शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत संपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2015 01:13 IST

विजय शिवतारे : जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग प्राधिकरणाला सूचना

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामांत अत्यंत दिरंगाई सुरू असून कामाबाबत नागरिकांच्या आक्षेपार्ह तक्रारी आहेत. मी स्वत: पाच ते सहा दिवस प्रत्यक्षात या कामांचा अभ्यास केला असून मी पूर्णपणे असमाधानी आहे. नागरिकांच्या जीवाशी या मंडळींनी खेळ मांडला असून डिसेंबरपर्यंत महामार्गावरील सर्व अडचणी दूर करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पुणे-बंगळूर महामार्गाच्या कामासंदर्भात अनेक घटकांच्या तक्रारी असल्याने पालकमंत्र्यांनी शनिवारी जिल्हा नियोजन भवनात महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, एसटीचे अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीला पत्रकारांना मज्जाव करण्यात आला होता. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन झालेल्या चर्चेची माहिती दिली. पालकमंत्री म्हणाले, ‘पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा ते पुणे या अंतरात विविध समस्या कायम आहेत. अनेक ठिकाणी कामे अर्धवट पडलेली आहेत. मातीचे ढिगारे जागोजागी पडले आहेत. रिफ्लेक्टरचीही सुविधा नसल्याने अपघात होत आहेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, त्यामुळे ही बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. या कामाचा संपूर्ण आढावा घेऊन डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना केल्या. महामार्गाच्या कामातील गुणवतेबाबत अधिकारीही समाधानी नाहीत. शासनाने जो ठेकेदार नेमला आहे, त्याने दोन वेगळे ठेकेदार नेमून काम सुरू ठेवले आहे. वास्तविक ज्याने ठेका घेतला आहे, त्यानेच गुणवत्ता राखणे गरजेचे असल्याने शासनाने ज्या ठेकेदाराला कामे दिली आहेत, त्याच ठेकेदाराने ती पूर्ण करावीत. अपघातग्रस्त लोकांना उपचाराची सुविधा संबंधितानेच द्यायला हवी. प्रत्येक टोलनाक्यावर २० टनाची क्रेन उपलब्ध करावी. ही संपूर्ण सुविधा मोफत देण्यात यावी. वैद्यकीय वाहनाची सोयही करावी. महामार्गाच्या कडेने रिफ्लेक्टरची सुविधा तत्काळ करावी,’ अशा सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, २0१४ यावर्षात पुणे ते सातारा या महामार्गावर १२९ जणांना जीव गमवावा लागला आहे. रखडलेली कामे आणि सुविधेचा अभाव हीच कारणे त्याला जबाबदार आहेत. महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यांनी आपल्या कामात तत्काळ सुधारणा करावी,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)