शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

घरच्यांचे मौन; परक्यांकडून लूट!

By admin | Updated: December 25, 2014 00:03 IST

ऊस उत्पादक हतबल : विलंबाचा फायदा घेऊन कवडीमोल दराने खरेदी

नसीर शिकलगार - फलटण  -तालुक्यात या हंगामात उसाचे प्रचंड उत्पादन वाढले असून, हातात कारखानदारांनी पाच पैसे दिले नसताना आपला ऊस कसा गाळपाला जाईल, याची घोर चिंता ऊस उत्पादकांना लागली आहे. याचा फायदा बाहेरील कारखानदारांनी उचलित कवडीमोल दराने व ऊस उत्पादकांकडून लेखी लिहून घेऊन ऊस नेण्यास सुरुवात केली आहे. ऊस उत्पादकांना गुलामाच्या पद्धतीने वागविणाऱ्या कारखानदारांबद्दल प्रचंड चीड व्यक्त होत आहे.फलटण तालुक्यात दोन साखर कारखाने असून, या हंगामात उसाचे मोठे क्षेत्र तालुक्यात वाढले गेले आहे. अंदाजे १५ ते १६ लाख टन ऊस या हंगामात उभा आहे. एवढा ऊस गाळप करणे दोन्ही कारखान्यांना शक्य नाही. श्रीराम सहकारी साखर कारखान्याने साठ हजारांच्या आसपास उसाचे गाळप केले असून, न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी या कारखान्याने दीड लाख मे. टन उसाचे गाळप केलेले आहे. दोन्ही साखर कारखान्यांची गाळप करण्याची क्षमता लक्षात घेता, मे अखेर जरी दोन्ही कारखाने सुरू राहिले तरी ते दहा लाख मेट्रिक टनाच्या वर गाळप करू शकणार नाही.आपला ऊस लवकरात लवकर कसा कारखान्याकडे जाईल व शेत मोकळे करून कसे दुसरे पीक घेता येईल, या विवंचनेत शेतकरी आहे. त्यासाठी दोन्ही कारखान्यांकडे तोडीसाठी ते हेलपाटे घालत आहेत. त्यातच ज्यांच्या ऊस गेलाय त्यांना अद्याप पेमेंट मिळालेला नाही. उसाच्या पहिल्या हप्त्यावरून तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आर्थिक तोट्यात सध्या काहीजण आहेत. आपला ऊस कोण नेतंय, यासाठी येथील तालुके व जिल्ह्यातही कारखानदारांच्या पायऱ्या झिजविण्यात ऊसउत्पादक मग्न आहेत. याचा बरोबर फायदा उचलित कात्रित अडकलेल्या ऊस उत्पादकांना काही खासगी कारखानदारांनी ऊस नेण्याचे आमिष दाखवित त्यांच्याकडून लिखित स्वरूपात करारनामा करून घेतला आहे. त्यामध्ये चाळीस किलोमीटरच्या पुढे होणारी ऊस वाहतूक (कमिशनसह) माझे उसाचे पहिल्या अ‍ॅडव्हान्समधून कपात करून घ्यावी. कारखान्याच्या चालू रिकव्हरी बेसनुसार उसाची रिकव्हरी नसल्यास कारखाना नियमानुसार होणारी कपात मला मान्य आहे, असा लेखी करारनामा करून काही खासगी कारखानदारांनी ऊसतोड चालू केली आहे.या करारामुळे खासगी कारखानदारांचे फावणार असून, ते देतील तो दर ऊस उत्पादकांना घ्यावा लागणार आहे. वाहतूक व रिकव्हरीचा विचार करता जर एखाद्या शेतकऱ्याने आपला ऊस बाहेर कारखानदाराला दिल्यास त्याला कारखान्याचा जो दर जाहीर होईल, त्याच्या चारशे ते साडेचारशे रुपये कमी दर मिळणार आहे. कारखानदारांकडून ही शुद्ध फसवणूक होत असून, आर्थिक विवंचनेत अडकलेला व आपला ऊस कसा जाईल, या चिंतेत असणाऱ्या ऊस उत्पादकांना पर्यायच राहिला नाही.शेतकऱ्यांमध्ये संभ्रमफलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांमध्ये उसाच्या प्रचंड उत्पादनामुळे लढण्याची क्षमता राहिलेली नाही. कारखानदार सांगतील तसे त्यांना वागावे लागत आहे. त्यामुळे कोणाकडूनही दराबाबतही आंदोलनाची भाषा नाही की, आवाज नाही. आपला ऊस कसा जाईल, यासाठीच त्यांचा संघर्ष सुरू आहे.ऊस उत्पादकांच्या हतबलतेचा फायदा घेत कवडीमोल दराने लिखित स्वरूपात त्यांचा ऊस नेणाऱ्या खासगी कारखानदारांबद्दल जनतेत मात्र संतप्त प्रतिक्रिया उमठत आहे.