शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

उन्हाचा तडाखा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:37 IST

म्हसवड : गेल्या काही दिवसात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्याकडेला असणारे थंडगार लिंबू सरबत, कोकम ...

म्हसवड : गेल्या काही दिवसात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्याकडेला असणारे थंडगार लिंबू सरबत, कोकम सरबत तसेच ऊसाच्या रसाची दुकाने लॉकडाऊनमुळे सध्या बंद आहेत. वातावरणात उकाडा असल्यामुळे घरातच लिंबू सरबताचा आनंद अनेक कुटुंब घेत आहेत.

घंटागाडीची मागणी

सातारा : शहरात अनेक ठिकाणी घंटागाडी थांबत नसल्याने नागरिकांना घंटागाडीची वाट पाहावी लागत आहे. काही ठिकाणी घंटागाड्या लगेच निघून जातात. त्यामुळे घरात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. कोविड काळात चार-पाच दिवस घरात घाण ठेवणं आरोग्याला अपायकारक आहे. हा कचरा रस्त्यावर टाकला तरी तो घातक असल्याने घंटागाडी थोडी जास्त वेळ उभी करावी, अशी मागणी होत आहे.

चोरट्यांच्या बंदोबस्ताची मागणी

वाई : विहिरीवरील विद्युतपंप तसेच ट्रान्सफॉर्मरमधील तारांची चोरी होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. याचबरोबर घरातील अंगणात पडलेल्या गृहोपयोगी साहित्याचीही चोरी होत आहे. भुरट्या चोऱ्यांबाबत फारशा तक्रारी होत असल्याने भुरट्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. कोविड काळात विविध कारणांनी बेरोजगार झालेल्या अनेकांना यातून पैसे मिळत असल्याचे समोर येत आहे.

कलिंगडांना मागणी

फलटण : उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे सध्या बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या कलिंगडांना चांगलीच मागणी वाढली आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या कलिंगडांना मागणी अधिक आहे. सध्याची वेळेची मर्यादा लक्षात घेता, सकाळी लवकर कलिंगड आणले जाते. दुपारी उन्हाचा पारा वाढला की मीठ आणि चाट मसाला लावून फ्रीजमध्ये ठेवलेले कलिंगड खाण्याचा आनंद नागरिक घेत आहेत.

चिमण्यांना पाणी

वडूज : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे चिमण्यांचे हाल होत आहेत. शहरात काही ठिकाणी भांड्यात पाणी ठेवून त्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकांनी घराचे अंगण, स्लॅप यासह वळचणीलाही चपट्या भांड्यांमध्ये पाणी ठेवले आहे. हे पाणी पिण्यासाठी पक्षी येतात.

दूध व्यवसाय अडचणीत

म्हसवड : माण तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, आता त्याचा फटका शेतकऱ्यांचा जोडधंदा असणाऱ्या दूध व्यवसायालाही बसत आहे. कोविड काळात शासनाने ठराविक वेळेची मर्यादा घातली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून दूध संकलन करून त्याचे वितरण करण्यासाठी तारेवरची कसरत दूध व्यावसायिकांना करावी लागत आहे.

उन्हाळ्याचे विकार वाढले

फलटण : दिवसेंदिवस सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे मोठ्या व्यक्तींसह लहान मुलांना उन्हाळी विकार त्रासदायक ठरू लागले आहेत. किरकोळ सर्दी, ताप, खोकला असल्यासही कोविड समजून उपचार करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून औषधे घेण्याचे प्रकार वाढले आहेत.

..............................