शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याच्या हाती फावडे...नवरीच्या हातात पाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:50 IST

सागर बाबर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुकुडवाड : महाराष्ट्रीयन परंपरेनुसार नवीन लग्न झाल्यानंतर दुसºया दिवशी कुलदैवत देव देवतांच्या दर्शनासाठी नवरा नवरी जाण्याची परंपरा या महाराष्ट्रात सध्या चालू आहे. मात्र माण तालुक्यातील शिवाजीनगर (कुकुडवाड) येथील नवविवाहित दाम्पत्याने लग्नाच्या दुसºयाच दिवशी देवदर्शनासाठी जाण्याऐवजी नवरदेव सोमनाथ यांनी असा निश्चय केला की नेहमीप्रमाणे आधी सकाळी श्रमदानाच्या ...

सागर बाबर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुकुडवाड : महाराष्ट्रीयन परंपरेनुसार नवीन लग्न झाल्यानंतर दुसºया दिवशी कुलदैवत देव देवतांच्या दर्शनासाठी नवरा नवरी जाण्याची परंपरा या महाराष्ट्रात सध्या चालू आहे. मात्र माण तालुक्यातील शिवाजीनगर (कुकुडवाड) येथील नवविवाहित दाम्पत्याने लग्नाच्या दुसºयाच दिवशी देवदर्शनासाठी जाण्याऐवजी नवरदेव सोमनाथ यांनी असा निश्चय केला की नेहमीप्रमाणे आधी सकाळी श्रमदानाच्या ठिकाणी जाऊन नवरदेव सोमनाथ व नवरी नीता यांनी हातात फावडे अन पाटी घेऊन जोडीने एकत्र श्रमदान केले व नंतर ते देव दर्शनासाठी गेले.माण तालुक्यातील शिवाजीनगर येथील नवरदेव सोमनाथ पंढरी भोसले याचे होळीचेगाव, ता. खटाव येथील नीता बाबासाहेब जगताप यांचा नुकताच विवाह सोहळा शिवाजीनगर येथे पार पडला. सध्या तालुक्यात गावागावात पाणी फांउडेशन वॉटर कप स्पर्धेचे तुफान आले आहे, असे असताना सोमनाथ व नीता या दोघांनी देव दर्शनाला जाण्यापूर्वी आपल्या शिवारात लोकांच्या समवेत हातात फावडे पाटी घेऊन जोडीने श्रमदान केले.पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा कुकुडवाड अंतर्गत शिवाजीनगर येथील लोकांनी स्पर्धेत सहभाग घेतला असून श्रमदानची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. असे असताना आपण घरी न बसता नवविवाहित नवदाम्पत्य यांनी इतर लोकांचा समवेत जाऊन श्रमदानाच्या ठिकाणी जोडीने लग्नातील पोषाखात श्रमदान केले.भविष्यात पाणीदार शिवाजीनगर गावचे आपणही साक्षीदार असू, या भावनेने व गावप्रेमापोटी लग्नाच्या दुसºयाच दिवशी मांडवातून नवरा नवरी फावडे, पाटी, टिकाव घेऊन थेट श्रमदानाच्या ठिकाणी पोहचले. सकाळी दोन तास भर उन्हात या नवदाम्पत्यांनी श्रमदान केले. नंतर नववधूची माणदेशी मातीने ओटी भरण्यात आली.सत्यमेव जयते संगे दुष्काळावर मातदुष्काळावर मात करण्यासाठी येथील जनता जीवाचा आटापिटा करत आहे. नक्कीच दुष्काळाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. या ‘सत्यमेव जयते’ पाणी फौंडेशन वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने दुष्काळावर मात करण्यासाठी या नवदाम्पत्याने आपला जोडीने सहभाग नोंदवून केलेल्या कार्याची जाण येथील जनतेला करून दिली. या त्यांच्या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.