शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

निधी मिळूनही पुलाच्या कामासाठी चालढकल

By admin | Updated: September 4, 2014 00:07 IST

बनपुरी ग्रामस्थांची गैरसोय : श्रेयवादात अडकले पुलाचे काम

सणबूर : काही महिन्यांपूर्वी नाबार्डमधून मंजूर झालेल्या बनपूरी, ता़ पाटण येथील वांग नदीवरील पुलाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. यापुर्वी निधी मंजुर झाल्यानंतर तालुक्यातील तिनही राजकिय गटांनी आपल्यामुळेच निधी मिळाल्याचे सांगत श्रेयवादाचे राजकारण केले. मात्र, निधी मिळाल्यानंतर काम त्वरीत सुरू होण्यासाठी एकही राजकिय गट पुढाकार घेताना दिसत नाही. बनपुरी येथे असलेला फरशीपूल अतिशय कमी उंचीचा असून पावसाचा जोर वाढला की पूलावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होते़ दळणवळणाचा प्रश्न निर्माण होतो़ पूला वरून ये- जा करणाऱ्या लोकांना व शालेय विद्यार्थ्यांना जिव मुठीत घेऊनच पुल ओलांडावा लागतो. काही वर्षांपूर्वी या पूलावर पणी असताना पलीकडे जाताना चारजणांना आपला प्राण गमवावा लागला होता. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत याच पूलावरून जावे लागते़ काहीवेळा पूलावर सतत पाणी असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच जाता येत नाही़ शिवाय एखादी व्यक्ती आजारी पडली तर दवाखान्यात नेण्यासाठी पर्यायी रस्ताच नसल्याने मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते़ येथे मोठा पुल व्हावा अशी येथील लोकांची मागणी होती़ त्यानुसार नाबार्डमधून पूलास मंजूरी मिळून सुमारे १ कोटी रूपये मंजूर झाले आहेत़ परंतू गेल्या सहा महिन्या पासून या पूलाच्या कामाचा फक्त श्रेयवाद रंगला असून प्रत्यक्षात पूलाच्या कामास सुरूवात झाली नाही़ राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व देसाई तीनही गटातील कार्यकर्त्यांनी हा पूल आम्हीच मंजूर करून आणला असल्याचा दावा करत आहेत़ या गटातटाच्या श्रेयवादात सर्वसामान्य ग्रामस्थ भरडले जात आहेत. पूलाच्या कामाचा श्रेयवाद थांबवून तात्काळ पूलाचे काम चालू करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)