शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नुकसान प्रस्ताव पाठविण्याची घाई; मदतीसाठी मात्र, दिरंगाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा एक-दोन नव्हे तर ८०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना फटका बसलाय. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा एक-दोन नव्हे तर ८०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना फटका बसलाय. त्यामध्ये ८८२५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली असून ४९०५१ शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. या शेतकऱ्यांचे साडेसात कोटींहून अधिक तर शेतजमिनीचे ४१२९ हेक्टरचे जवळपास १३ कोटींचे नुकसान झालेले आहे. मदतीसाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठविले असलेतरी निधी अजून आलेला नाही.

जिल्ह्यात एक महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली होती. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर भागात धुवाँधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका सर्वाधिक महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड आणि पाटण तालुक्याला बसला तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील जमिनी वाहून गेल्या. जमिनीवर गाळ, वाळू, दरड आली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील पीक व जमीन नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. यामध्ये ८८२५.७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर बाधित शेतकरी संख्या ४९०५१ आहे. तर ७ कोटी ५६ लाख ३९ हजार रुपयांचे पीक नुकसान झाल्याची आकडेवारीही समोर आलेली आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वाधिक पीक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील १९७५६ शेतकऱ्यांचे ३६३७ हेक्टरवरील पिकांचे २ कोटी ३७ लाखांचे नुकसान झालेले आहे. तर कऱ्हाड तालुक्यात १४३०९ शेतकऱ्यांच २३९१ हेक्टर पिकांचे २ कोटी ९५ लाखांचे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पिकांचे आणि जमिनीचे नुकसान झालेले आहे. पाटणमध्ये भात आणि नाचणी पिकांची हानी झाली आहे.

जावळी तालुक्यात भात, नाचणीबरोबरच सोयाबीन पिकांना फटका बसला आहे. कऱ्हाड तालुक्यात भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर सातारा तालुक्यातही पिकांचे नुकसान झाले आहे. साताऱ्यात भात, नाचणी आणि सोयाबीन पिकांची हानी झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने तातडीने पीक आणि जमीन नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले. त्यानंतर मदतीबाबतचे प्रस्ताव शासनस्तरावरही पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही मदतीचा निधी जिल्ह्याला मिळालेला नाही. त्यामुळे मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\