शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातून चार हजार मावळ्यांशी ‘हायटेक संपर्क’ !

By admin | Updated: September 23, 2016 00:44 IST

सातारा मराठा क्रांती मोर्चा : संगणकाद्वारे मिळतात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना नियोजनबद्ध संदेश

सातारा : महाराष्ट्रभर अत्यंत शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे विराट मोर्चे निघत आहेत. नेता विरहित या मोर्चांना प्रतिसाद मिळतो कसा?, असा प्रश्न अनेकदा पुढे येत आहे. विराट गर्दीला एकत्रित करायचे तर त्याला मायक्रो प्लॅनिंग पाहिजे. हेच प्लॅनिंग अत्यंत सजगपणे होताना दिसतेय. साताऱ्यातील एसटी महामंडळाच्या नूतन इमारतीमधील संपर्क कार्यालयामधून प्लॅनिंगची सूत्रे नियोजनबद्धरीत्या हालत असतात. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमधील ‘स्पेशल रूम’प्रमाणे प्रयोग एखाद्या मोर्चाच्या निमित्ताने पहिल्यांदाच केला गेल्याचे पाहायला मिळते. साताऱ्यात एसटी विभागीय कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. या इमारतीमधील एका मोठ्या गाळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयातूनच दि. ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने नियोजन बैठकांची सूत्रे हालतात. याच कार्यालयाच्या मागच्या बाजूला आणखी छोटी रूम आहे. यामध्ये एका टेबलावर संगणक ठेवण्यात आला आहे. या संगणकाला ई-मेलची व्यवस्था जोडण्यात आलेली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांचे नियोजन ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्वयंसेवक करत आहेत. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या बैठकांचे सूक्ष्म नियोजन आहे. गावात झालेल्या बैठकांची माहिती संपर्क कार्यालयापर्यंत पोहोचविली जाते. त्यानंतर इथूनच नियोजनाच्या अनुषंगाने ‘ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप, टेक्स्ट मेसेज’ यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांपर्यंत माहिती पुरविली जाते. अजून काही दिवस बाकी असल्याने युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ४ हजार स्वयंसेवक..मराठा क्रांती मोर्चाचे सातारा जिल्ह्यात ४ हजार स्वयंसेवक आहेत. यांनी स्वत:हून कामाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. सर्वच स्वयंसेवकांकडे स्मार्ट फोन असल्याने संपर्क कार्यालयामधील संगणकातून पाठविलेला ‘मेसेज’ एकाच वेळी जिल्ह्यात स्वयंसेवकांना मिळतो. सारं काही नियोजनबद्ध!राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने लाखोंच्या गर्दीने मोर्चे काढले. या मोर्चांतील स्वयंशिस्त महत्त्वाची ठरली. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर आल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा बिलकूल प्रश्न निर्माण होऊ न देता स्वयंशिस्तीमुळे हे मोर्चे अत्यंत शांततेत पार पडले.