शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

इतिहास जागविणारा ‘अजिंक्यतारा’ भेगाळला!

By admin | Updated: April 17, 2017 23:19 IST

बुरूज ढासळला : भिंतींनाही तडे, अस्तित्वावर नैसर्गिक संकट

सचिन काकडे ल्ल साताराऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला आज डामडौलात उभा असला तरी भविष्यात या किल्ल्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे असलेला जुना बुरूज ढासळला असून, किल्ल्याच्या अनेक दगडी भिंतींना तडे गेले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून तग धरून असलेल्या या भिंती ऊन, वारा, पावसाचा मारा झेलत भेगाळत चालल्या असून, याची दुरुस्ती न झाल्यास या ढासळण्याची भीती दुर्गप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.अजिंक्यतारा किल्ला आजही पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. ऐतिहासिक महत्त्व लाभल्याने पर्यटकांची या ठिकाणी नेहमीच रेलचेल असते. किल्ल्यावर असलेली मंदिरे, पाण्याची तळी, नैसर्गिक वनसंपदा, जुन्या वाड्याचे अवशेष आजही आपणास पाहावयास मिळतात. या सर्व गोष्टी इतिहास जागवित असल्या तरी किल्ल्याच्या सुरक्षेकडे पुरातत्व विभागासह सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उत्तरेकडे असलेला बुरूज पूर्णपणे ढासळला आहे. परिणामी मुख्य तटबंदीला याचा धोका निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या व्यतिरिक्त प्रवेशद्वारावरील दगडी भिंतीलाही तडे गेले आहेत. तटबंदीवर वाढतायत वृक्षकिल्ल्याची तटबंदी अभेद्य असली तरी या तटबंदीला वृक्षांमुळे इजा पोहोचत आहे. वृक्षांची मुळे तटबंदीला पोकळ असल्याने दगडांमधील भेगा रुंदावत चालल्या आहेत. किल्ल्यावर ओढावलेल्या या नैसर्गिक संकटामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत.दिवसेंदिवस रुंदावतायत भेगाअजिंक्यतारा किल्ल्यावरील तटबंदीसह अनेक ठिकाणच्या भिंती भेगाळल्या आहेत. पाऊस-पाण्यामुळे या भिंतींमधील चुनखडी तसेच तत्सम पदार्थांचे वहन झाले असून, भिंतींमधील अंतर रुंदावत चालले आहे. काही भिंतींना भेगा पडल्याने दगडांची रचनाही बदलली आहे.प्रवेशद्वारालाही अवकळाकिल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वारालाही सध्या अवकळा लागली आहे. प्रवेशद्वाराचा पुरातन व लाकडी दरवाजा मजबूत स्थितीत असला तरी खालच्या बाजूने मात्र, तो कुजत चालला आहे. दरवाजाचा काही भाग तुटला असून, लोखंडी कडीतून निखळलाही आहे.