येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य एस. बी. केंगार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षिका ए.एस. काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रकाश पाटील म्हणाले, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी-व्यवसाय करणारे पालक महाविद्यालयावर विश्वास ठेवून आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवत असतात. त्यांच्या या विश्वासास महाविद्यालयाने तडा जाऊ देऊ नये. सर्वगुणसंपन्न आणि सुसंस्कारित पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षकांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.
प्रा. एस.यू. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य आर.व्ही. भरपुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एल.के. आतार यांनी निकालाचे वाचन केले. प्रा. एन.पी. पुजारी यांनी आभार मानले.
फोटो : २४केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.