शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

फळविक्रेत्यांना हवंय मोक्याचं ठिकाण !

By admin | Updated: June 14, 2015 23:56 IST

रस्त्यावरून कधी हटणार : पालिकेचे आलिशान मार्केट पडलंय धूळखात

सातारा : एकाच छताखाली सर्वांना व्यवसाय करता यावा, यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च करून राजवाड्याजवळ सुसज्ज असे मार्केट उभे केले; मात्र ही ‘अडगळीची जागा नको रे बाबा,’ असं म्हणत फळविक्रेत्यांनी या जागेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पालिकेचे आलिशान मार्केट अक्षरश: धूळखात पडलंय. विधानसभा निवडणुकीनंतर रस्त्यावर असलेल्या फळविक्रेत्यांना मार्केटमधील कट्ट्यांचे वाटप करण्यात येईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. मात्र, सहा महिने झाले तरी फळविक्रेत्यांचे स्थलांतर न झाल्याने नवीन बांधण्यात आलेल्या मार्केटचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजवाड्याला लागूनच अत्याधुनिक प्रतापसिंह महाराज भाजी मंडई उभारण्यात आली आहे. या भाजी मंडईमध्ये सध्या २६ हून अधिक भाजीविक्रेत्यांसाठी कट्टे आहेत. प्रत्येक भाजी विक्रेत्याला कट्ट्याचे वाटपही करण्यात आले आहे. आता भाजी विक्रेत्यांचा प्रश्न मिटला आहे; परंतु याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर फळविक्रेत्यांसाठी सुसज्ज असे कट्टे उभारण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी लोकांना खरेदी करता यावी, हा हेतू ठेवून पालिकेने या मार्केटची उभारणी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राजवाड्याच्या भिंतीला लागून फळविक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. तसेच रस्त्याच्या आजूबाजूलाही काही फळविक्रेते बसत असतात. अशा व्यावसायिकांसाठी प्रतापसिंह भाजी मार्केटमध्ये कट्टे तयार करण्यात आले आहेत. परंतु पालिकेने या ठिकाणी या फळविक्रेत्यांचे अद्याप स्थलांतर केले नाही. त्यामुळे फळविक्रेते राजवाड्यालगत ठाण मांडून बसले आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर फळविक्रेत्यांना रस्त्यावरून उठविले जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, निवडणूक होऊन बरेच दिवस झाले तरी अद्यापही फळविक्रेत्यांनी मंडईमध्ये बसण्याची मानसिक तयारी केलेली दिसत नाही. किंवा पालिकेकडूनही तसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे एकाला न्याय वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा का? असे भाजीविक्रेत्यांमधून बोलले जात आहे. राजवाड्यासारख्या मोक्याच्या ठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ असते. फळविक्रेत्यांचा चांगला व्यवसाय होत असतो. त्यामुळे या ठिकाणाहून फळविक्रेते उठण्यास राजी नाहीत, असे बोलले जात आहे. (प्र्रतिनिधी)