शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

प्रभाग रचनेवरील हरकतींवर साडेतीन तास सुनावणी

By admin | Updated: May 19, 2016 00:09 IST

कोरेगाव नगरपंचायत : जिल्हाधिकाऱ्यांसमोर १६ हरकतींवर तोंडी, लेखी युक्तिवाद

कोरेगाव : नव्याने अस्तित्वात आलेल्या कोरेगाव नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या १६ हरकतींवर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यासमोर तब्बल साडेतीन तास सुनावणी झाली. हरकत दाखल केलेल्यांनी तोंडी आणि लेखी युक्तिवाद केला. प्रशासनाने आपलीच बाजू योग्य असल्याचे दाखवून दिल्याने हरकत घेणाऱ्यांनी आता उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीशिर वृत्त आहे. राज्य शासनाने दि. ५ रोजी कोरेगावात नगरपंचायत स्थापन करण्याचे आदेश काढले होते. नगरविकास विभागाने त्यानंतर नव्याने प्रभाग रचना जाहीर करून वॉर्डनिहाय आरक्षणे सोडतीद्वारे जाहीर केली होती. प्रभाग रचनेवर हरकत घेण्याच्या मुदतीत एकूण १६ हरकती प्रांताधिकारी अजय पवार यांच्याकडे दाखल झाल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ४ एप्रिल २०१६ रोजी काढलेल्या आदेशान्वये प्रांताधिकारी अजय पवार यांना हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी प्राधिकृत केले होते. दरम्यानच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने दि. ७ मे २०१६ रोजी आदेश काढून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल हे सक्षम अधिकारी असून, तेच सुनावणी घेतील, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार मुदगल यांनी प्रांताधिकारी अजय पवार यांना प्राधिकृत केल्याबाबतचे आदेश रद्द करत बुधवारी सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनामध्ये सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी मुदगल यांच्यासमोर सुनावणीस सुरुवात झाली. प्रांताधिकारी अजय पवार, नगरपंचायतीचे प्रशासक किरणराज यादव यावेळी उपस्थित होते. संजय झंवर, संजय पिसाळ, दत्तात्रय झांजुर्णे, विजयकुमार बर्गे, राहुल बर्गे, मनोज येवले, सुनील बर्गे, अ‍ॅड. अमोल भुतकर, डॉ. गणेश होळ, प्रशांत गुरव, विठ्ठलराव बर्गे, सचिन बोतालजी आदी हरकत घेतलेल्या व्यक्तींनी हरकतींच्या अनुषंगाने लेखी आणि तोंडी युक्तिवाद केला. जिल्हाधिकारी मुदगल यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्हाधिकारी मुदगल याबाबत लेखीस्वरूपात निकाल देणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)उच्च न्यायालयात दाद मागणार..?जिल्हा प्रशासनाने आपलीच बाजू योग्य असल्याचे सुनावणी दरम्यान सातत्याने दाखवून दिले आहे. प्रशासनाने केलेले नकाशे हेच योग्य असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत प्रशासन जवळपास सर्वच हरकती फेटाळणार असल्याचे सकृतदर्शनी वाटत आहे, त्यामुळे आम्ही आता याबाबतीत उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे हरकत घेतलेल्या व्यक्तींनी सांगितले.