शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘पालक’मंत्र्यासाठी म्हणे हातगाडेधारक ‘बेवारस’

By admin | Updated: December 15, 2015 23:40 IST

विसावा नाका : लाल दिव्याची गाडी येणार म्हणून हटविले होते अतिक्रमण

सातारा : येथील जिल्हा परिषद ते विसावा नाका परिसरातील मागील काही वर्षांपासून हातगाड्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचे कारण सांगून पालिकेने अतिक्रमण काढले. यावेळी सर्व गाडेधारकांचे लवकरच पुनर्वसन करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले होते. परंतु, आज अखेर यांचे पुनर्वसन झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सातारा-कोरेगाव हा रस्ता चौपदीकरण करण्याची मध्यंतरी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्यात आली होती. यामध्ये फळ, वडापाव, चायनीज आदी हातगाडेधारकांचा समावेश आहे. त्यावेळी त्यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु पुनर्वसन न झाल्याने मिळेल त्या जागी हातगाड्या टाकून व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू ठेवला. त्यापैकी बहुतांशी व्यावसायिक जिल्हा परिषदेच्या चौकाला पसंती दिली. याठिकाणी शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडापाव, ज्यूस, फ्रुट विक्रेते, चायनिज अन्य हातगाड्यांचे अतिक्रमण होत गेले. अनेकांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी मागणीही केली होती. परंतु व्यावसायिकांच्या एकीने पर्याय जागा देणाऱ्याचा आग्रह धरला. पालकमंत्र्यांचा दौरा असून, चौकातील अतिक्रमण काही दिवसांसाठी काढा असे सांगून या चौकातील सर्व विक्रेते अतिक्रमण पालिकेने काढले आहे. सतत व्यवसायाची जागा बदलत असल्याने व्यावसायिकांना नुकसान होत आहे. पालिकेने पर्यायी जागा घ्यावा किंवा आम्हा सर्वांत पुनर्वसन करा. अशी मागणी आता येथील व्यावसायिकांतून होत आहे. अतिक्रमण काढल्याने अनेक मागण्या येथील फुटपाथवर अस्ताव्यस्त पडल्या असून, आज ना उद्या जागा मिळेल या अपेक्षेने व्यावसायिक हातगाड्यावरच बसून वाट पाहत आहेत. (प्रतिनिधी)व्यावसायिकांना पर्यायी जागा हवीय...सातारा-कोरेगाव रस्त्यावर पालिकेने आरक्षित केलेल्या काही जागा आहेत. सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढली आहेत. पालिकेने या जागा स्वच्छ करून रस्त्यावरील हातगाडीधारकांचे पुर्नवसन येथे केले तर त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही आणि ग्राहकांनाही एकाच ठिकाणी सर्व मिळेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.रोजच्या दडपणाला आता कंटाळलोय!हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना कायमची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे. ‘रोजच्या या दडपणाला आता आम्ही कंटाळलोय, काहीही करा आणि आम्हाला एकच सुरक्षित जागा द्या’ अशी आर्जव या व्यावसायिकांनी ‘लोकमत’कडे केली आहे.