शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे पावसाळ्यातील धान्यसाठा कसा भरायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST

बामणोली : जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी ...

बामणोली : जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणाऱ्या लोकांना तसेच नदीपलीकडील अनेक गावच्या लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. अशावेळी येथील लोक मे महिन्यातच चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा करून ठेवतात. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने हे काम थांबले आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने अतिपावसाचे असतात. मान्सून पाऊस सुरू झाला की दळणवळण व संपर्क यंत्रणा ठप्प होतात. जावली तालुक्यातील देऊर, वेळे, तळदेव मायणी, कारगाव तसेच नदीपलीकडील आडोशी, कुसापूर शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील पर्वत, चकदेव, कांदाट अशी गावे अतिदुर्गम आहेत. गावांसह डोंगरावर राहणाऱ्या अनेक गावांतील लोकांना वाहतुकीसाठी असणारा कच्चा रस्ता पावसात बंद असतो. याठिकाणचे लोक साखर, मीठ, कांदे, बटाटे, खते भिजून खराब होणाऱ्या वस्तूंसह धान्य, डाळी, कपडे याखेरीज पुरेशा रोख रकमेचीही तजवीज पावसाळ्यापूर्वीच करून ठेवतात. परंतु यावर्षी कडक लॉकडाऊन असल्याने बाजारपेठच बंद आहे. त्यामुळे अन्नधान्य साठा कसा करायचा, हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पावसाळ्यात सलग चार महिने संततधार पाऊस कोसळत असतो. पावसाळ्यात घरांना गळती लागू नये म्हणून येथील कौलारू तसेच मातीची असणारी घरे नागरिक प्लास्टिक कागद तसेच कोळंबाने शेकारतात. गवतामुळे घरात पावसाचे पाणीही येत नाही.उबदारपणा टिकून राहण्यास मदत होते. परिसरातील लोकांना पावसाळ्यात वेगवेगळ्या रानभाज्या डोंगरातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यांचाही आस्वाद ग्रामस्थ मनसोक्त घेतात.

चौकट

पोटमाळ्यावर जनावरांची वैरण अन् सरपण

तापोळा, बामणोली विभागातील अनेक गावे उंच, दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेली आहेत. या ठिकाणी दाट धुके व संततधार पाऊस असतो. पाळीव जनावरांसाठीचा कोरडा चारा घरातील पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला असतो. तसेच स्वयंपासाठीची जळावू लाकडेही घरातील पोटमाळ्यावर किंवा एका स्वतंत्र खोलीत साठा करून ठेवली जातात. स्वयंपाकासाठी याचा उपयोग होतो, अशी माहिती लामज येथील शिवराम चव्हाण यांनी दिली.

कोट

तळदेव मायणी गाव ठोसेघर पठारापलीकडे दुर्गम ठिकाणी वसले आहे. पावसाळ्याचा धान्यसाठा ग्रामस्थांनी सातारा येथे खरेदी करून ठोसेघर पठारापर्यंत वाहतूक करून तेथून डोंगरातून दीड तास डोक्यावरून नेऊन आपल्या घरापर्यंत नेला आहे. दरवर्षी अशीच कसरत करावी लागते. पावसाळ्यात कोण आजारी पडले तर गावकऱ्यांना डोली बनवून डोक्यावरून ठोसेघर पठारापर्यंत धुकके-वादळ- पावसातून न्यावे लागते.

- पांडुरंग पवार, ग्रामस्थ, तळदेव मायणी.