शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

By admin | Updated: April 27, 2016 00:54 IST

भारिपचा इशारा : दिसतील तिथे घेराव घालणार; दुष्काळप्रश्नावरून संतप्त वातावरण

सातारा : जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असताना पालकमंत्री विजय शिवतारे यांना त्याचे गांभीर्य नाही. त्यांनी उपाययोजना करण्याच्या हालचाली केल्या नाहीत. तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी दिला आहे.जिल्ह्यातील वाई, जावळी, पाटण, सातारा तालुक्यातील डोंगराळ भागातील अनेक गावांना दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्याचबरोबर खटाव, माण, खंडाळा या कायमच दुष्काळग्रस्त असलेल्या भागांमध्ये आज पाण्याबरोबरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, शासनाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पालकमंत्री शिवतारे यांना याचे गांभीर्य नाही.ते युवक आघाडीने आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते. या बैठकीत विविध तालुक्यांतून आलेल्या युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देऊन सरकारला जाब विचारण्याचा निश्चय केला आहे.भारिप युवक आघाडीच्या वतीने शिवतारे जेथे सापडतील तेथे त्यांना घेराव घालून याबद्दल जाब विचारणार आहे, अशी माहिती सूरज गायकवाड, संतोष उघडे, बाळासाहेब कांबळे, दीपक सोनवणे, संतोष अंडागळे, अक्षय साळवी, मनोज गायकवाड, अक्षय भोसले आदी विविध तालुका युवा अध्यक्षांनी दिली. या बैठकीस मयुर गायकवाड, अनिल वानखेडे, आकाश भोसले, कमलाकर खंडागळे, संजय खंडागळे, सुमित उघडे, अजित कांबळे, रोहित रणबागले, जयवंत रणबागले, गोरक्षनाथ माने, विक्रम माने, अजय भोसले, संतोष कांबळे, प्रदीप कांबळे आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार जिल्हा युवक उपाध्यक्ष उमेश वाघमारे यांनी मानले. (प्रतिनिधी)