शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

धरणे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे?

By admin | Updated: August 30, 2015 21:55 IST

चंद्रकांत पाटील : पिंपोडे बुद्रुक येथील बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी आघाडी सरकारवर घणाघात

वाठारस्टेशन : ‘आघाडी सरकारच्या कृतिशून्य कारभारामुळे सध्याची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वर्षे सत्ता असूनही धरणांची कामे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत कुठलाही स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी मिळावी, असे म्हणणार नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पाणी मिळवून देऊन स्वत:च्या पायावर उभे करू.’ असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील वसना नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे जलपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ, रा. स्व. संघांचे जिल्हा संघटक डॉ. सुभाष बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील म्हणाले, शेतकरी हा साखर कारखान्यांचा गुलाम होता; पण युती शासन सत्तेवर येताच १९९५ मध्ये शेतकऱ्याच्या पायातील बेडी काढून साखर उद्योगावरील झोनबंदी उठवण्याचा धाडसी निर्णय युती शासनाने घेतला. चालूवर्षी उद्योग अडचणीत आल्यानंतर ८७० कोटींचा साखर कारखान्यांचा खरेदीकर माफ केला. केंद्र सरकारचे ४ हजार व राज्य सरकारचे १ हजार असे ५ हजार कोटींचे अनुदान प्रतिटन निर्यातीसाठी दिले. ६५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज कारखान्यांना देऊन शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्याचा प्रयत्न केला. आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लावून कायमस्वरूपी अपंग करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही स्वाभिमानी शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी, असे वाटणार नाही. यासाठी २५ हजार कोटींची तरतूद फक्त शेतकऱ्यांसाठी करणार आहोत. यातील साडेसतरा हजार कोटी हे सोलर कृषिपंपासाठी खर्च करणार आहोत.’जिल्हाधिकारी म्हणाले, पूर्वीच्या कामांची दुरुस्ती केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत दर्जेदार कामे साकारता येतील, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.’ यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, डॉ. अविनाश पोळ, माजी सरपंच विकास साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.विजयराव पंडित यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास बाळासाहेब दामले, जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, छत्रपती संभाजी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे, सुरेशराव साळुंखे, राजेश निकम, लालासाहेब निकम, सूर्यकांत निकम, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)पाच वर्षांत ३० हजार गावे जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट ‘चालूवर्षी राज्यातील साडेसहा हजार गावे जलयुक्त शिवार अभियानात घेतली. यात सातारा जिल्ह्यातील २१५ गावांचा समावेश आहे. ३,१०२ कामांपैकी यंदा २००० कामे पूर्ण झाली आहेत. येत्या पाच वर्षांत राज्यात ३० हजार गावे जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवले असून, एकही गाव ‘जलयुक्त’मधून वंचित राहणार नाही,’ असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले ‘शेतकऱ्याला २४ तास वीज उपलब्ध होईल. तसेच वीजबिलाचा प्रश्नही राहणार नाही. हे सोलर पंप कमी व्याजदरात व ६० टक्के राज्यशासन अनुदानावर वितरित करणार आहे. यामुळे आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी न देता स्वाभिमानी बनविण्याचे काम आगामी पाच वर्षांत करणार आहोत.’