शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

गोरगरिबांच्या शिवभोजनासाठी सरसावले दातृत्वाचे हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:29 IST

सातारा : जिल्ह्यातील जी जनता भोजनाच्या माध्यमातून एक वेळची भूक भागवत होती, त्या गोरगरीब जनतेला जेवण मोफत देण्याचा अनोखा ...

सातारा : जिल्ह्यातील जी जनता भोजनाच्या माध्यमातून एक वेळची भूक भागवत होती, त्या गोरगरीब जनतेला जेवण मोफत देण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आणि बघता बघता दातृत्वाचे असंख्य हात पुढे येऊ लागले. येथील कल्याणी विद्यालयाच्या १९९९ मधील बॅचच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे मदत सुपूर्द केली.

गोरगरीब जनतेला एक वेळेचे मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, याचा लाभ जनता घेत आहे. आता सातारा शहरातील शिवभोजन थाळी व्यावसायिकांनी रात्रीच्या वेळचे जेवणदेखील देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडे मदतीचा ओघ येऊ लागला.

रात्रीच्या वेळच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी शिवभोजन चालकांकडून कोणत्याही अनुदानाची अथवा मोबदल्याची अपेक्षा न करता सेवाभावी वृत्तीने जेवण वाटप करण्याचे ठरवले आहे. यामध्ये मुख्यतः सातारा शहरातील विविध प्रभागांतील झोपडपट्टीमधील गरीब व गरजू व्यक्ती पुलाखाली मुक्काम करणारे तसेच एसटी स्टँडवरून काम करणारे बेघर लोक, फिरस्ते कारागीर मजूर यांचा समावेश असेल.

जिल्हा प्रशासनाने शिवभोजन थाळी दोन्ही वेळेस मोफत लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा सन १९९९ च्या विद्यार्थ्यांनी ५०० किलो तांदूळ, ९० किलो मूगडाळ व ९० लिटर सोयाबीन तेल आपला खारीचा वाटा म्हणून आज ३१ मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांच्या कार्यालयात माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांना उपलब्ध करून दिले आहे. याकामी शाळेचे माजी विद्यार्थी सागर कारंडे, तानाजी भणगे, सचिन खाडे, विजय कांबळे, अपर्णा लोखंडे, शैलजा शिरसवडे व अन्य मित्र-मैत्रिणींनी विशेष प्रयत्न केले.

यांना खरंच गरज आहे...

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचे सध्या हात बंद आहेत. त्यांना अनेकदा एका वेळेच्या जेवणावरच भागवावे लागते. शासनाने शिवभोजन यानिमित्ताने त्यांच्या एक वेळच्या जेवणाची सोय केली, पण पोटाची भूक ही किमान दोन वेळा तरी माणसाला भागवावी लागते. रात्रीच्या जेवणाची सोय जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेतला. या लोकांना खरंच अन्नाची गरज आहे.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांच्याकडे अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत सुपूर्द केली.