शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने ओढे-नाले भरून वाहिले!

By admin | Updated: October 2, 2015 23:33 IST

सोळशीत हंगामात पहिल्यांदाच धो-धो : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी लूटला वर्षासहलीचा आनंद; सातारा, फलटणमध्येही हजेरी

सातारा : सातारा शहरासह कोरेगाव, महाबळेश्वर, फलटण, खटाव तालुक्यांत शुक्रवारी दुपारनंतर परतीच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे ओढे, नाले भरून वाहत होते. वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यात शुक्रवारी जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सोळशीतील लहान-मोठे पाझर तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. तर काही भागांतील ऊस झोपला आहे. गेली अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्यासाठी टँकर सुरू केले होते. या भागातील नांदवळ, नळहिरा, अरबवाडी, भांडले येथील तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागांच्या आशा परतीच्या पावसावरच अवलंबून आहेत. वाठार स्टेशन परिसरात गेल्या चार -पाच दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोळशी, रणदुल्लाबाद, तडवळे (संमत) वाघोली, विखळे, वाठार स्टेशन या भागात पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारीला फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवस परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळदार पाऊस झाला. सुमारे तीन तास पाऊस झाला. यामुळे महाबळेश्वरमधील पर्यटकांनी शुक्रवारी दिवसभर वर्षासहलीचा आनंद घेतला. शहरात शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. मात्र दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. सलग सुट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची वर्दळ वाढली होती. त्यातच दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेत काहीकाळ अघोषित संचारबंदी निर्माण झाल्याचीच परिस्थिती दिसून येत होती. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरण बदलले अन् गारवा निर्माण झाला. पाऊस कमी झाल्याने सर्वत्र धुकेच धुके पसरले होते. या थंड वातावरणात पर्यटक मक्याची गरमागरम कणीस, चहा, गरमागरम भज्जी व चणे यांचा आस्वाद घेताना दिसत होते. बदललेल्या वातावरणाचा आनंद घेत होते, पावसामुळे स्थानिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून कमी आहे. १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत १५१ इंच पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाने महाबळेश्वर व परिसराला चांगलेच धुऊन काढले. त्यामुळे लहान-मोठ्या विक्रेत्यांचा फायदा झाला. सायंकाळनंतर बाजारपेठेत गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)