शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

मुसळधार पावसाने ओढे-नाले भरून वाहिले!

By admin | Updated: October 2, 2015 23:33 IST

सोळशीत हंगामात पहिल्यांदाच धो-धो : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी लूटला वर्षासहलीचा आनंद; सातारा, फलटणमध्येही हजेरी

सातारा : सातारा शहरासह कोरेगाव, महाबळेश्वर, फलटण, खटाव तालुक्यांत शुक्रवारी दुपारनंतर परतीच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे ओढे, नाले भरून वाहत होते. वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यात शुक्रवारी जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सोळशीतील लहान-मोठे पाझर तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. तर काही भागांतील ऊस झोपला आहे. गेली अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्यासाठी टँकर सुरू केले होते. या भागातील नांदवळ, नळहिरा, अरबवाडी, भांडले येथील तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागांच्या आशा परतीच्या पावसावरच अवलंबून आहेत. वाठार स्टेशन परिसरात गेल्या चार -पाच दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोळशी, रणदुल्लाबाद, तडवळे (संमत) वाघोली, विखळे, वाठार स्टेशन या भागात पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारीला फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवस परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळदार पाऊस झाला. सुमारे तीन तास पाऊस झाला. यामुळे महाबळेश्वरमधील पर्यटकांनी शुक्रवारी दिवसभर वर्षासहलीचा आनंद घेतला. शहरात शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. मात्र दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. सलग सुट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची वर्दळ वाढली होती. त्यातच दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेत काहीकाळ अघोषित संचारबंदी निर्माण झाल्याचीच परिस्थिती दिसून येत होती. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरण बदलले अन् गारवा निर्माण झाला. पाऊस कमी झाल्याने सर्वत्र धुकेच धुके पसरले होते. या थंड वातावरणात पर्यटक मक्याची गरमागरम कणीस, चहा, गरमागरम भज्जी व चणे यांचा आस्वाद घेताना दिसत होते. बदललेल्या वातावरणाचा आनंद घेत होते, पावसामुळे स्थानिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून कमी आहे. १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत १५१ इंच पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाने महाबळेश्वर व परिसराला चांगलेच धुऊन काढले. त्यामुळे लहान-मोठ्या विक्रेत्यांचा फायदा झाला. सायंकाळनंतर बाजारपेठेत गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)