शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिपर्वाच्या विजयाची ‘हॅट्ट्रिक’

By admin | Updated: August 31, 2015 23:39 IST

कऱ्हाडचं राजकारण: उंडाळकर-भोसलेंची बाजी, बाळासाहेबांच्या महाआघाडीचा पराभव

प्रमोद सुकरे- कऱ्हाडविधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कऱ्हाड तालुक्यात माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्या मैत्रिपर्वाला नव्याने सुरुवात झाली. विधानसभेतील पराभवाचा उट्ट्या काढण्यासाठी या दोघांनी चंगच बांधला. त्यानंतर जिल्हा बँक निवडणुकीत उंडाळकर विजयी झाले. तब्बल दहा वर्षांनंतर ‘कृष्णा’ साखर कारखान्याच्या चाव्या भोसलेंच्या ताब्यात आल्या, तर सहा वर्षांपूर्वी गेलेली शेती उत्पन्न बाजार समितीची सत्ता पुन्हा ताब्यात घेत उंडाळकर-भोसले मैत्रिपर्वाने विजयाची हॅट्ट्रिक मारली आहे. कऱ्हाड तालुक्याचे राजकारण अलीकडच्या काही वर्षांत अस्थिर बनले आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत समीकरणे बदलत आहेत. म्हणून तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ म्हणत डॉ. अतुल भोसले ‘जयवंत शुगर’ची साखर घेऊन दूध संघावर गेले अन् अ‍ॅड. उदय पाटलांनी ‘कोयने’चे पेढे भरवत नव्याने मैत्रिपर्व सुरू केले. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणातील संदर्भ पुन्हा एकदा बदलले. या मैत्रिपर्वाने पहिल्यांदा विलासराव पाटील-उंडाळकरांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर ‘कृष्णा’ सहकारी साखर कारखान्यातील निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांचे पॅनेल विजयी झाले. या दोन्ही विजयानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला अन् त्यांनी आता लक्ष बाजार समिती, असा जणू नाराच दिला. हे दोन्ही गट तेव्हा पासून कामालाच लागले. अन् त्याचे फलित आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. सहा वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक महाआघाडी आकाराला आली. त्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, विलासराव पाटील-वाठारकर, भीमराव पाटील (दादा), जगदीश जगताप (दादा) अन् महाराष्ट्र केसरी दिवंगत संजय पाटील (दादा) यांच्या बरोबरीने डॉ. अतुल भोसले यांची साथ मिळाली अन् उंडाळकरांच्या एकहाती सत्तेला सुरूंग लागला; पण गत सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. संजय पाटील हयात राहिले नाहीत. तर डॉ. अतुल भोसलेच उंडाळकरांच्या गोटात शिरल्याने महतप्रयासाने ताब्यात घेतलेली बाजार समितीची सत्ता आघाडीच्या ताब्यात राहणार की उंडाळकर गट पुन्हा सत्ता हस्तगत करणार, याची उत्सुुकता लागली होती. आज विजयाच्या गुलालाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या मनाची ‘दाद’ लागलीच नाही ! बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील सहा दादांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. त्यातील वडगावचे ‘दादा’ महाआघाडीकडे तर कालेचे ‘दादा’ मैत्रिपर्वाबरोबर राहिले. रेठऱ्याच्या दोन दादांच्या भूमिकेची दाद मात्र शेवटपर्यंत लागलीच नाही. अन् कऱ्हाड उत्तरेतील एका दादाने थेट विरोध करण्याचे ‘धैर्य’ दाखवले नाही. पण, शेतकरी संघटनेच्या दादांनी बाळासाहेबांच्या जीवाला ‘घोर’ पडेल, अशीच व्यवस्था मतदानातून केल्याची चर्चा आहे. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा तीन-चार तालुक्यांत विभागला गेला आहे. त्यामुळे याचं गणित बांधणं खूप अवघड मानलं जातं. तरीही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन दादांनी ‘मनो-धैर्य’ एकवटून बाळासाहेबांना थेट आव्हान दिले होते. मात्र मतविभागणीचा फायदा बाळासाहेबांनाच झाला. यातील मनोज घोरपडे हे सातारा तालुक्यातील; पण कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने घोरपडेंनी त्या ९१ गावांत दौरे करत मतदारसंघ जणू पिंजूनच काढला. त्यामुळे बाळासाहेबांचा खरा विरोधक आपणच आहोत, अशी छबी निर्माण करण्यात त्यांना यश आल्याचे मानले जाते. महाआघाडीवर आत्मचिंतनाची वेळ सहा वर्षांपूवी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आकाराला आलेल्या महाआघाडीसाठी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर विजयश्री खेचून आणण्यासाठी महाराष्ट्र केसरी दिवंगत संजय पाटील यांच्यासह अनेकांचा महत्त्वपूर्ण वाटा होता; पण त्या आघाडीत गत विधानसभेनंतर ‘बिघाडी’ला सुरुवात झाली. ती सहा वर्षांत थांबलीच नाही. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी आपल्याबरोबर कोण-कोण होतं अन् आता कोण-कोण आहे, याचं आत्मचिंतन महाआघाडीच्या नेत्यांनी केलं तर पराभवाची कारणमीमांसा करणं सोपं होईल. युवा नेतृत्वांच्या प्रयत्नांना यश या निवडणुकीत माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. सुरेश भोसले यांच्याबरोबर त्यांचे राजकीय वारसदार अ‍ॅड. उदय पाटील व डॉ. अतुल भोसले यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ‘बाबा-दादां’नी तर जणू पायात भिंगरीच बांधली होती. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचेच निकालानंतर मानले जाते.अस्तित्वाची लढाई जिंकली बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण व आमदार आनंदराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. त्याला भोसले गटाची साथ लाभल्यानेच ही अस्तित्वाची लढाई जिंकली, अशी चर्चा आहे.