शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

महामार्ग प्रशासनाला आली जाग..!

By admin | Updated: December 17, 2014 22:54 IST

खंबाटकी घाट : सुविधांना प्राधान्य, सुरक्षेची कामे सुरू--लोकमतचादणका

खंडाळा : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील तुटलेल्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती व पुन्हा उभारणीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. ‘खंबाटकी घाटातील प्रवाशांचा जीव टांगणीला’ अशा मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्तप्रसिद्धी केल्यानंतर हायवे प्रशासनाला जाग आली असून, खंबाटकी घाटातील रस्त्याच्या सुविधांना प्राधान्य देत सुरक्षाविषयक कामे सुरू केली आहेत.खंबाटकी घाटातील अरुंद वळण रस्ते, तुटलेले संरक्षक कठडे, खचलेल्या साईडपट्ट्या, यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे हा चढणीच्या घाटाचा प्रवास जीवघेणा ठरत होता. वर्षभरात आणि त्यापूर्वीही अनेक अपघातांतून शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील सुविधांबाबत हायवे प्राधिकरणाकडे अनेकदा मागणी केली होती. मात्र तेवढ्यापुरती मान डोलावून प्रशासन वेळ मारून नेत होते. घाटरस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. याची दखली घेत ‘न्हाय’च्या अधिकाऱ्यांनी घाटातील संरक्षक कठड्यांची दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तुटलेल्या कठड्यांच्या जागी लोखंडी कठडे उभे करून वाहनांची सुरक्षा करण्याबाबत उपाययोजना केली आहे. तर वळणावरील साईडपट्ट्यांचे खड्डे मुरूम टाकून मुजविण्यात आले आहेत. यामुळे वळणांवर दोन वाहनांना जाणे सोयीस्कर झाले आहे. घाटातील वळणांवर साईडपट्ट्या खचल्याने रस्ता अरुंद बनला होता. यामुळे नेहमीच येथे वाहतुकीस अडथळा येत होता. विशेषत: मोठे कंटेनर वळण घेताना अडकले जायचे. यामुळे महामार्ग वाहतूक ठप्प होत होती. (प्रतिनिधी)खंबाटकी घाटातील तुटलेल्या संरक्षक कठड्यांमुळे प्रवास जीवघेणा बनला होता. महामार्गावर सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी अनेकदा मागण्या झाल्या; परंतु प्रशासन डोळेझाकपणा करीत होते. ‘लोकमत’ने यावर आवाज उठविल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ‘लोकमत’ने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. - शैलेश गाढवे, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस, खंडाळाघाटातील काम वेगाने...पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात सध्या मुरुमाने का होईना रस्ता दुरुस्ती सुरू केल्याने वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून जेसीबीच्या साह्याने रस्ता भरणी व ठेकेदारांना कामगारांकडून संरक्षक ग्रील कठडे उभारणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकीचा प्रवास हळूहळू सुरक्षेच्या मार्गावर येत असल्याचे पाहायला मिळत असल्याचे दिसत आहे.