शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस जोर धरू लागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला असून, जोर धरू लागला आहे. कोयनेत प्रथमच आवक ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला असून, जोर धरू लागला आहे. कोयनेत प्रथमच आवक होऊ लागली आहे. तर साताऱ्यात रिमझिम स्वरूपात पाऊस होत असून पूर्वेकडील बहुतांशी भागांत ढगाळ वातावरण होते.

जिल्ह्यात या वर्षी वेळेच्या अगोदर माॅन्सूनचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला काही दिवस पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. विशेष करून धरण क्षेत्रात पाऊस चांगला पडत आहे. यामुळे सध्यस्थितीत तरी कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झालेली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ३०७८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर इतर प्रमुख धरणांत अजून आवक सुरू झालेली नाही.

त्याचबरोबर सातारा शहरात मंगळवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरूपात पाऊस होत आहे. बुधवारीही पाऊस झाला. यामुळे नागरिकांना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागत होते.

पूर्व भागात काही भागांत रिमझिम पाऊस झाला. पण, बहुतांशी भागांत दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुष्काळी भागात खरीप हंगाम पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. सध्या पेरण्या रखडल्या आहेत.

चौकट :

कोयनेला ५३ मिलिमीटर पाऊस...

पश्चिम भागातील धरण परिसरात पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे सर्वाधिक ५३ मिलिमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत ऐकूण १९२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर कण्हेरला ३१ तर एकूण ८९ मिलिमीटर पाऊस झाला. धोमला १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जूनपासून धोम धरण परिसरात ७२ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. बलकवडीला बुधवारी सकाळपर्यंत ३६ मिलिमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत १०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर तारळीला २५ आणि जूनपासून ९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. खटाव तालुक्यातील येरळा धरण परिसरात अवघ्या ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

.......................................................