शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांच्या शिवभोजनासाठी सरसावले दातृत्वाचे हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:29 IST

सातारा : जिल्ह्यातील जी जनता भोजनाच्या माध्यमातून एक वेळची भूक भागवत होती, त्या गोरगरीब जनतेला जेवण मोफत देण्याचा अनोखा ...

सातारा : जिल्ह्यातील जी जनता भोजनाच्या माध्यमातून एक वेळची भूक भागवत होती, त्या गोरगरीब जनतेला जेवण मोफत देण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आणि बघता बघता दातृत्वाचे असंख्य हात पुढे येऊ लागले. येथील कल्याणी विद्यालयाच्या १९९९ मधील बॅचच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे मदत सुपूर्द केली.

गोरगरीब जनतेला एक वेळेचे मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, याचा लाभ जनता घेत आहे. आता सातारा शहरातील शिवभोजन थाळी व्यावसायिकांनी रात्रीच्या वेळचे जेवणदेखील देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडे मदतीचा ओघ येऊ लागला.

रात्रीच्या वेळच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी शिवभोजन चालकांकडून कोणत्याही अनुदानाची अथवा मोबदल्याची अपेक्षा न करता सेवाभावी वृत्तीने जेवण वाटप करण्याचे ठरवले आहे. यामध्ये मुख्यतः सातारा शहरातील विविध प्रभागांतील झोपडपट्टीमधील गरीब व गरजू व्यक्ती पुलाखाली मुक्काम करणारे तसेच एसटी स्टँडवरून काम करणारे बेघर लोक, फिरस्ते कारागीर मजूर यांचा समावेश असेल.

जिल्हा प्रशासनाने शिवभोजन थाळी दोन्ही वेळेस मोफत लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा सन १९९९ च्या विद्यार्थ्यांनी ५०० किलो तांदूळ, ९० किलो मूगडाळ व ९० लिटर सोयाबीन तेल आपला खारीचा वाटा म्हणून आज ३१ मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांच्या कार्यालयात माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांना उपलब्ध करून दिले आहे. याकामी शाळेचे माजी विद्यार्थी सागर कारंडे, तानाजी भणगे, सचिन खाडे, विजय कांबळे, अपर्णा लोखंडे, शैलजा शिरसवडे व अन्य मित्र-मैत्रिणींनी विशेष प्रयत्न केले.

यांना खरंच गरज आहे...

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचे सध्या हात बंद आहेत. त्यांना अनेकदा एका वेळेच्या जेवणावरच भागवावे लागते. शासनाने शिवभोजन यानिमित्ताने त्यांच्या एक वेळच्या जेवणाची सोय केली, पण पोटाची भूक ही किमान दोन वेळा तरी माणसाला भागवावी लागते. रात्रीच्या जेवणाची सोय जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेतला. या लोकांना खरंच अन्नाची गरज आहे.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांच्याकडे अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत सुपूर्द केली.