शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पानवणकरांच्या तुफानाला पुणेकरांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:23 IST

म्हसवड : दुष्काळ हद्दपार करण्याचा निर्धार करून पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उतरलेल्या पानवणकरांनी गावात श्रमदानाचे ...

म्हसवड : दुष्काळ हद्दपार करण्याचा निर्धार करून पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उतरलेल्या पानवणकरांनी गावात श्रमदानाचे तुफान आणले आहे. या तुफानाला गावाबाहेरील लोकांचीही चांगली साथ लाभत असून, पुणे येथील सामर्थ्य वाद्यवृंद ग्रुप आणि शिवगृहिणी महिला बचत गटाच्या सुमारे ६० सदस्यांनी श्रमदानात सहभाग घेतला आणि स्पर्धेसाठी आर्थिक योगदानही दिले.सामाजिक कार्यात नेहमीच एकोपा दाखविणाऱ्या पानवणकर ग्रामस्थांनी यावर्षी मोठ्या उत्साहात वॉटर कप स्पर्धेची सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्पर्धेपूर्वीच्या शिवार फेरी, परसबाग, मातीपरीक्षण आदी ३० पैकी ३० गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या प्रारंभाला ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील हीट जोडी अंजली आणि राणा यांनीही उपस्थिती लावली होती.स्पर्धेच्या सुरुवातीपासून आजपर्यंत दररोज सुमारे सातशे लोक नियमित श्रमदानाला उपस्थिती दर्शवत असून, सुटीदिवशी नोकरदार मंडळीही श्रमदानाला उपस्थित राहत आहेत.या पार्श्वभूमीवर पुणे येथील सामर्थ्य वाद्यवृंद ग्रुप आणि शिवगृहिणी महिला बचत गटाच्या सदस्यांनी स्वखर्चाने पुणे ते पानवण असा सुमारे दीडशे किलोमीटरचा प्रवास करून सकाळी सात ते नऊ असे दोन तास श्रमदान केले. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी यांत्रिक कामाच्या खर्चासाठी निधी अपुरा पडत असल्याचे पाहून सुमारे पंधरा हजार रुपयांचा कर्तव्य निधी पाणी फाउंडेशन, पानवणच्या टीमकडे सुपूर्द केला. पुणेकरांच्या या सहकार्याने पानवणकर अक्षरश: भारावून गेले.