शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

रहिमतपूर परिसरात पावसाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावरून ओढ्याच्या पाण्यासारखे पाण्याचे लोट ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावरून ओढ्याच्या पाण्यासारखे पाण्याचे लोट वाहत असून, आडसाली ऊस भुईसपाट झाले आहेत. दुर्गळवाडी येथील विहीर ढासळली आहे.

रहिमतपूर परिसरातील गावात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचे तांडव सुरू आहे. जोरदार व संततधार पावसामुळे शेतात पाणी तुडुंब भरल्याने सोयाबीन पीक नासून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रहिमतपूर-सातारा या रस्त्यावर अर्धवट काम झालेल्या तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणच्या रस्त्यावरून सतत पाण्याचे लोट वाहत असल्यानेच रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी नाले न काढल्यामुळे आजूबाजूच्या शेतात तुडुंब भरलेले आहे. पावसाबरोबरच अधूनमधून वाऱ्याची झुळूक येत असल्याने वाढलेले आडसाली ऊस भुईसपाट झाले आहेत. शेतातील कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, जनावरांना शेतातून चारा आणणे दुरापास्त झाले आहे.

जोरदार पावसामुळे पिकावर विपरीत परिणाम होईल, या चिंतेने आले उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. उभ्या पावसातच छत्री घेऊन अनेक शेतकरी आल्याच्या फडातून पाणी बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत. सततच्या पावसामुळे दगडात बांधण्यात आलेली दुर्गळवाडी येथील पंढरीनाथ दादू यादव यांचे रिकिबदारवाडी येथील जमीन गट नंबर २३२ मध्ये असणारी विहीर पडून सुमारे एक लाख दहा हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती रहिमतपूरचे मंडलाधिकारी विनोद सावंत यांनी दिली.

* (१)फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील पावसामुळे ऊस भुईसपाट झाला आहे.(छाया : जयदीप जाधव)

(२) रहिमतपूर - सातारा रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत असल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. (छाया : जयदीप जाधव)