शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ऐतिहासिक प्रतापगड ३५७ मशालींनी उजळला--परंपरा दीपोत्सवाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:31 IST

महाबळेश्वर : इतिहासाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला शनिवारी (दि. २३) रात्री ३५७ मशालींनी उजळून निघाला.

ठळक मुद्देढोल-ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतषबाजीसोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील शिवभक्तांची हजेरी

 लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : इतिहासाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला शनिवारी (दि. २३) रात्री ३५७ मशालींनी उजळून निघाला. गडावरील भवानीमातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रोत्सवातील चतुर्थी दिवशी ३५७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, यंदा या उत्सवाचे सातवे वर्ष आहे. राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी या महोत्सवाचा आनंद लुटला.

प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाºया शाळीग्राम दगडापासून भवानीमातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना केली. या घटनेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर ३५० मशाली पेटविण्यात आल्या. तेव्हापासून नवरात्रोत्सवात चतुर्थी दिवशी मशाली पेटविण्याची परंपरा सुरू झाली.

यंदा भवानीमातेच्या प्रतिष्ठापनेला ३५७ वर्षे पूर्ण झाल्याने किल्ल्यावर भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री आठ वाजता भवानीमातेच्या मंदिरापासून ते बुरुजापर्यंत ३५७ मशाली पेटविण्यात आल्या. दीपोत्सवाने संपूर्ण किल्ला उजळून निघाला होता. ढोल-ताशांच्या गजरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांसह नागरिकांनी प्रतापगडावर गर्दी केली होती. हस्तकला केंद्राचे चंद्रकांत आप्पा उतेकर, किल्लेदार विजय हवलदार, संतोष जाधव, माय भवानी सामाजिक संस्था प्रतापगड, वाडा कुंभरोशी ग्रामस्थांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले जाते.घटस्थापनेचे वैशिष्ट्यप्रतापगडावरील घटस्थापनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात दोन घट बसविले जातात. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कारण त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तर दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या नावाने. कारण राजाराम महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबतू केला. त्यांचे गडावर कित्येक वर्षे वास्तव्य होते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे.ऐतिहासिक प्रतापगडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला ३५७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारी रात्री गडावर ३५७ मशाली पेटवून मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा अनोखा अन् पारंपारिक सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील शिवप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.