शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पालकमंत्री-आमदारांत जुगलबंदी!

By admin | Updated: January 12, 2016 00:31 IST

राष्ट्रवादी-काँगे्रसकडून निधीवर आक्षेप : २११ कोटींच्या नियोजन आराखड्याला मंजुरी

सातारा : जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत पालकमंत्री विजय शिवतारे व इतर सदस्य, आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक जुगलबंदी झाली. आराखड्यातील पालकमंत्र्यांच्या वाट्यावर विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शंभूराज देसाई यांच्यासह इतर आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. वादळी चर्चेनंतर जिल्ह्याच्या २११.१० कोटींच्या नियोजन आराखड्याला सोमवारी मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात प्रदीर्घ कालावधीनंतर नियोजन आराखडा मंजुरीची बैठक पार पडली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख उपस्थित होते.‘मागील वर्षीच्या १९८ कोटी इतक्या जिल्हा नियोजन आराखड्यात माझ्या प्रयत्नांमुळे ३० टक्के वाढ झाली,’ असे पालकमंत्री याही बैठकीत ठणकावून सांगत होते. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी, ‘पालकमंत्र्यांनी २११ कोटींच्या आराखड्यावर निधी मंजूर करून आणावा व त्याच्यावर वाटा सांगावा,’ असे स्पष्ट केले. त्यावर आ. शंभूराज देसाई यांनी ‘मागील आराखडा २५५ कोटींचा होता, त्यापेक्षा जास्त रकमेचा आराखडा पालकमंत्र्यांनी मंजूर करावा आणि त्यात आपला वाटा सांगावा,’ अशी सूचना केली. (पान ९ वर)‘जिल्ह्याच्या आराखड्यात वाढ होण्यासाठी मी शासन पातळीवर संघर्ष करतो. जिल्हा आराखडा मंजूर करताना माझ्यावर उपकार करताय का,’ असा प्रश्न विचारला. त्यावर आ. शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप नोंदवीत, ‘उपकाराची भाषा पालकमंत्र्यांनी करू नये, निधी मंजूर करण्यासाठी बाकीचे आमदारही प्रयत्न करीत असतात. पालकमंत्र्यांनी शंभर टक्के प्रयत्न करावेत, हवी तर सर्व सदस्यांची मदत घ्यावी,’असे सांगितले. आ. मकरंद पाटील व आ. जयकुमार गोरे यांनीही पालकमंत्री एकाच ठिकाणी जादा कामे टाकत असल्याचा आक्षेप नोंदविला. यावर ‘मी प्रशासकीय काम करू का? पालकमंत्री म्हणून मला काही अधिकार आहेत की नाही, तुमच्या हक्कांवर अतिक्रमण होणार नाही, याची मी शाश्वती देतो,’असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या आदल्या दिवशी रविवारी पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची व्यूव्हरचना राष्ट्रवादीने आखली होती. याबाबतचा कानमंत्र रामराजे व आ. शशिकांत शिंदे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारची सभा वादळी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या कानमंत्राचे स्पष्टीकरण सोमवारच्या सभेत आले. (प्रतिनिधी)विश्रामगृहावर गुफ्तगू!नियोजन समितीच्या बैठकीआधी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सोमवारी सकाळी साताऱ्यातील विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक सुरू असताना विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे व इतर दुसऱ्या दालनात बसले होते. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री स्वत: या दालनात येऊन रामराजे व शिंदेंशी चर्चा सुरू केली. ही चर्चा सुरू असतानाच आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले या दालनात दाखल झाले. या कमराबंद चर्चेत बऱ्याच विषयांवर जवळपास अर्धा तास गुफ्तगू झाले.