शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे पात्र कोरडे; शेतकरी हवालदिल

By admin | Updated: December 5, 2015 00:24 IST

खंडाळा : वीरची गतवर्षीपेक्षा निम्म्याने पातळी खालावली

दशरथ ननावरे-- खंडाळा तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून वीर धरणाच्या उजव्या कालव्याकडे पाहिले जाते. यावर्षी खंडाळा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे वीर धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून शेतीपिकांचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आराखडा कोलमडला असून ‘धरणाचे पाणी खोल, शेतकरी झाले हवालदिल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, धरणात गेल्यावर्षी नोव्हेंबरअखेर ६ टीएमसी पाणी होते. सध्या ३. ५ टीएमसी पाणीसाठा आहे.खंडाळा तालुक्याच्या सीमेवर नीरा नदीवर असणाऱ्या वीर धरणात तालुक्यातील काही भागांची शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. वीर धरणाची पाणीसाठवण क्षमता ९.७५ टीएमसी एवढी आहे. यावर्षी पाऊसकाळ कमी झाल्याने धरणात नोव्हेंबर अखेरच पाणीसाठा खालावला आहे. गतवर्षी नोव्हेंबर अखेर ६ टीएमसी पाणी शिल्लक होते. मात्र, यावर्षी तो तब्बल निम्म्याने कमी होऊन आजअखेर केवळ ३.५ टीएमसीच पाणी राहिले आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये जी स्थिती असते ती चार महिने अगोदरच निर्माण झाली असल्याने पाण्याची बिकट परिस्थिती उद्भवली आहे.खंडाळा तालुक्यातील भादे, अंदोरी, वाठार बु।।, मोवे, दापकेघर, शेडगेवाडी, कराडवाडी, पिंपरे बु।। बावकलवाडी, रुई यांसह अनेक गावांची शेती वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्यावर अवलंबून आहे. याशिवाय काही गावांच्या पिण्याच्या पाणीयोजनाही येथूनच सुरू आहेत. धरणातून कालव्याला पाणी सोडले तरच गावच्या पाणीयोजना सुरळीतपणे सुरू असतात. अन्यथा गावातून पाणीपुरवठा खंडित होतो.वीर धरणावर अवलंबून असलेल्या शेतीत मुख्यत: ऊस, कांदा ही नगदी पिके तर ज्वारी, बाजरी, भुईमूग, हरभरा, कडधान्ये गहू, कापूस, फळबागा अशी शेतीपिके अवलंबून आहेत. सद्य:स्थितीत कांदा आणि ऊस, फळबागा ही पिके व ज्वारीचा हंगाम पार पाडण्यासाठी धरणाच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र धरणातीलच पाणी कमी असल्याने कालव्याला सातत्याने पाणी सोडणे अशक्य बनणार आहे. शेतीपिके धोक्यात येण्याची चिन्हे असल्याने लाखोंच्या उत्पादनावर पाणी सोडावे लागेल. या भीतीने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. याच तालुक्यातील भाटघर धरणातील पाणी गरजेनुसार सोडल्यास वीर धरणाच्या पाणीसाठ्यात भर पडणार आहे. परंतु भाटघर धरणातही सध्या केवळ १५ टीएमसीच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी हिवाळ्याच्या प्रारंभालाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते की काय, अशी परिस्थिती आहे. सध्या ऊसतोड सुरू असली तरी नवीन लागणीचा ऊस आणि कांदा पीक टिकविणे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणार आहे. वीर धरणात जर पाणी आले नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे. आमच्या गावची पाणीपुरवठा योजना वीर धरण कालव्यावर अवलंबून आहे. कालव्याला पाणी सुटले तर विहिरीला पाणी येते त्यानुसार पाणीपुरवठा केला जातो. कालव्यास पाणी नसेल तर पाणी योजनेवर परिणाम होतो. आत्ताच दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाईवर उपाययोजना करावी लागेल.- मीता धायगुडे, सरपंच, वाघोशीसध्या धरणात ३.५ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी तो ६ टीएमसी होता. भाटघर धरणातील पाणी मागणीनुसार उपलब्ध झाल्यास पाणी नियोजन करता येईल.- एस. एस. शेडगे, वायरलेस आॅपरेटर, वीर धरण व्यवस्थापनया भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याच्या योजना विहिरीवरून असल्या तरी विहिरी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कालव्याचे पाणी पाझरून विहिरींचा पाणीसाठा वाढतो, त्यावर शेतीपाण्याचे नियोजन करावे लागते. - धनाजी जाधव, शेतकरी