शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

बडी धेंडे सोडून गोरगरिबांवर हातोडा

By admin | Updated: November 14, 2014 23:20 IST

अजब मोहीम : शस्त्रे पालिकेत; अतिक्रमण हटवणारी टीम रणांगणात

सातारा : ‘कोणताही दुजाभाव न ठेवता शहरातील सर्व अतिक्रमणे काढली जातील,’ असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितल्यानंतर ही अतिक्रमण मोहीम ‘आर या पार’ अशी भूमिका घेऊन रणांगणात उतरेल, असे समस्त सातारकरांना वाटले होते; मात्र ते सपशेल फोल ठरले. म्हणे, युद्धभूमीवर जाताना शस्त्रे सोबत घेऊन जावे लागते; परंतु आपल्या पालिकेचे कर्मचारी मात्र शस्त्रे म्यान करून रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेली अतिक्रमण मोहीम म्हणजे ‘गरीब हटाव; श्रीमंत बचाव’ अशीच आहे.शहरात तब्बल ४९९ अतिक्रमण असल्याचे समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दीड दिवस लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तत्काळ अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यास सांगितले. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून शहरात अतिक्रमण मोहीम सुरू आहे. परंतु ही मोहीम नेमकी कशी सुरू आहे, याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता. ही मोहीमही पारंपरिकच वाटली. म्हणजे, या मोहिमेत आक्रमता नाही. वर्षातून एक-दोनवेळा मोहीम हाती घ्यायची आणि परत गुंडाळायची, अशीच या मोहिमेची स्थिती आहे. थातूरमातूर पानटपऱ्या, वडापावचे गाडे, झोपड्या या व्यतिरिक्त ही मोहीम पुढे सरकलीच नाही. जी अतिक्रमण हाताने काढण्यासारखी आहेत. त्यालाच हे कर्मचारी प्राध्यान्य देत आहेत. या मोहिमेला बुलडोजर उपलब्ध झाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचाही नाईलाज आहे. परंतु, बुलडोजरशिवाय अतिक्रमण मोहीम सुरू करणे पालिकेचे कर्मचारी विचारही करू शकत नाहीत. परंतु अशी मोठी ‘शस्त्रे’ घरी ठेवून मोहिमेत उतरून पालिकेच्या हाती काही लागणार नाही, हेही कर्मचारी जाणून आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला असणारी अतिक्रमणे ही भुईचक्राप्रमाणे उगवत असतात. पुढे अतिक्रमण काढत गेल्यानंतर काही दिवसांतच ती पुन्हा उभारी घेतात. हे सर्वश्रूत आहे; परंतु ज्यांनी खरोखरच अवैध बांधकाम करून पालिकेची जागा बळकावली आहे. अशा लोकांचे अतिक्रमण काढताना बुलडोजरशिवाय पर्याय नाही. हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोण सांगणार.शुक्रवारी अतिक्रमण मोहिमेदरम्यान एक किस्सा घडला. बुलडोजरची किती निंतात गरज आहे, हे आपल्या लक्षात येईल. पाचशे एक पाटीजवळील एक किराणा मालाचे दुकान सिमेंट काँक्रीटमध्ये बांधकाम करण्यात आले आहे. हे दुकान जमीनदोस्त करायचे असल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेचे कर्मचारी तेथे पोहोचले. त्या दुकानातील लोकांना त्यांनी साहित्य बाजूला करायला सांगितले. तर त्यांनी ‘करतो’, असे सांगून टाईमपास सुरू केला. पालिकेचे कर्मचारी मात्र त्यांच्याकडे बघत बसले. बुलडोजर असता तर त्याच्या धाकाने दुकानदाराने आपले साहित्य लगेच गुंडाळून ठेवले असते. बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडे साहित्य काहीच नाही, हे त्या दुकानदारालाही माहीत होते. शेवटी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा रागरंग पाहिल्यानंतर त्या दुकानदाराने दुकानाला स्वत: हून टाळे ठोकले. डोळ्यादेखत हा प्रकार घडत असताना कर्मचाऱ्यांना काहीच करता आले नाही. ‘परत येतो,’ असे म्हणून कर्मचाऱ्यांना दुसरे ठिकाण शोधावे लागले. (प्रतिनिधी)धनदांडग्यावर बुलडोजर कधी फिरणार पालिकेने अतिक्रमण मोहीम सुरू केली आहे, याचे सगळ्यानांच समाधान आहे. मात्र, ही मोहीम सुरू होऊन चार दिवस झाले. या चार दिवसांत पालिकेच्या खात्यात केवळ पाच-सात अतिक्रमणे पडली आहेत. यामध्ये एक झोपडी, एक टेरेस, गॅरेज आणि एक दोन पानटपऱ्या या शिवाय काहीच नाही. धनदांडगे मात्र कोसोदूर आहेत. तोंड पाहून की केवळ राजकीय द्वेषातून ही मोहीम सुरू आहे, याची नागरिकांना शंका येऊ लागली आहे. सरसकट सगळ्यांवर बुलडोजर फिरला तर पालिकेकडे बोट दाखविण्यास जागा उरायची नाही. गोरगरिबांना रस्त्यावर आणताना धनदांडग्यांचीही यातून सुटका होता कामा नये, एवढीच सातारकरांची अपेक्षा आहे.ज्या लोकांनी अवैध बांधकाम केले आहे, अशा लोकांचेच आम्ही अतिक्रमण काढत आहे. यामध्ये कसलाही भेदभाव केला जात नाही. अजून अतिक्रमण मोहीम सुरू आहे. ज्यांची यादीत नावे आहेत. त्यांची नक्कीच अतिक्रमणे काढली जातील.-अभिजित बापट,मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका