शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

धरणे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे?

By admin | Updated: August 30, 2015 21:55 IST

चंद्रकांत पाटील : पिंपोडे बुद्रुक येथील बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी आघाडी सरकारवर घणाघात

वाठारस्टेशन : ‘आघाडी सरकारच्या कृतिशून्य कारभारामुळे सध्याची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वर्षे सत्ता असूनही धरणांची कामे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत कुठलाही स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी मिळावी, असे म्हणणार नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पाणी मिळवून देऊन स्वत:च्या पायावर उभे करू.’ असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील वसना नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे जलपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ, रा. स्व. संघांचे जिल्हा संघटक डॉ. सुभाष बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील म्हणाले, शेतकरी हा साखर कारखान्यांचा गुलाम होता; पण युती शासन सत्तेवर येताच १९९५ मध्ये शेतकऱ्याच्या पायातील बेडी काढून साखर उद्योगावरील झोनबंदी उठवण्याचा धाडसी निर्णय युती शासनाने घेतला. चालूवर्षी उद्योग अडचणीत आल्यानंतर ८७० कोटींचा साखर कारखान्यांचा खरेदीकर माफ केला. केंद्र सरकारचे ४ हजार व राज्य सरकारचे १ हजार असे ५ हजार कोटींचे अनुदान प्रतिटन निर्यातीसाठी दिले. ६५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज कारखान्यांना देऊन शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्याचा प्रयत्न केला. आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लावून कायमस्वरूपी अपंग करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही स्वाभिमानी शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी, असे वाटणार नाही. यासाठी २५ हजार कोटींची तरतूद फक्त शेतकऱ्यांसाठी करणार आहोत. यातील साडेसतरा हजार कोटी हे सोलर कृषिपंपासाठी खर्च करणार आहोत.’जिल्हाधिकारी म्हणाले, पूर्वीच्या कामांची दुरुस्ती केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत दर्जेदार कामे साकारता येतील, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.’ यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, डॉ. अविनाश पोळ, माजी सरपंच विकास साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.विजयराव पंडित यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास बाळासाहेब दामले, जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, छत्रपती संभाजी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे, सुरेशराव साळुंखे, राजेश निकम, लालासाहेब निकम, सूर्यकांत निकम, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)पाच वर्षांत ३० हजार गावे जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट ‘चालूवर्षी राज्यातील साडेसहा हजार गावे जलयुक्त शिवार अभियानात घेतली. यात सातारा जिल्ह्यातील २१५ गावांचा समावेश आहे. ३,१०२ कामांपैकी यंदा २००० कामे पूर्ण झाली आहेत. येत्या पाच वर्षांत राज्यात ३० हजार गावे जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवले असून, एकही गाव ‘जलयुक्त’मधून वंचित राहणार नाही,’ असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले ‘शेतकऱ्याला २४ तास वीज उपलब्ध होईल. तसेच वीजबिलाचा प्रश्नही राहणार नाही. हे सोलर पंप कमी व्याजदरात व ६० टक्के राज्यशासन अनुदानावर वितरित करणार आहे. यामुळे आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी न देता स्वाभिमानी बनविण्याचे काम आगामी पाच वर्षांत करणार आहोत.’