शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

नवऱ्याच्या हाती फावडे...नवरीच्या हातात पाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:50 IST

सागर बाबर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुकुडवाड : महाराष्ट्रीयन परंपरेनुसार नवीन लग्न झाल्यानंतर दुसºया दिवशी कुलदैवत देव देवतांच्या दर्शनासाठी नवरा नवरी जाण्याची परंपरा या महाराष्ट्रात सध्या चालू आहे. मात्र माण तालुक्यातील शिवाजीनगर (कुकुडवाड) येथील नवविवाहित दाम्पत्याने लग्नाच्या दुसºयाच दिवशी देवदर्शनासाठी जाण्याऐवजी नवरदेव सोमनाथ यांनी असा निश्चय केला की नेहमीप्रमाणे आधी सकाळी श्रमदानाच्या ...

सागर बाबर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुकुडवाड : महाराष्ट्रीयन परंपरेनुसार नवीन लग्न झाल्यानंतर दुसºया दिवशी कुलदैवत देव देवतांच्या दर्शनासाठी नवरा नवरी जाण्याची परंपरा या महाराष्ट्रात सध्या चालू आहे. मात्र माण तालुक्यातील शिवाजीनगर (कुकुडवाड) येथील नवविवाहित दाम्पत्याने लग्नाच्या दुसºयाच दिवशी देवदर्शनासाठी जाण्याऐवजी नवरदेव सोमनाथ यांनी असा निश्चय केला की नेहमीप्रमाणे आधी सकाळी श्रमदानाच्या ठिकाणी जाऊन नवरदेव सोमनाथ व नवरी नीता यांनी हातात फावडे अन पाटी घेऊन जोडीने एकत्र श्रमदान केले व नंतर ते देव दर्शनासाठी गेले.माण तालुक्यातील शिवाजीनगर येथील नवरदेव सोमनाथ पंढरी भोसले याचे होळीचेगाव, ता. खटाव येथील नीता बाबासाहेब जगताप यांचा नुकताच विवाह सोहळा शिवाजीनगर येथे पार पडला. सध्या तालुक्यात गावागावात पाणी फांउडेशन वॉटर कप स्पर्धेचे तुफान आले आहे, असे असताना सोमनाथ व नीता या दोघांनी देव दर्शनाला जाण्यापूर्वी आपल्या शिवारात लोकांच्या समवेत हातात फावडे पाटी घेऊन जोडीने श्रमदान केले.पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा कुकुडवाड अंतर्गत शिवाजीनगर येथील लोकांनी स्पर्धेत सहभाग घेतला असून श्रमदानची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. असे असताना आपण घरी न बसता नवविवाहित नवदाम्पत्य यांनी इतर लोकांचा समवेत जाऊन श्रमदानाच्या ठिकाणी जोडीने लग्नातील पोषाखात श्रमदान केले.भविष्यात पाणीदार शिवाजीनगर गावचे आपणही साक्षीदार असू, या भावनेने व गावप्रेमापोटी लग्नाच्या दुसºयाच दिवशी मांडवातून नवरा नवरी फावडे, पाटी, टिकाव घेऊन थेट श्रमदानाच्या ठिकाणी पोहचले. सकाळी दोन तास भर उन्हात या नवदाम्पत्यांनी श्रमदान केले. नंतर नववधूची माणदेशी मातीने ओटी भरण्यात आली.सत्यमेव जयते संगे दुष्काळावर मातदुष्काळावर मात करण्यासाठी येथील जनता जीवाचा आटापिटा करत आहे. नक्कीच दुष्काळाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. या ‘सत्यमेव जयते’ पाणी फौंडेशन वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने दुष्काळावर मात करण्यासाठी या नवदाम्पत्याने आपला जोडीने सहभाग नोंदवून केलेल्या कार्याची जाण येथील जनतेला करून दिली. या त्यांच्या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.