शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

लॉकडाऊनमुळे पावसाळ्यातील धान्यसाठा कसा भरायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST

बामणोली : जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी ...

बामणोली : जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणाऱ्या लोकांना तसेच नदीपलीकडील अनेक गावच्या लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. अशावेळी येथील लोक मे महिन्यातच चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा करून ठेवतात. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने हे काम थांबले आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने अतिपावसाचे असतात. मान्सून पाऊस सुरू झाला की दळणवळण व संपर्क यंत्रणा ठप्प होतात. जावली तालुक्यातील देऊर, वेळे, तळदेव मायणी, कारगाव तसेच नदीपलीकडील आडोशी, कुसापूर शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील पर्वत, चकदेव, कांदाट अशी गावे अतिदुर्गम आहेत. गावांसह डोंगरावर राहणाऱ्या अनेक गावांतील लोकांना वाहतुकीसाठी असणारा कच्चा रस्ता पावसात बंद असतो. याठिकाणचे लोक साखर, मीठ, कांदे, बटाटे, खते भिजून खराब होणाऱ्या वस्तूंसह धान्य, डाळी, कपडे याखेरीज पुरेशा रोख रकमेचीही तजवीज पावसाळ्यापूर्वीच करून ठेवतात. परंतु यावर्षी कडक लॉकडाऊन असल्याने बाजारपेठच बंद आहे. त्यामुळे अन्नधान्य साठा कसा करायचा, हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पावसाळ्यात सलग चार महिने संततधार पाऊस कोसळत असतो. पावसाळ्यात घरांना गळती लागू नये म्हणून येथील कौलारू तसेच मातीची असणारी घरे नागरिक प्लास्टिक कागद तसेच कोळंबाने शेकारतात. गवतामुळे घरात पावसाचे पाणीही येत नाही.उबदारपणा टिकून राहण्यास मदत होते. परिसरातील लोकांना पावसाळ्यात वेगवेगळ्या रानभाज्या डोंगरातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यांचाही आस्वाद ग्रामस्थ मनसोक्त घेतात.

चौकट

पोटमाळ्यावर जनावरांची वैरण अन् सरपण

तापोळा, बामणोली विभागातील अनेक गावे उंच, दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेली आहेत. या ठिकाणी दाट धुके व संततधार पाऊस असतो. पाळीव जनावरांसाठीचा कोरडा चारा घरातील पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला असतो. तसेच स्वयंपासाठीची जळावू लाकडेही घरातील पोटमाळ्यावर किंवा एका स्वतंत्र खोलीत साठा करून ठेवली जातात. स्वयंपाकासाठी याचा उपयोग होतो, अशी माहिती लामज येथील शिवराम चव्हाण यांनी दिली.

कोट

तळदेव मायणी गाव ठोसेघर पठारापलीकडे दुर्गम ठिकाणी वसले आहे. पावसाळ्याचा धान्यसाठा ग्रामस्थांनी सातारा येथे खरेदी करून ठोसेघर पठारापर्यंत वाहतूक करून तेथून डोंगरातून दीड तास डोक्यावरून नेऊन आपल्या घरापर्यंत नेला आहे. दरवर्षी अशीच कसरत करावी लागते. पावसाळ्यात कोण आजारी पडले तर गावकऱ्यांना डोली बनवून डोक्यावरून ठोसेघर पठारापर्यंत धुकके-वादळ- पावसातून न्यावे लागते.

- पांडुरंग पवार, ग्रामस्थ, तळदेव मायणी.