शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

राजेंच्या बालेकिल्ल्यात अनेकांचा कस

By admin | Updated: October 2, 2014 00:17 IST

सातारा : स्वतंत्र उमेदवारींमुळे संघर्षाची समिकरणे बदलण्याची शक्यता

सागर गुजर- सातारा-सातारा विधानसभा मतदारसंघात १९७८ पासून राजघराण्याच्या सत्तेला कुणीही शह देऊ शकलेले नाही. मात्र, काँगे्रस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी राजेंविरोधात वेळोवेळी रान पेटविले, हा इथला इतिहास आहे. राजघराण्यातील अंतर्गत संघर्षाला मनोमिलनानंतर पूर्णविराम मिळाला. यानंतर इथली सर्वच सत्तास्थाने मनोमिलनाच्या अधिपत्त्याखाली आली असली तरी विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष एकमेकांशी झुंजणार असल्याने राजेंच्या सत्तास्थानांचा कस लागणार आहे.सातारा-जावळी मतदारसंघात प्रतापगड, अजिंक्यतारा हे दोन कारखाने, ग्रामपंचायती, सोसायट्या, पंचायत समिती या सत्तास्थानांवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. मतदारसंघातील बहुतांश सत्तास्थाने ही पालकमंत्री शशिकांत शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारी आहेत. जिल्हा परिषदेचा कुडाळ गट सोडला तर इतर ठिकाणी राष्ट्रवादीने पाळेमुळे भक्कम केली आहेत. कुडाळ गट दीपक पवारांच्या ताब्यात असला तरी याठिकाणी दिवंगत आमदार लालसिंगराव शिंदे, राजेंद्र शिंदे व त्यांच्यानंतर सुनेत्रा शिंदे यांचे नेतृत्व मानले जाते. या सर्वच सत्तास्थानांचा कस या निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. सातारा मतदारसंघात १९७८ मध्ये जनता पक्षातून निवडणूक लढविलेल्या दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्याविरोधात काँगे्रसने बाबूराव घोरपडे यांना उभे केले होते. १९८0 मध्ये बबनराव उथळेंशी संघर्ष करून अभयसिंहराजे निवडून आले होते. १९९८ च्या निवडणुकीत भाजपकडून उभे असलेल्या उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९९ च्या निवडणुकीत पुन्हा उदयनराजेंचा पराभव करून अभसिंहराजे निवडून आले होते. हा इतिहास पाहता काँगे्रस आणि भाजपने बळ लावल्यानंतर प्रस्थापितांना संघर्षातून जावे लागले, हे स्पष्ट होते. यंदाची निवडणूकही काहीशी २00४ पूर्वीच्या निवडणुकांची आठवण करून देणारी ठरली आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये सातारा-जावळी हा नवा मतदारसंघ तयार झाला. त्यावेळी दोन्ही काँगे्रस एकत्र लढली. शिवेंद्रसिंहराजे या निवडणुकीत विजयी झाले. मात्र, त्यावेळी काँगे्रसशी असणाऱ्या आघाडीचा त्यांना लाभ झाला होता. काँगे्रस-राष्ट्रवादीचा जिल्हाभर असणारा संघर्ष सातारा-जावळीत फारसा पाहायला मिळत नव्हता. राजेंचे नेतृत्व मानून त्यांचे काम करण्याची नीती काँगे्रस नेत्यांनी कायम ठेवली. यंदा मात्र काँगे्रस त्यांच्यासोबत नाही. काँगे्रसचे महिला आघाडीचे अनेक वर्षे जिल्हाध्यक्षपद भुषविणाऱ्या रजनी पवार यांना काँगे्रसने संधी दिली असल्याने त्यांचा मोठा कस याठिकाणी लागणार आहे.१९९८ च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता भाजपला या मतदारसंघात फारसे यश मिळालेले नाही. दीपक पवार यांच्या निमित्ताने भाजपला एक राजकीय चेहरा मिळालेला आहे. तर शिवसेनेने लालबाग-परळमध्ये वर्चस्व असणाऱ्या माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या हाती बाण देऊन त्यांना लढायला धाडले आहे. सकपाळ हे मूळचे जावळी तालुक्यातील आहेत. अहिरे वानवली तर्फ सोळशी, हे ६० ते ७० घरांचं त्यांचं गाव. नोकरी व्यवसायानिमित्त जावळीतले लोक मुंबईत स्थायिक आहेत. त्यामुळेच दगडू सकपाळ यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. हा प्रभाव मतांमध्ये रूपांतरित करण्यात सकपाळ यशस्वी होतीलही; परंतु साताऱ्याचे काय?, हा प्रश्न त्यांना सतावणार आहे. साताऱ्यात नगरपालिका, पंचायत समिती, तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायती, सोसायट्यांमध्ये मनोमिलनाची सत्ता आहे. ‘मनोमिलनाचा वारू’ हाच मुळात शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधकांसमोर आव्हान ठरणार आहे. नावपक्षशिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीदगडू सकपाळ शिवसेनादीपक पवारभाजपरजनी पवारकाँग्रेसराहूल पवारमनसेसंदीप कांबळेअपक्षअभिजीत बिचुकलेअपक्षसागर भिसेअपक्षदिलीप जगतापअपक्ष