शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हायटेक जमान्यातही शुभेच्छा पत्रांचे अप्रूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:41 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्याना शुभेच्छा देणं आणि स्वीकारणं आता सहज शक्य झाले आहे. तरीही शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहोचण्याची परंपरा शहरातील काही सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आणि सराफी व्यावसायिकांना अखंडितपणे चालवली आहे.

ठळक मुद्देसहकारी संस्थांबरोबरच सराफी व्यावसायिकांकडून परंपरा कायम

सातारा , दि. १४ : सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्याना शुभेच्छा देणं आणि स्वीकारणं आता सहज शक्य झाले आहे. तरीही शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहोचण्याची परंपरा शहरातील काही सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आणि सराफी व्यावसायिकांना अखंडितपणे चालवली आहे.

गेल्या काही वर्षात उत्सव साजरे करण्याच्या संकल्पना बदलू लागल्या आहेत. दिवाळीच्या अधी सुटी घेऊन किल्ला करणं, त्यासाठी प्रशस्त अंगण, एकत्र फराळ तयार करणं, फराळ करायला परस्परांना मदत करणं, या सर्व गोष्टी आता लोप पावत चालल्या आहेत.

कुंभारवाड्यातून रेडिमेड किल्ला फ्लॅटच्या गॅलरीत ठेवून पालक स्वत: सह मुलांची समजूत काढत आहे. कित्येकदा फटाके वाजवायला जागा नाही म्हणून शेजाऱ्याकडे किंवा मग गावाला जाऊन राहणाऱ्या मुलांची संख्याही मोठी आहे.

सणाच्या पार्श्वभूमीवर शहरीकरणाच्या विळख्यात अडकलेल्यांना ख्याली खुशाली विचारायला शेजारीही डोकावत नाहीत, त्यामुळे पत्र आणि टपाल फार लांबची गोष्ट आहे. अशा स्थितीत सहकारी संस्था, सराफी व्यावसायिकांचे दिवाळी शुभेच्छा पत्र नागरिकांना दिलासा देत आहेत.

दिवाळी सणाची गडबड लक्षात घेऊन ही शुभेच्छा पत्रे चार दिवस आधीच दाखल होत असल्याने दिवाळीची चाहूल देत आहेत. त्यामुळे घरांतील प्रत्येक व्यक्तीच्या नजरेस हे शुभेच्छा पत्र पडत आहे.

टॅग्स :diwaliदिवाळी