शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

हस्तलिखित दाखला ठरणार आता अवैध

By admin | Updated: September 1, 2014 00:05 IST

जी. श्रीकांत : ग्रामपंचायतींनी संगणकीकृत दाखले देणे बंधनकारक

सातारा : ‘जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतस्तरावर नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामसेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रातून नागरिकांना १९ प्रकारचे संगणकीकृत दाखले दिले जातात. त्यामुळे हाताने लिहिलेले दाखले पूर्णपणे अवैध ठरणार असून, ग्रामपंचायतींनी संगणकीकृत दाखले देणे बंधनकारक आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ग्रामविकास विभागाच्या एक नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार हस्तलिखित, छापील स्वरूपातील दाखले देणे पूर्णत: बंद करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनी दाखले हे फक्त संगणकीकृत स्वरूपातच देण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रतिदाखला २० रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील दाखला, हयातीचा दाखला तसेच निराधार योजनेसाठी वयाचा दाखला नि:शुल्क दिला जाणार आहे. या सर्व सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. तरीही जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती हस्तलिखित किंवा छापील दाखले व प्रमाणपत्रे देत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे दाखले देणे अवैध आहे. यापुढे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी दिलेले संगणकीकृत दाखलेच अधिकृत मानले जाणार आहेत. हस्तलिखित, छापील दाखले देणाऱ्या ग्रामपंचायती व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)