शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

भरवर्गात गुरूजींना सोशल मिडीयाचे वेड!

By admin | Updated: July 14, 2015 21:26 IST

शाळांतील स्थिती : ज्ञानदान करतानाच खणाणतोय मोबाईल; आदेशाची पायमल्ली

कऱ्हाड : शहरातील नागरिकांना ग्रामीण भागातून आलेला ताजा भाजीपाला विकत घ्यावा यासाठी पालिकेने शहरात तीन ठिकाणी भाजी मंडई बांधली. त्यातून शेतकरी दररोज आपल्या शेती मालाची विक्री करू लागला. भाजी विक्रेत्यांनी पालिकेने एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गंत १९८४ साली बांधलेल्या संभाजी भाजी मार्केटमध्ये भाजी विक्री करण्यास विरोध दर्शवत पुन्हा आपल्या शेतीमालाची विक्री गुजर हॉस्पीटल परिसरातील रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेत शेतकरी बसू लागले आहेत. त्यामुळे एकीकडे लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले संभाजी भाजी मार्केट ओस पडून राहत आहे. तर दुसरीकडे शेतकरी मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून आपला शेतीमाल विकत असल्याने वाहतूक कोंडींसारख्या समस्या उद्भवत आहेत. शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी भाजी मार्केटला समांतर पर्याय म्हणून कऱ्हाड नगरपालिकेने छत्रपती संभाजी मार्केट बांधून त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी सोय केली. त्यातून सुरूवातीला भाजीमार्केट चांगले चालले. नंतर मात्र, या ठिकाणी धंदा होत नसल्याने भाजी विके्रत्यांनी पाठ फिरवल्याने हे मार्केट कायमचे बंद झाले. पालिकेने जवळपास तीनवेळा हे मार्केट सुरू करण्याचा प्रयत्नही केला पण त्यास यश आले नाही. मात्र, प्रत्येकवेळी असाच प्रकार घडत असल्याने पालिकेने केलेला खर्च हा ‘क चऱ्यात ’ गेला आहे. संभाजी मार्केट सुरू ठेवण्यासाठी रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवर अनेकवेळा पालिकेने कारवाईचा बडगाही उगारला. पालिकेने भाजी विक्रेत्यांवर सक्ती करत त्यांनी आपला शेतीमाल प्रत्येक रविवार व गुरूवारी बाजाराच्या दिवशी संभाजी भाजी मार्केटमध्येच बसून विकावा अशा सुचना केल्या. त्यासाठी पूर्वीच्या जागी भाजी विक्रेत्यांचे गाडे, ठिकाण हे उद्वस्थही केले. त्यानंतर थोडी दिवस शेतकरीही या ठिकाणी बसून आपला शेती माल विकू लागले. मात्र, आता याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसून भाजी विक्री करत आहेत.पालिकेने नवीन बांधलेली भाजी मंडई इमारत अपुरी पडत असून त्या ठिकाणी अद्यापही काही सोयी उभारण्यात आल्या नाहीत. संभाजी मार्केट या ठिकाणीही अशाच प्रकारची गैरसोय शेतकऱ्यांची होत असल्याने या ठिकाणी आपला धंदा ही होत नसून आर्थिक तोटा सहन करावा लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी न बसण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी पुन्हा गुजर हॉस्पीटल परिसरात बसून आपला भाजीविक्रीचा धंदा सुरू केला आहे. भाजी मंडईमध्ये साचत असलेल्या कचऱ्यापासून अनेक आजारांचा फैलाव होत आहे. ताजा माल असूनही भाज्यांवर बसणाऱ्या माश्यांमुळे व जवळच्या कचऱ्यामुळे आजार होण्याच्या भितीने नागरिकांकडून भाजी खरेदी केला जात नाही. त्याचा तोटा शेतकरी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. पालिका अन् शेतकरी यांच्यातील वादामुळे भाजी मार्केटचा प्रश्न मात्र अजूनही अधांतरी आहे. भाजी मार्के टमध्ये सर्व सुविधा उभारल्या असल्याचे पालिका सांगत आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी आपला धंदा होत नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी बसण्यास नकार दिला आहे. (प्रतिनिधी)इमारतीत व्यवसाय होत नाहीपालिकेच्या संभाजी भाजी मार्केटमध्ये इमातीमध्ये लोक येत नाहीत. तसेच होलसेल भावाने मालाची विक्री काही विक्रेत्यांकडून केली जात असल्याने दिवसाला दहा किलोही माल इमारतीमध्ये बसल्यावर विकला जात नाही. त्यामुळे बाहेर बसावे लागते, अशी प्रतिक्रिया टेंभूतील एका शेतकरी विक्रेत्याने दिली. मात्र, संबंधित विक्रेत्याने आपले नाव सांगण्यास नकार दिला.