शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

गुरुजींचा मुक्काम मुख्यालयी नाहीच...

By admin | Updated: January 10, 2015 00:11 IST

आदेश कागदावरच : अहवाल पाठवूनही तपासणी यंत्रणा नसल्याने शाशंकता

किरण मस्कर -कोतोली -प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीत शिक्षकांचे शाळा परिसरात मुक्काम नसणे अडथळा ठरत आहेत. शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी मुक्कामास असावे, हा नियम धाब्यावर बसविला जात आहे. मात्र, ८५ टक्के शिक्षक गावात राहतात, असा अहवाल तयार करून वरिष्ठांना देण्यात आला आहे. शिक्षक शाळा परिसरात राहतात किंवा नाही हे तपासणारी यंत्रणाच नसल्याने या अहवालाबाबत साशंकता आहे. जिल्हा परिषद स्थायी समिती व सर्वसाधारण सभेतही गुरुजींचा मुक्काम गावात असावा, अशा चर्चा अन् ठरावही झाले. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे गुरुजी आपल्या गावात अन् विद्यार्थी शाळांत, अशी अवस्था झाली आहे. शिक्षकांच्या मागण्यांसाठी आग्रही संघटना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत गप्प आहेत. शिक्षक गावात मुक्कामाला आहेत, की नाही याची उलटतपासणी करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. त्याची गटशिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुरुजी नेमणुकीच्या गावी मुक्कामाला आहेत, असे अहवाल व कागदोपत्री आकडेवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येते. ग्रामसेवक व सरपंचांच्या स्वाक्षरीची पत्रे शिक्षक रहिवासासाठी पुरेशी आहेत, असे असले तरी वास्तवात गावात मुक्कामास नसताना अनेक शिक्षक कागदोपत्रीच गावात राहत आहेत. तरीही पगाराच्या दहा टक्के रहिवास भत्ता शासनाकडून घेतला जातो. त्यासाठी लाखो रुपये शासनाचे खर्च होतात. सर्वसाधारण सभेत शिक्षक गावात मुक्कामास नसताना बोगस दाखला दिल्यास संबंधित ग्रामसेवकाला जबाबदार धरण्याचा ठराव झाला. त्याचीही अमंलबजावणी झालेली नाही. पंचायत राज समिती (पिआरसी)च्या दौऱ्यावेळी सरकारी आणि शिक्षक मुक्कामी असतात का, हाच कळीचा मुद्दा आहे. मात्र, मुक्कामी असल्याचा सरपंचांचा दाखला मिळवायचा आणि पंचायत राज समिती सदस्यांच्या डोळ्यांत धुळफेक करायची, असे उद्योग नेहमीच केले जातात. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास विशेष उपक्रम हाती घेतले. यात पटसंख्या वाढ, एक दिवस शाळेसाठी, शाळा श्रेणीसह विविध उपक्रमांचा समावेश होता. शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन त्यांनी उपक्रम राबविल्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत झाली. मात्र, पटसंख्येची घसरण सुरूच राहिली. मात्र, गुरुजींचा मुक्काम आदेश कागदावर, अमंलबजावणीकडे डोळेझाक आणि गुरुजी गावाऐवजी आपल्या घरीच मुक्कामाला, अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने बोगस दाखला देऊन गावीच राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याची गरज आहे.‘शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीत अडथळापन्हाळा तालुक्यात एकूण ८४० शिक्षक काम करीत आहेत. या सर्वच शिक्षकांनी आपण ज्या ठिकाणी काम करीत आहे. त्या ठिकाणचे सर्टिफिकेट दिले आहे; पण ज्या ठिकाणी काम करणारे शिक्षक राहत नाहीत, अशा शिक्षकांवर कारवाई निश्चितच होणार; पण कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठांना असून, आमच्या खात्यामार्फत शिक्षक राहत असल्याचा कोणताही सर्व्हे झालेला नाही.’- एस. एम. मानकर, प्र. गटशिक्षणाधिकारी, पन्हाळा.पन्हाळा तालुक्यात एकूण ८४० शिक्षक कार्यरत.सर्वांनीच दिले शाळेच्या ठिकाणी राहत असल्याचे दाखले. सर्वांनाच मिळतो दहा टक्के घरभाडे भत्ता.दरमहा लाखो रुपये जातात शिक्षकांना घरभाडे भत्त्यासाठी.अद्याप एकदाही शिक्षक राहत असल्याचा सर्व्हे झालाच नाही. शाळेच्या ठिकाणी राहत नसलेल्या शिक्षकांवर कारवाई होणार का?