शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

फळविक्रेत्यांना हवंय मोक्याचं ठिकाण !

By admin | Updated: June 14, 2015 23:56 IST

रस्त्यावरून कधी हटणार : पालिकेचे आलिशान मार्केट पडलंय धूळखात

सातारा : एकाच छताखाली सर्वांना व्यवसाय करता यावा, यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च करून राजवाड्याजवळ सुसज्ज असे मार्केट उभे केले; मात्र ही ‘अडगळीची जागा नको रे बाबा,’ असं म्हणत फळविक्रेत्यांनी या जागेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पालिकेचे आलिशान मार्केट अक्षरश: धूळखात पडलंय. विधानसभा निवडणुकीनंतर रस्त्यावर असलेल्या फळविक्रेत्यांना मार्केटमधील कट्ट्यांचे वाटप करण्यात येईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. मात्र, सहा महिने झाले तरी फळविक्रेत्यांचे स्थलांतर न झाल्याने नवीन बांधण्यात आलेल्या मार्केटचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजवाड्याला लागूनच अत्याधुनिक प्रतापसिंह महाराज भाजी मंडई उभारण्यात आली आहे. या भाजी मंडईमध्ये सध्या २६ हून अधिक भाजीविक्रेत्यांसाठी कट्टे आहेत. प्रत्येक भाजी विक्रेत्याला कट्ट्याचे वाटपही करण्यात आले आहे. आता भाजी विक्रेत्यांचा प्रश्न मिटला आहे; परंतु याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर फळविक्रेत्यांसाठी सुसज्ज असे कट्टे उभारण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी लोकांना खरेदी करता यावी, हा हेतू ठेवून पालिकेने या मार्केटची उभारणी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राजवाड्याच्या भिंतीला लागून फळविक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. तसेच रस्त्याच्या आजूबाजूलाही काही फळविक्रेते बसत असतात. अशा व्यावसायिकांसाठी प्रतापसिंह भाजी मार्केटमध्ये कट्टे तयार करण्यात आले आहेत. परंतु पालिकेने या ठिकाणी या फळविक्रेत्यांचे अद्याप स्थलांतर केले नाही. त्यामुळे फळविक्रेते राजवाड्यालगत ठाण मांडून बसले आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर फळविक्रेत्यांना रस्त्यावरून उठविले जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, निवडणूक होऊन बरेच दिवस झाले तरी अद्यापही फळविक्रेत्यांनी मंडईमध्ये बसण्याची मानसिक तयारी केलेली दिसत नाही. किंवा पालिकेकडूनही तसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे एकाला न्याय वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा का? असे भाजीविक्रेत्यांमधून बोलले जात आहे. राजवाड्यासारख्या मोक्याच्या ठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ असते. फळविक्रेत्यांचा चांगला व्यवसाय होत असतो. त्यामुळे या ठिकाणाहून फळविक्रेते उठण्यास राजी नाहीत, असे बोलले जात आहे. (प्र्रतिनिधी)