शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

‘पालक’मंत्र्यासाठी म्हणे हातगाडेधारक ‘बेवारस’

By admin | Updated: December 15, 2015 23:40 IST

विसावा नाका : लाल दिव्याची गाडी येणार म्हणून हटविले होते अतिक्रमण

सातारा : येथील जिल्हा परिषद ते विसावा नाका परिसरातील मागील काही वर्षांपासून हातगाड्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचे कारण सांगून पालिकेने अतिक्रमण काढले. यावेळी सर्व गाडेधारकांचे लवकरच पुनर्वसन करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले होते. परंतु, आज अखेर यांचे पुनर्वसन झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सातारा-कोरेगाव हा रस्ता चौपदीकरण करण्याची मध्यंतरी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्यात आली होती. यामध्ये फळ, वडापाव, चायनीज आदी हातगाडेधारकांचा समावेश आहे. त्यावेळी त्यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु पुनर्वसन न झाल्याने मिळेल त्या जागी हातगाड्या टाकून व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू ठेवला. त्यापैकी बहुतांशी व्यावसायिक जिल्हा परिषदेच्या चौकाला पसंती दिली. याठिकाणी शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडापाव, ज्यूस, फ्रुट विक्रेते, चायनिज अन्य हातगाड्यांचे अतिक्रमण होत गेले. अनेकांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी मागणीही केली होती. परंतु व्यावसायिकांच्या एकीने पर्याय जागा देणाऱ्याचा आग्रह धरला. पालकमंत्र्यांचा दौरा असून, चौकातील अतिक्रमण काही दिवसांसाठी काढा असे सांगून या चौकातील सर्व विक्रेते अतिक्रमण पालिकेने काढले आहे. सतत व्यवसायाची जागा बदलत असल्याने व्यावसायिकांना नुकसान होत आहे. पालिकेने पर्यायी जागा घ्यावा किंवा आम्हा सर्वांत पुनर्वसन करा. अशी मागणी आता येथील व्यावसायिकांतून होत आहे. अतिक्रमण काढल्याने अनेक मागण्या येथील फुटपाथवर अस्ताव्यस्त पडल्या असून, आज ना उद्या जागा मिळेल या अपेक्षेने व्यावसायिक हातगाड्यावरच बसून वाट पाहत आहेत. (प्रतिनिधी)व्यावसायिकांना पर्यायी जागा हवीय...सातारा-कोरेगाव रस्त्यावर पालिकेने आरक्षित केलेल्या काही जागा आहेत. सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढली आहेत. पालिकेने या जागा स्वच्छ करून रस्त्यावरील हातगाडीधारकांचे पुर्नवसन येथे केले तर त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही आणि ग्राहकांनाही एकाच ठिकाणी सर्व मिळेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.रोजच्या दडपणाला आता कंटाळलोय!हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना कायमची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे. ‘रोजच्या या दडपणाला आता आम्ही कंटाळलोय, काहीही करा आणि आम्हाला एकच सुरक्षित जागा द्या’ अशी आर्जव या व्यावसायिकांनी ‘लोकमत’कडे केली आहे.