शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत संपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2015 01:13 IST

विजय शिवतारे : जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग प्राधिकरणाला सूचना

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामांत अत्यंत दिरंगाई सुरू असून कामाबाबत नागरिकांच्या आक्षेपार्ह तक्रारी आहेत. मी स्वत: पाच ते सहा दिवस प्रत्यक्षात या कामांचा अभ्यास केला असून मी पूर्णपणे असमाधानी आहे. नागरिकांच्या जीवाशी या मंडळींनी खेळ मांडला असून डिसेंबरपर्यंत महामार्गावरील सर्व अडचणी दूर करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पुणे-बंगळूर महामार्गाच्या कामासंदर्भात अनेक घटकांच्या तक्रारी असल्याने पालकमंत्र्यांनी शनिवारी जिल्हा नियोजन भवनात महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, एसटीचे अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीला पत्रकारांना मज्जाव करण्यात आला होता. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन झालेल्या चर्चेची माहिती दिली. पालकमंत्री म्हणाले, ‘पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा ते पुणे या अंतरात विविध समस्या कायम आहेत. अनेक ठिकाणी कामे अर्धवट पडलेली आहेत. मातीचे ढिगारे जागोजागी पडले आहेत. रिफ्लेक्टरचीही सुविधा नसल्याने अपघात होत आहेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, त्यामुळे ही बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. या कामाचा संपूर्ण आढावा घेऊन डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना केल्या. महामार्गाच्या कामातील गुणवतेबाबत अधिकारीही समाधानी नाहीत. शासनाने जो ठेकेदार नेमला आहे, त्याने दोन वेगळे ठेकेदार नेमून काम सुरू ठेवले आहे. वास्तविक ज्याने ठेका घेतला आहे, त्यानेच गुणवत्ता राखणे गरजेचे असल्याने शासनाने ज्या ठेकेदाराला कामे दिली आहेत, त्याच ठेकेदाराने ती पूर्ण करावीत. अपघातग्रस्त लोकांना उपचाराची सुविधा संबंधितानेच द्यायला हवी. प्रत्येक टोलनाक्यावर २० टनाची क्रेन उपलब्ध करावी. ही संपूर्ण सुविधा मोफत देण्यात यावी. वैद्यकीय वाहनाची सोयही करावी. महामार्गाच्या कडेने रिफ्लेक्टरची सुविधा तत्काळ करावी,’ अशा सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, २0१४ यावर्षात पुणे ते सातारा या महामार्गावर १२९ जणांना जीव गमवावा लागला आहे. रखडलेली कामे आणि सुविधेचा अभाव हीच कारणे त्याला जबाबदार आहेत. महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यांनी आपल्या कामात तत्काळ सुधारणा करावी,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)