शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

लॉकडाऊनमुळे पावसाळ्यातील धान्यसाठा कसा भरायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST

बामणोली : जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी ...

बामणोली : जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणाऱ्या लोकांना तसेच नदीपलीकडील अनेक गावच्या लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. अशावेळी येथील लोक मे महिन्यातच चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा करून ठेवतात. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने हे काम थांबले आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने अतिपावसाचे असतात. मान्सून पाऊस सुरू झाला की दळणवळण व संपर्क यंत्रणा ठप्प होतात. जावली तालुक्यातील देऊर, वेळे, तळदेव मायणी, कारगाव तसेच नदीपलीकडील आडोशी, कुसापूर शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील पर्वत, चकदेव, कांदाट अशी गावे अतिदुर्गम आहेत. गावांसह डोंगरावर राहणाऱ्या अनेक गावांतील लोकांना वाहतुकीसाठी असणारा कच्चा रस्ता पावसात बंद असतो. याठिकाणचे लोक साखर, मीठ, कांदे, बटाटे, खते भिजून खराब होणाऱ्या वस्तूंसह धान्य, डाळी, कपडे याखेरीज पुरेशा रोख रकमेचीही तजवीज पावसाळ्यापूर्वीच करून ठेवतात. परंतु यावर्षी कडक लॉकडाऊन असल्याने बाजारपेठच बंद आहे. त्यामुळे अन्नधान्य साठा कसा करायचा, हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पावसाळ्यात सलग चार महिने संततधार पाऊस कोसळत असतो. पावसाळ्यात घरांना गळती लागू नये म्हणून येथील कौलारू तसेच मातीची असणारी घरे नागरिक प्लास्टिक कागद तसेच कोळंबाने शेकारतात. गवतामुळे घरात पावसाचे पाणीही येत नाही.उबदारपणा टिकून राहण्यास मदत होते. परिसरातील लोकांना पावसाळ्यात वेगवेगळ्या रानभाज्या डोंगरातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यांचाही आस्वाद ग्रामस्थ मनसोक्त घेतात.

चौकट

पोटमाळ्यावर जनावरांची वैरण अन् सरपण

तापोळा, बामणोली विभागातील अनेक गावे उंच, दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेली आहेत. या ठिकाणी दाट धुके व संततधार पाऊस असतो. पाळीव जनावरांसाठीचा कोरडा चारा घरातील पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला असतो. तसेच स्वयंपासाठीची जळावू लाकडेही घरातील पोटमाळ्यावर किंवा एका स्वतंत्र खोलीत साठा करून ठेवली जातात. स्वयंपाकासाठी याचा उपयोग होतो, अशी माहिती लामज येथील शिवराम चव्हाण यांनी दिली.

कोट

तळदेव मायणी गाव ठोसेघर पठारापलीकडे दुर्गम ठिकाणी वसले आहे. पावसाळ्याचा धान्यसाठा ग्रामस्थांनी सातारा येथे खरेदी करून ठोसेघर पठारापर्यंत वाहतूक करून तेथून डोंगरातून दीड तास डोक्यावरून नेऊन आपल्या घरापर्यंत नेला आहे. दरवर्षी अशीच कसरत करावी लागते. पावसाळ्यात कोण आजारी पडले तर गावकऱ्यांना डोली बनवून डोक्यावरून ठोसेघर पठारापर्यंत धुकके-वादळ- पावसातून न्यावे लागते.

- पांडुरंग पवार, ग्रामस्थ, तळदेव मायणी.