’ असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील वसना नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे जलपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ, रा. स्व. संघांचे जिल्हा संघटक डॉ. सुभाष बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील म्हणाले, शेतकरी हा साखर कारखान्यांचा गुलाम होता; पण युती शासन सत्तेवर येताच १९९५ मध्ये शेतकऱ्याच्या पायातील बेडी काढून साखर उद्योगावरील झोनबंदी उठवण्याचा धाडसी निर्णय युती शासनाने घेतला. चालूवर्षी उद्योग अडचणीत आल्यानंतर ८७० कोटींचा साखर कारखान्यांचा खरेदीकर माफ केला. केंद्र सरकारचे ४ हजार व राज्य सरकारचे १ हजार असे ५ हजार कोटींचे अनुदान प्रतिटन निर्यातीसाठी दिले. ६५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज कारखान्यांना देऊन शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्याचा प्रयत्न केला. आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लावून कायमस्वरूपी अपंग करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही स्वाभिमानी शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी, असे वाटणार नाही. यासाठी २५ हजार कोटींची तरतूद फक्त शेतकऱ्यांसाठी करणार आहोत. यातील साडेसतरा हजार कोटी हे सोलर कृषिपंपासाठी खर्च करणार आहोत.’जिल्हाधिकारी म्हणाले, पूर्वीच्या कामांची दुरुस्ती केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत दर्जेदार कामे साकारता येतील, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.’ यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, डॉ. अविनाश पोळ, माजी सरपंच विकास साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.विजयराव पंडित यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास बाळासाहेब दामले, जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, छत्रपती संभाजी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे, सुरेशराव साळुंखे, राजेश निकम, लालासाहेब निकम, सूर्यकांत निकम, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)पाच वर्षांत ३० हजार गावे जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट ‘चालूवर्षी राज्यातील साडेसहा हजार गावे जलयुक्त शिवार अभियानात घेतली. यात सातारा जिल्ह्यातील २१५ गावांचा समावेश आहे. ३,१०२ कामांपैकी यंदा २००० कामे पूर्ण झाली आहेत. येत्या पाच वर्षांत राज्यात ३० हजार गावे जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवले असून, एकही गाव ‘जलयुक्त’मधून वंचित राहणार नाही,’ असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले ‘शेतकऱ्याला २४ तास वीज उपलब्ध होईल. तसेच वीजबिलाचा प्रश्नही राहणार नाही. हे सोलर पंप कमी व्याजदरात व ६० टक्के राज्यशासन अनुदानावर वितरित करणार आहे. यामुळे आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी न देता स्वाभिमानी बनविण्याचे काम आगामी पाच वर्षांत करणार आहोत.’