शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

शौर्यदिनी साताऱ्यात ऐतिहासिक मानवंदना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:56 IST

सातारा : एक जानेवारीला दरवर्षी देशभरातील लाखो अनुयायी भीमा-कोरेगाव येथे एकत्र येऊन शौर्यदिनाचा जल्लोष करतात आणि विजयस्तंभाला मनोभावे अभिवादन ...

सातारा : एक जानेवारीला दरवर्षी देशभरातील लाखो अनुयायी भीमा-कोरेगाव येथे एकत्र येऊन शौर्यदिनाचा जल्लोष करतात आणि विजयस्तंभाला मनोभावे अभिवादन करतात. या अभिवादन सोहळ्यात समता सैनिक दलाच्या मानवंदनेला विशेष महत्त्व असते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समता सैनिक दलाच्यावतीने सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सैनिकी इतमामात मानवंंदना देण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शोर्यदिनाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला.

१ जानेवारी १८१८ चा रणसंग्राम जगभर चर्चेत राहिला आहे. या रणसंग्रामाचे स्मरण करून शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात मानवंदनेचे आयोजन करण्यात आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्याहस्ते पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मेजर जयसिंगराव सोरटे, लेप्टनंट देवेंद्र सपकाळ, सुभेदार मोहन यादव, सुभेदार विश्वनाथ गायकवाड, कमांडर उत्तम कांबळे, कमांडर संयोजना बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली सैनिक दलाच्या इतमामात पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ, वंचितचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत, बसपचे जिल्हाप्रमुख दादासाहेब गायकवाड, अमर गायकवाड, समाजवादी रिपब्लिकनचे पी. डी. साबळे, रिपब्लिकन गवई गटाचे चंद्रकांत कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अशोक गायकवाड यांनी यावेळी आपली भूमिका व्यक्त करताना स्पष्ट केले की, भीमा-कोरेगावचा इतिहास जाज्ज्वल्य आहे. तो अन्यायाविरुध्दचा प्रखर आक्रोश आहे. जेव्हा जेव्हा इथल्या व्यवस्थेने सर्वसामान्य, गोरगरीब माणसावर अन्याय केला, छत्रपती शिवरायांना विरोध केला, तेव्हा तेव्हा मागास समाज हा पेटून उठला आहे. यापुढील काळात छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारातील लोकशाही अंमलात आणावयाची असेल, तर आपण जागृत रहायला हवे, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.

अरुणभाऊ पोळ यांनी प्रास्ताविकात शोर्यदिनाचा इतिहास सांगितला. चंद्रकांत खंडाईत यांनी संविधानाला अनुसरुन यापुढील लढाई कशी लढता येईल, यासाठीचा प्रयत्न करायला हवा, असे स्पष्ट केले. अमर गायकवाड आदींची यावेळी मनोगते झाली.

प्रारंभी त्रिसरण पंचशील घेण्यात आले. मान्यवरांच्या मनोगतानंतर शाहीर श्रीरंग रणदिवे, शाहीर वैभव गायकवाड, शाहीर भोसले यांनी क्रांतिगीते सादर केली, तर समता सैनिक दलाच्या शौर्यगीताने मानवंदनेचा शेवट झाला. सूत्रसंचालन व आभारपर भूमिका साहित्यिक अरुण जावळे यांनी मांडली.

फोटो ओळ : सातारा येथे भीमा-कोरेगाव येथील शौर्यदिनानिमित्त कार्यकर्त्यांनी सैनिकी इतमामात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

फोटो नेम : ०१जावेद