शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

पाऊस किती पडला; खरं सांगणार का?

By admin | Updated: June 11, 2016 00:51 IST

पर्जन्यमापकाच्या नोंदीवर प्रश्नचिन्ह : चुकीच्या नोंदी झाल्यास शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित; कऱ्हाड, पाटणला अनेक ठिकाणची यंत्रे अडगळीत

संजय पाटील --कऱ्हाड  पाऊस कधी पडेल, याचा अंदाज वर्तविता येतो; पण किती पडेल हे निश्चित सांगणं कठीण. प्रत्येक तालुक्याचा महसूल विभाग चोवीस तासात पडलेला पाऊस मोजतो. त्याची मंडलनिहाय आकडेवारीही जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवतो. मात्र, या आकडेवारीवरही विश्वास ठेवणं सध्या मुश्कील होतय. पर्जन्यमापक यंत्रच खोटं बोलत असल्याने मंडलनिहाय पडलेला पाऊस खरा मानायचा का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणत्या विभागात किती पाऊस झाला, याची माहिती असणे आवश्यक असते. हेच गृहीत धरून ठिकठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आली आहेत. ही यंत्र बसविताना मंडलनिहाय जागेची निश्चिती करण्यात येते. मंडलाच्या गावात पर्जन्यमापक बसविल्यानंतर दररोज या यंत्राद्वारे पावसाची नोंद घेतली जाते. हे काम त्या मंडलातील तलाठ्यांकडे असते. पर्जन्यमापक बसविण्यासाठी अनेक नियम आहेत. या निकषानुसार यंत्र बसविल्यास पावसाची अचूक नोंद घेता येणे शक्य असते. मात्र, सध्या निकषाकडे दुर्लक्ष करून यंत्र बसविण्यात आल्याने पावसाची नोंद अचूक असते का, असा प्रश्न निर्माण होतो. अनेक ठिकाणची यंत्र उंच जागेवर बसविण्यात आलेली नाहीत. तसेच यंत्राच्या परिसरात मोठ्या इमारती किंवा विस्तीर्ण वृक्ष आढळतात. परिणामी, पाऊस अडण्याची व चुकीची नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात नोंद घेण्यासाठी महसूल कर्मचारी दररोज त्या यंत्राची पाहणी करतात. मात्र, पावसाळा संपल्यानंतर सात ते आठ महिने त्या यंत्राकडे पाहिलेही जात नाही. त्याची देखभाल, दुरुस्तीही केली जात नाही. परिणामी, पावसाळ्यात नोंदविला जाणार पाऊस अचूक असेलच, हे निश्चित सांगणे कठीण आहे. खरिपाचे नियोजन पावसावर अवलंबून असते. पावसाची शक्यता गृहीत धरूनच शेतकरी पेरणी व टोकणीची कामे घेतात. तसेच चोवीस तासात पडलेल्या पावसावरच आपत्ती व्यवस्थापनाचे काम चालते. मात्र, पर्जन्यमापकाद्वारे मोजल्या जाणाऱ्या पावसाची नोंदच संशयाच्या भोवऱ्यात असल्याने व्यवस्थपन कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...अशा होतात नोंदीचोवीस तासामध्ये कोणत्या मंडलात किती पाऊस पडला, याचे दररोज सकाळी मोजमाप होते. पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या मंडलातील तलाठी त्या नोंदी घेण्याचे काम करतात. घेतलेली नोंद पुढे तहसील कार्यालयाला कळविली जाते. तहसील कार्यालयातून तालुक्यातील सर्व नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविल्या जातात. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन नोंदींचा अभ्यास करून व्यवस्थापनाच्या दृष्टीने पावले उचलते. तलाठ्यांचा भरवसा दुसऱ्यावर!पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या गावात जाऊन तेथील पावसाची नोंद घेण्याचे काम तलाठ्यांकडे असते. मात्र, काही ठिकाणी अशा नोंदी घेण्याचे काम दुसरेच करीत असल्याचे दिसते. तलाठी त्या गावाकडे फिरकतही नाहीत. कोणाला तरी सांगून त्या नोंदी तलाठी स्वत:कडे घेतात व पुढे तहसील कार्यालयाला कळवतात, असे दिसून येते. त्यामुळे नोंदीत चुका होण्याची दाट शक्यता आहे. पर्जन्यमापकाचे तीन प्रकारपाऊस मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला पर्जन्यमापक म्हटले जाते. साधा अथवा विनास्वयंचलित पर्जन्यमापक, स्वयंचलित पर्जन्यमापक व स्वयंचलित वेधशाळेतहज पर्जन्यमापक असे पर्जन्यमापकाचे तीन प्रकार आहेत.पर्जन्यमापक बसविण्याची पद्धतपर्जन्यमापक बसविण्यासाठी त्या भागातील किंवा गावातील भौगोलिकदृष्ट्या प्रातिनिधीक स्वरूपाची जागा निवडण्यात येते. पर्जन्यमापक ठिकाणाकडे जाण्यासाठी पावसाळ्यात अडचण येणार नाही आणि रस्ता असणारी जागा निवडली जाते.संबंधित जागेच्या चारही बाजूस सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत उंच इमारत, झाडे, डोंगर, टेकडी असणार नाही, याची दक्षता घेतली जाते.साधा किंवा विनास्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्यासाठी तळाचा भाग काँक्रीटने भरून घ्यावा. त्यावर मध्यभागी उंच वीट आणि सिमेंटचे बांधकाम करावे. वरील पृष्ठभाग सपाट करून घ्यावा. त्यावर पर्जन्यमापकाचा सांगाडा मध्यभागी ठेवावा. पर्जन्यमापकाच्या सांगाड्याभोवती उंच विटांचे बांधकाम करावे. त्यावर ५ से. मी. काँक्रीटचे काम करावे आणि चारही बाजूला थोडासा उतार करावा.पर्जन्यमापकाचे नरसाळे आणि सांगाड्याचा जोड जमिनीपासून ३० सें. मी. उंच राहील याची काळजी घ्यावी. पर्जन्यमापकाचे मोजपात्र २०.० मि. मी. क्षमतेचे असते आणि प्रत्येक रेषा ही ०.२ मि. मी. वर असते.