शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नवऱ्याच्या हाती फावडे...नवरीच्या हातात पाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:50 IST

सागर बाबर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुकुडवाड : महाराष्ट्रीयन परंपरेनुसार नवीन लग्न झाल्यानंतर दुसºया दिवशी कुलदैवत देव देवतांच्या दर्शनासाठी नवरा नवरी जाण्याची परंपरा या महाराष्ट्रात सध्या चालू आहे. मात्र माण तालुक्यातील शिवाजीनगर (कुकुडवाड) येथील नवविवाहित दाम्पत्याने लग्नाच्या दुसºयाच दिवशी देवदर्शनासाठी जाण्याऐवजी नवरदेव सोमनाथ यांनी असा निश्चय केला की नेहमीप्रमाणे आधी सकाळी श्रमदानाच्या ...

सागर बाबर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुकुडवाड : महाराष्ट्रीयन परंपरेनुसार नवीन लग्न झाल्यानंतर दुसºया दिवशी कुलदैवत देव देवतांच्या दर्शनासाठी नवरा नवरी जाण्याची परंपरा या महाराष्ट्रात सध्या चालू आहे. मात्र माण तालुक्यातील शिवाजीनगर (कुकुडवाड) येथील नवविवाहित दाम्पत्याने लग्नाच्या दुसºयाच दिवशी देवदर्शनासाठी जाण्याऐवजी नवरदेव सोमनाथ यांनी असा निश्चय केला की नेहमीप्रमाणे आधी सकाळी श्रमदानाच्या ठिकाणी जाऊन नवरदेव सोमनाथ व नवरी नीता यांनी हातात फावडे अन पाटी घेऊन जोडीने एकत्र श्रमदान केले व नंतर ते देव दर्शनासाठी गेले.माण तालुक्यातील शिवाजीनगर येथील नवरदेव सोमनाथ पंढरी भोसले याचे होळीचेगाव, ता. खटाव येथील नीता बाबासाहेब जगताप यांचा नुकताच विवाह सोहळा शिवाजीनगर येथे पार पडला. सध्या तालुक्यात गावागावात पाणी फांउडेशन वॉटर कप स्पर्धेचे तुफान आले आहे, असे असताना सोमनाथ व नीता या दोघांनी देव दर्शनाला जाण्यापूर्वी आपल्या शिवारात लोकांच्या समवेत हातात फावडे पाटी घेऊन जोडीने श्रमदान केले.पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा कुकुडवाड अंतर्गत शिवाजीनगर येथील लोकांनी स्पर्धेत सहभाग घेतला असून श्रमदानची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. असे असताना आपण घरी न बसता नवविवाहित नवदाम्पत्य यांनी इतर लोकांचा समवेत जाऊन श्रमदानाच्या ठिकाणी जोडीने लग्नातील पोषाखात श्रमदान केले.भविष्यात पाणीदार शिवाजीनगर गावचे आपणही साक्षीदार असू, या भावनेने व गावप्रेमापोटी लग्नाच्या दुसºयाच दिवशी मांडवातून नवरा नवरी फावडे, पाटी, टिकाव घेऊन थेट श्रमदानाच्या ठिकाणी पोहचले. सकाळी दोन तास भर उन्हात या नवदाम्पत्यांनी श्रमदान केले. नंतर नववधूची माणदेशी मातीने ओटी भरण्यात आली.सत्यमेव जयते संगे दुष्काळावर मातदुष्काळावर मात करण्यासाठी येथील जनता जीवाचा आटापिटा करत आहे. नक्कीच दुष्काळाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. या ‘सत्यमेव जयते’ पाणी फौंडेशन वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने दुष्काळावर मात करण्यासाठी या नवदाम्पत्याने आपला जोडीने सहभाग नोंदवून केलेल्या कार्याची जाण येथील जनतेला करून दिली. या त्यांच्या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.