शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान प्रस्ताव पाठविण्याची घाई; मदतीसाठी मात्र, दिरंगाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा एक-दोन नव्हे तर ८०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना फटका बसलाय. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा एक-दोन नव्हे तर ८०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना फटका बसलाय. त्यामध्ये ८८२५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली असून ४९०५१ शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. या शेतकऱ्यांचे साडेसात कोटींहून अधिक तर शेतजमिनीचे ४१२९ हेक्टरचे जवळपास १३ कोटींचे नुकसान झालेले आहे. मदतीसाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठविले असलेतरी निधी अजून आलेला नाही.

जिल्ह्यात एक महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली होती. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर भागात धुवाँधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका सर्वाधिक महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड आणि पाटण तालुक्याला बसला तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील जमिनी वाहून गेल्या. जमिनीवर गाळ, वाळू, दरड आली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील पीक व जमीन नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. यामध्ये ८८२५.७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर बाधित शेतकरी संख्या ४९०५१ आहे. तर ७ कोटी ५६ लाख ३९ हजार रुपयांचे पीक नुकसान झाल्याची आकडेवारीही समोर आलेली आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वाधिक पीक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील १९७५६ शेतकऱ्यांचे ३६३७ हेक्टरवरील पिकांचे २ कोटी ३७ लाखांचे नुकसान झालेले आहे. तर कऱ्हाड तालुक्यात १४३०९ शेतकऱ्यांच २३९१ हेक्टर पिकांचे २ कोटी ९५ लाखांचे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पिकांचे आणि जमिनीचे नुकसान झालेले आहे. पाटणमध्ये भात आणि नाचणी पिकांची हानी झाली आहे.

जावळी तालुक्यात भात, नाचणीबरोबरच सोयाबीन पिकांना फटका बसला आहे. कऱ्हाड तालुक्यात भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर सातारा तालुक्यातही पिकांचे नुकसान झाले आहे. साताऱ्यात भात, नाचणी आणि सोयाबीन पिकांची हानी झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने तातडीने पीक आणि जमीन नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले. त्यानंतर मदतीबाबतचे प्रस्ताव शासनस्तरावरही पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही मदतीचा निधी जिल्ह्याला मिळालेला नाही. त्यामुळे मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\