शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

साताऱ्यातील ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित!

By admin | Updated: April 23, 2016 00:42 IST

कचऱ्याचे साम्राज्य : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दुर्लक्षित विहिरींची निगा राखण्याची गरज

सातारा : साताऱ्यात शिवकालीन नैसर्गिक जलसाठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. काळाच्या ओघात या जलसाठ्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे शहरातील अनेक भागांत भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. शहराची मातृसंस्था असणाऱ्या पालिकेने या विहिरींची स्वच्छता मोहिम हाती घेऊन जलसाठे विकसित करावेत, अशी मागणी होत आहे.सातारा शहराच्या प्रत्येक भागात उपलब्ध विहिरींची संख्या पाहता त्या-त्या भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागू शकतो. पाण्याचे नियोजन व वापर याची सांगड घालणे गरजेचे आहे. पाणीसाठ्याचे जपणूक व जनत करणे महत्त्वाचे आहे. ‘जल है तो कल है’ हे जनतेला आता पटवून देण्याची वेळ आली आहे. पाणीबचतीचा नारा न देता तो कृतीततून सिद्ध करण्यासाठी लोकचळवळ उभारली पाहिजे.साताऱ्यात जलसाठे मुबलक आहेत; पण त्याचा वापर व उपभोग घेता येत नाही, अशी अवस्था शहरवासीयांची आहे. दुष्काळाने होरपळलेली जनता भटकंती करते आणि दुसरीकडे मुबलक पाणी आहे. पण त्याचा वापर नाही, हे विदारक चित्र साताऱ्यात आहे. सातारामधील नैसर्गिक जलसाठ्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे हे जिवंत पाण्याचे झरे भविष्यात मृत होतील यासाठी तरी या विहिरीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.पाण्यासाठी संपूर्ण राज्यातील जनता हैराण झाली आहे. हे चित्र पाहता जीवनात पाण्याचे मोल अनमोल असल्याचे दिसते. पाणी वाचविणे हे प्रत्येक नागरिकांनी स्वीकारले पाहिजे; तरच पाणीटंचाईवर मात करता येईल. भूगर्भातील जलसाठे ही खरी जीवनदायी आहे याची जाणीव ठेवून पाण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.सातारा शहरातील भूगर्भातील जलसाठे खोलवर गेले आहेत. भविष्यकाळात हे जनतेसाठी धोकादायक ठरू शकते. जलसाठ्याचे संवर्धन व निगा राखणे हे महत्त्वाचे आहे. शहराच्या अनेक भागांतील जलसाठे प्रशासनाने उन्हाळ्यापूर्वीच ताब्यात घेणे आवश्यक होते; परंतु साताऱ्यात मुबलक जलसाठा असून, केवळ नियोजनाचा अभावामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उरमोडी, कास, धरणातील पाण्याच्या नियोजनावर विसंबून न राहता नैसर्गिक जलसाठ्याची निगा राखणे गरजेचे आहे.सातारा शहरात विशेषत: गडकर आळी, शुक्रवारपेठेच्या भागात जलसाठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. याचा वापर झाल्यास शहरात पाणीटंचाई भासणार नाही. पाण्याची उपसा होणे आवश्यक आहे; तरच पाणी स्वच्छ राहील. (प्रतिनिधी)जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार...थेंब-थेंब पाण्यासाठी जनतेला कोसो मैल धावपळ करावी लागत आहे. जेथे मुबलक जलसाठे आहेत. तेथे पाण्याचे महत्त्व उमजत नाही, अशीच स्थिती सातारामधील गडकर आळी, शुक्रवार पेठेतील आहे. अनंत इंग्लिश स्कूल ते बदामी विहीरपर्यंत जवळपास चारपेक्षा अधिक जुन्या काळातील दगडी बांधीव विहिरी आहेत. या विहिरींना ऐन उन्हाळ्यात ही भरपूर पाणी आहे; परंतु या विहिरीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. विहिरीत वाढलेल्या झाडे झुडपांमुळे या विहिरी असूनही त्याचा उपयोग घेता येत नाही. पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखाच हा प्रकारशहरातील विहिरी एकेकाळी या परिसरातील नागरिकांसाठी जीवनदायी ठरत होत्या त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होत होता. कालांतराने शासनाच्या पाण्याच्या स्कीममुळे घराघरांमध्ये जलवाहिनी पोहोचली आणि या विहिरींकडे दुर्लक्ष होत गेले जलसाठे असूनही त्याचे मोल समजत नाही, हे दुर्दैव आहे. - श्रीरंग काटेकर, सामाजिक कार्यकर्ते, सातारा आहे.