शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शौर्यदिनी साताऱ्यात ऐतिहासिक मानवंदना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:56 IST

सातारा : एक जानेवारीला दरवर्षी देशभरातील लाखो अनुयायी भीमा-कोरेगाव येथे एकत्र येऊन शौर्यदिनाचा जल्लोष करतात आणि विजयस्तंभाला मनोभावे अभिवादन ...

सातारा : एक जानेवारीला दरवर्षी देशभरातील लाखो अनुयायी भीमा-कोरेगाव येथे एकत्र येऊन शौर्यदिनाचा जल्लोष करतात आणि विजयस्तंभाला मनोभावे अभिवादन करतात. या अभिवादन सोहळ्यात समता सैनिक दलाच्या मानवंदनेला विशेष महत्त्व असते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समता सैनिक दलाच्यावतीने सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सैनिकी इतमामात मानवंंदना देण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शोर्यदिनाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला.

१ जानेवारी १८१८ चा रणसंग्राम जगभर चर्चेत राहिला आहे. या रणसंग्रामाचे स्मरण करून शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात मानवंदनेचे आयोजन करण्यात आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्याहस्ते पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मेजर जयसिंगराव सोरटे, लेप्टनंट देवेंद्र सपकाळ, सुभेदार मोहन यादव, सुभेदार विश्वनाथ गायकवाड, कमांडर उत्तम कांबळे, कमांडर संयोजना बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली सैनिक दलाच्या इतमामात पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ, वंचितचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत, बसपचे जिल्हाप्रमुख दादासाहेब गायकवाड, अमर गायकवाड, समाजवादी रिपब्लिकनचे पी. डी. साबळे, रिपब्लिकन गवई गटाचे चंद्रकांत कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अशोक गायकवाड यांनी यावेळी आपली भूमिका व्यक्त करताना स्पष्ट केले की, भीमा-कोरेगावचा इतिहास जाज्ज्वल्य आहे. तो अन्यायाविरुध्दचा प्रखर आक्रोश आहे. जेव्हा जेव्हा इथल्या व्यवस्थेने सर्वसामान्य, गोरगरीब माणसावर अन्याय केला, छत्रपती शिवरायांना विरोध केला, तेव्हा तेव्हा मागास समाज हा पेटून उठला आहे. यापुढील काळात छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारातील लोकशाही अंमलात आणावयाची असेल, तर आपण जागृत रहायला हवे, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.

अरुणभाऊ पोळ यांनी प्रास्ताविकात शोर्यदिनाचा इतिहास सांगितला. चंद्रकांत खंडाईत यांनी संविधानाला अनुसरुन यापुढील लढाई कशी लढता येईल, यासाठीचा प्रयत्न करायला हवा, असे स्पष्ट केले. अमर गायकवाड आदींची यावेळी मनोगते झाली.

प्रारंभी त्रिसरण पंचशील घेण्यात आले. मान्यवरांच्या मनोगतानंतर शाहीर श्रीरंग रणदिवे, शाहीर वैभव गायकवाड, शाहीर भोसले यांनी क्रांतिगीते सादर केली, तर समता सैनिक दलाच्या शौर्यगीताने मानवंदनेचा शेवट झाला. सूत्रसंचालन व आभारपर भूमिका साहित्यिक अरुण जावळे यांनी मांडली.

फोटो ओळ : सातारा येथे भीमा-कोरेगाव येथील शौर्यदिनानिमित्त कार्यकर्त्यांनी सैनिकी इतमामात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

फोटो नेम : ०१जावेद