शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घरच्यांचे मौन; परक्यांकडून लूट!

By admin | Updated: December 25, 2014 00:03 IST

ऊस उत्पादक हतबल : विलंबाचा फायदा घेऊन कवडीमोल दराने खरेदी

नसीर शिकलगार - फलटण  -तालुक्यात या हंगामात उसाचे प्रचंड उत्पादन वाढले असून, हातात कारखानदारांनी पाच पैसे दिले नसताना आपला ऊस कसा गाळपाला जाईल, याची घोर चिंता ऊस उत्पादकांना लागली आहे. याचा फायदा बाहेरील कारखानदारांनी उचलित कवडीमोल दराने व ऊस उत्पादकांकडून लेखी लिहून घेऊन ऊस नेण्यास सुरुवात केली आहे. ऊस उत्पादकांना गुलामाच्या पद्धतीने वागविणाऱ्या कारखानदारांबद्दल प्रचंड चीड व्यक्त होत आहे.फलटण तालुक्यात दोन साखर कारखाने असून, या हंगामात उसाचे मोठे क्षेत्र तालुक्यात वाढले गेले आहे. अंदाजे १५ ते १६ लाख टन ऊस या हंगामात उभा आहे. एवढा ऊस गाळप करणे दोन्ही कारखान्यांना शक्य नाही. श्रीराम सहकारी साखर कारखान्याने साठ हजारांच्या आसपास उसाचे गाळप केले असून, न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी या कारखान्याने दीड लाख मे. टन उसाचे गाळप केलेले आहे. दोन्ही साखर कारखान्यांची गाळप करण्याची क्षमता लक्षात घेता, मे अखेर जरी दोन्ही कारखाने सुरू राहिले तरी ते दहा लाख मेट्रिक टनाच्या वर गाळप करू शकणार नाही.आपला ऊस लवकरात लवकर कसा कारखान्याकडे जाईल व शेत मोकळे करून कसे दुसरे पीक घेता येईल, या विवंचनेत शेतकरी आहे. त्यासाठी दोन्ही कारखान्यांकडे तोडीसाठी ते हेलपाटे घालत आहेत. त्यातच ज्यांच्या ऊस गेलाय त्यांना अद्याप पेमेंट मिळालेला नाही. उसाच्या पहिल्या हप्त्यावरून तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आर्थिक तोट्यात सध्या काहीजण आहेत. आपला ऊस कोण नेतंय, यासाठी येथील तालुके व जिल्ह्यातही कारखानदारांच्या पायऱ्या झिजविण्यात ऊसउत्पादक मग्न आहेत. याचा बरोबर फायदा उचलित कात्रित अडकलेल्या ऊस उत्पादकांना काही खासगी कारखानदारांनी ऊस नेण्याचे आमिष दाखवित त्यांच्याकडून लिखित स्वरूपात करारनामा करून घेतला आहे. त्यामध्ये चाळीस किलोमीटरच्या पुढे होणारी ऊस वाहतूक (कमिशनसह) माझे उसाचे पहिल्या अ‍ॅडव्हान्समधून कपात करून घ्यावी. कारखान्याच्या चालू रिकव्हरी बेसनुसार उसाची रिकव्हरी नसल्यास कारखाना नियमानुसार होणारी कपात मला मान्य आहे, असा लेखी करारनामा करून काही खासगी कारखानदारांनी ऊसतोड चालू केली आहे.या करारामुळे खासगी कारखानदारांचे फावणार असून, ते देतील तो दर ऊस उत्पादकांना घ्यावा लागणार आहे. वाहतूक व रिकव्हरीचा विचार करता जर एखाद्या शेतकऱ्याने आपला ऊस बाहेर कारखानदाराला दिल्यास त्याला कारखान्याचा जो दर जाहीर होईल, त्याच्या चारशे ते साडेचारशे रुपये कमी दर मिळणार आहे. कारखानदारांकडून ही शुद्ध फसवणूक होत असून, आर्थिक विवंचनेत अडकलेला व आपला ऊस कसा जाईल, या चिंतेत असणाऱ्या ऊस उत्पादकांना पर्यायच राहिला नाही.शेतकऱ्यांमध्ये संभ्रमफलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांमध्ये उसाच्या प्रचंड उत्पादनामुळे लढण्याची क्षमता राहिलेली नाही. कारखानदार सांगतील तसे त्यांना वागावे लागत आहे. त्यामुळे कोणाकडूनही दराबाबतही आंदोलनाची भाषा नाही की, आवाज नाही. आपला ऊस कसा जाईल, यासाठीच त्यांचा संघर्ष सुरू आहे.ऊस उत्पादकांच्या हतबलतेचा फायदा घेत कवडीमोल दराने लिखित स्वरूपात त्यांचा ऊस नेणाऱ्या खासगी कारखानदारांबद्दल जनतेत मात्र संतप्त प्रतिक्रिया उमठत आहे.