शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

फळविक्रेत्यांना हवंय मोक्याचं ठिकाण !

By admin | Updated: June 14, 2015 23:56 IST

रस्त्यावरून कधी हटणार : पालिकेचे आलिशान मार्केट पडलंय धूळखात

सातारा : एकाच छताखाली सर्वांना व्यवसाय करता यावा, यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च करून राजवाड्याजवळ सुसज्ज असे मार्केट उभे केले; मात्र ही ‘अडगळीची जागा नको रे बाबा,’ असं म्हणत फळविक्रेत्यांनी या जागेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पालिकेचे आलिशान मार्केट अक्षरश: धूळखात पडलंय. विधानसभा निवडणुकीनंतर रस्त्यावर असलेल्या फळविक्रेत्यांना मार्केटमधील कट्ट्यांचे वाटप करण्यात येईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. मात्र, सहा महिने झाले तरी फळविक्रेत्यांचे स्थलांतर न झाल्याने नवीन बांधण्यात आलेल्या मार्केटचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजवाड्याला लागूनच अत्याधुनिक प्रतापसिंह महाराज भाजी मंडई उभारण्यात आली आहे. या भाजी मंडईमध्ये सध्या २६ हून अधिक भाजीविक्रेत्यांसाठी कट्टे आहेत. प्रत्येक भाजी विक्रेत्याला कट्ट्याचे वाटपही करण्यात आले आहे. आता भाजी विक्रेत्यांचा प्रश्न मिटला आहे; परंतु याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर फळविक्रेत्यांसाठी सुसज्ज असे कट्टे उभारण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी लोकांना खरेदी करता यावी, हा हेतू ठेवून पालिकेने या मार्केटची उभारणी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राजवाड्याच्या भिंतीला लागून फळविक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. तसेच रस्त्याच्या आजूबाजूलाही काही फळविक्रेते बसत असतात. अशा व्यावसायिकांसाठी प्रतापसिंह भाजी मार्केटमध्ये कट्टे तयार करण्यात आले आहेत. परंतु पालिकेने या ठिकाणी या फळविक्रेत्यांचे अद्याप स्थलांतर केले नाही. त्यामुळे फळविक्रेते राजवाड्यालगत ठाण मांडून बसले आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर फळविक्रेत्यांना रस्त्यावरून उठविले जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, निवडणूक होऊन बरेच दिवस झाले तरी अद्यापही फळविक्रेत्यांनी मंडईमध्ये बसण्याची मानसिक तयारी केलेली दिसत नाही. किंवा पालिकेकडूनही तसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे एकाला न्याय वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा का? असे भाजीविक्रेत्यांमधून बोलले जात आहे. राजवाड्यासारख्या मोक्याच्या ठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ असते. फळविक्रेत्यांचा चांगला व्यवसाय होत असतो. त्यामुळे या ठिकाणाहून फळविक्रेते उठण्यास राजी नाहीत, असे बोलले जात आहे. (प्र्रतिनिधी)