शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भरवर्गात गुरूजींना सोशल मिडीयाचे वेड!

By admin | Updated: July 14, 2015 21:26 IST

शाळांतील स्थिती : ज्ञानदान करतानाच खणाणतोय मोबाईल; आदेशाची पायमल्ली

कऱ्हाड : शहरातील नागरिकांना ग्रामीण भागातून आलेला ताजा भाजीपाला विकत घ्यावा यासाठी पालिकेने शहरात तीन ठिकाणी भाजी मंडई बांधली. त्यातून शेतकरी दररोज आपल्या शेती मालाची विक्री करू लागला. भाजी विक्रेत्यांनी पालिकेने एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गंत १९८४ साली बांधलेल्या संभाजी भाजी मार्केटमध्ये भाजी विक्री करण्यास विरोध दर्शवत पुन्हा आपल्या शेतीमालाची विक्री गुजर हॉस्पीटल परिसरातील रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेत शेतकरी बसू लागले आहेत. त्यामुळे एकीकडे लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले संभाजी भाजी मार्केट ओस पडून राहत आहे. तर दुसरीकडे शेतकरी मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून आपला शेतीमाल विकत असल्याने वाहतूक कोंडींसारख्या समस्या उद्भवत आहेत. शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी भाजी मार्केटला समांतर पर्याय म्हणून कऱ्हाड नगरपालिकेने छत्रपती संभाजी मार्केट बांधून त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी सोय केली. त्यातून सुरूवातीला भाजीमार्केट चांगले चालले. नंतर मात्र, या ठिकाणी धंदा होत नसल्याने भाजी विके्रत्यांनी पाठ फिरवल्याने हे मार्केट कायमचे बंद झाले. पालिकेने जवळपास तीनवेळा हे मार्केट सुरू करण्याचा प्रयत्नही केला पण त्यास यश आले नाही. मात्र, प्रत्येकवेळी असाच प्रकार घडत असल्याने पालिकेने केलेला खर्च हा ‘क चऱ्यात ’ गेला आहे. संभाजी मार्केट सुरू ठेवण्यासाठी रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवर अनेकवेळा पालिकेने कारवाईचा बडगाही उगारला. पालिकेने भाजी विक्रेत्यांवर सक्ती करत त्यांनी आपला शेतीमाल प्रत्येक रविवार व गुरूवारी बाजाराच्या दिवशी संभाजी भाजी मार्केटमध्येच बसून विकावा अशा सुचना केल्या. त्यासाठी पूर्वीच्या जागी भाजी विक्रेत्यांचे गाडे, ठिकाण हे उद्वस्थही केले. त्यानंतर थोडी दिवस शेतकरीही या ठिकाणी बसून आपला शेती माल विकू लागले. मात्र, आता याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसून भाजी विक्री करत आहेत.पालिकेने नवीन बांधलेली भाजी मंडई इमारत अपुरी पडत असून त्या ठिकाणी अद्यापही काही सोयी उभारण्यात आल्या नाहीत. संभाजी मार्केट या ठिकाणीही अशाच प्रकारची गैरसोय शेतकऱ्यांची होत असल्याने या ठिकाणी आपला धंदा ही होत नसून आर्थिक तोटा सहन करावा लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी न बसण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी पुन्हा गुजर हॉस्पीटल परिसरात बसून आपला भाजीविक्रीचा धंदा सुरू केला आहे. भाजी मंडईमध्ये साचत असलेल्या कचऱ्यापासून अनेक आजारांचा फैलाव होत आहे. ताजा माल असूनही भाज्यांवर बसणाऱ्या माश्यांमुळे व जवळच्या कचऱ्यामुळे आजार होण्याच्या भितीने नागरिकांकडून भाजी खरेदी केला जात नाही. त्याचा तोटा शेतकरी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. पालिका अन् शेतकरी यांच्यातील वादामुळे भाजी मार्केटचा प्रश्न मात्र अजूनही अधांतरी आहे. भाजी मार्के टमध्ये सर्व सुविधा उभारल्या असल्याचे पालिका सांगत आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी आपला धंदा होत नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी बसण्यास नकार दिला आहे. (प्रतिनिधी)इमारतीत व्यवसाय होत नाहीपालिकेच्या संभाजी भाजी मार्केटमध्ये इमातीमध्ये लोक येत नाहीत. तसेच होलसेल भावाने मालाची विक्री काही विक्रेत्यांकडून केली जात असल्याने दिवसाला दहा किलोही माल इमारतीमध्ये बसल्यावर विकला जात नाही. त्यामुळे बाहेर बसावे लागते, अशी प्रतिक्रिया टेंभूतील एका शेतकरी विक्रेत्याने दिली. मात्र, संबंधित विक्रेत्याने आपले नाव सांगण्यास नकार दिला.