शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

मुसळधार पावसाने ओढे-नाले भरून वाहिले!

By admin | Updated: October 2, 2015 23:33 IST

सोळशीत हंगामात पहिल्यांदाच धो-धो : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी लूटला वर्षासहलीचा आनंद; सातारा, फलटणमध्येही हजेरी

सातारा : सातारा शहरासह कोरेगाव, महाबळेश्वर, फलटण, खटाव तालुक्यांत शुक्रवारी दुपारनंतर परतीच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे ओढे, नाले भरून वाहत होते. वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यात शुक्रवारी जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सोळशीतील लहान-मोठे पाझर तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. तर काही भागांतील ऊस झोपला आहे. गेली अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्यासाठी टँकर सुरू केले होते. या भागातील नांदवळ, नळहिरा, अरबवाडी, भांडले येथील तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागांच्या आशा परतीच्या पावसावरच अवलंबून आहेत. वाठार स्टेशन परिसरात गेल्या चार -पाच दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोळशी, रणदुल्लाबाद, तडवळे (संमत) वाघोली, विखळे, वाठार स्टेशन या भागात पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारीला फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवस परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळदार पाऊस झाला. सुमारे तीन तास पाऊस झाला. यामुळे महाबळेश्वरमधील पर्यटकांनी शुक्रवारी दिवसभर वर्षासहलीचा आनंद घेतला. शहरात शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. मात्र दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. सलग सुट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची वर्दळ वाढली होती. त्यातच दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेत काहीकाळ अघोषित संचारबंदी निर्माण झाल्याचीच परिस्थिती दिसून येत होती. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरण बदलले अन् गारवा निर्माण झाला. पाऊस कमी झाल्याने सर्वत्र धुकेच धुके पसरले होते. या थंड वातावरणात पर्यटक मक्याची गरमागरम कणीस, चहा, गरमागरम भज्जी व चणे यांचा आस्वाद घेताना दिसत होते. बदललेल्या वातावरणाचा आनंद घेत होते, पावसामुळे स्थानिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून कमी आहे. १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत १५१ इंच पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाने महाबळेश्वर व परिसराला चांगलेच धुऊन काढले. त्यामुळे लहान-मोठ्या विक्रेत्यांचा फायदा झाला. सायंकाळनंतर बाजारपेठेत गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)