शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अनाहूत पाहुण्यांचे हात रिकामेच!

By admin | Updated: October 23, 2014 00:02 IST

पक्षप्रवेश पचनी नाहीच : भाजपच्या बहुतांश उमेदवारांचे मनसुबे मिळाले धुळीस

नितीन काळेल - सातारा  ‘सत्ता’ अशी बाब आहे की, घराघरांत भांडणे लावते. पक्षबदल तर दुरचीच गोष्ट. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीतही अनेकांनी आमदारकीसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या; पण मतदारांनी त्यांचे सर्व मनसुबे धुळीस मिळविले. या निवडणुकीत सर्वात अधिक करून भाजपात जाणाऱ्यांचाच कल अधिक होता. पण, त्यांचे ‘कमळ’ मात्र कोठेही फुलले नाही. दोघा मातब्बरांनी ‘धनुष्यबाण’ हातात घेतला; पण नेम मात्र बसलाच नाही, अशी स्थिती झाली.राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एकत्र नांदत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा व महायुतीचा काडीमोड झाल्यानंतर चौरंगी लढत होणार, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आतापर्यंत दुरंगी-तिरंगी लढती होणाऱ्या ठिकाणी चौरंगी तसेच ‘मनसे’मुळे पंचरंगी लढतीचे संकेत स्पष्ट झाले. त्यामुळे अनेकांना आमदारकीचे वेध लागले. काही पक्षांना तर अनेक मतदारसंघात स्ट्राँग उमेदवार मिळत नव्हते. अशा वेळी आयात उमेदवारांवर भर देण्यात आला. पक्षांनीही त्यांना त्यांची पार्श्वभूमी विचारत न घेता उमेदवारी बहाल केली. अशा अनेक आयारामांना राज्यातील जनतेने साफ नाकारले आहे. अशीच स्थिती सातारा जिल्ह्यातही दिसून आली. मात्र, या दलबदलूंनाही साथ मिळाली नाही.जिल्ह्यातील सातारा मतदारसंघातील व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी भाजपात प्रवेश केला. पूर्वी त्यांचा काँग्रेस ते शिवसेना असा प्रवास राहिला आहे. वाई मतदारसंघातील व महाबळेश्वरचे नगरसेवक ज्येष्ठ काँग्रेस नेते डी. एम. बावळेकर यांनी ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. शिवेसेनेचा एकेकाळी जिल्हाप्रमुख भूषविलेले व लोकसभेला बंडखोरी करून उभा राहिलेले पुरुषोत्तम जाधव यांनी ‘नमो-नमो’चा जयघोष धरला. फलटणमध्ये महायुतीत मतदारसंघ ‘स्वाभिमानी’ला जाईल, या हेतूने दिंगबर आगवणे यांनी धुमधडाक्यात काँग्रेसमधून बाहेर उडी मारली. पण, आघाडी आणि युती तुटल्याने त्यांनी परत गृहप्रवेश केला. फलटणमधीलच व जिल्हा परिषदचे माजी सदस्य पोपटराव काकडे यांनीही हात सोडून ‘स्वाभिमानी’ला जवळ केले. माणमध्ये काँग्रेसच्या शेखर गोरेंनी ‘कपबशी’ हातात घेतली. रणजितसिंह देशमुख यांनीही बदलत्या वातावरणात आपल्या ‘हातात’ धनुष्यबाण घेतला. दुसरीकडे डॉ. अतुल भोसले यांनी पाच वर्षांत दोनवेळा पक्ष बदलला. २००९ रोजी कऱ्हाड उत्तरमधून राष्ट्रवादीकडून पराभव पाहिल्यानंतर ‘हात’ धरला. या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी कऱ्हाड दक्षिणमधून हातात ‘कमळ’ घेतले. अशा घडामोडी घडल्या; पण त्यांना यश मात्र मिळालेच नाही. या निवडणुकीत मात्र तिघांना आपापल्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते घेण्यात यश आले आहे. मात्र, त्यांचा पराभव हा मोठ्या मताधिक्याने झाला, हेही विसरता येणार नाही. सातारा मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दीपक पवार यांना ४७ हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले. फलटणमध्ये दीपक चव्हाण यांच्याकडून आगवणे यांना ३३ हजारांनी मात खावी लागली. माणमध्ये पुन्हा ‘जय हो’चाच नारा झाला. जयकुमार गोरे यांनी आपल्या लहान भावाला सुमारे २३ हजार मतांनी हरविले. रणजितसिंह देशमुख चौथ्या क्रमांकावर राहिले. कऱ्हाड दक्षिणमध्ये डॉ. अतुल भोसले हे पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हान देत होते. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. वाईत पुरुषोत्तम जाधव व बावळेकर हे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. अटकळच राहिली... लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात कोठेही मोदी लाट दिसली नाही. आताही या निवडणुकीत भाजपची हवा निर्माण होऊन एखादी तरी जागा निवडून येईल, अशी भाजपकडून अटकळ बांधली जात होती; पण ती अटकळच राहिली. शिवसेनेनेही माणमधून रणजितसिंह देशमुख यांच्या हातात ‘धनुष्यबाण’ दिला. पण, तो त्यांना पेललाच नाही. देशमुख फक्त राजकीय हवा करण्यात यशस्वी ठरले.