शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

विकास करा... पण वेळेत मोबदला द्या !

By admin | Updated: June 30, 2015 00:20 IST

मदत लालफितीत : शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यास विलंब; सहापदरीकरणाचे काम धिम्या गतीने

सातारा : शंभरपैकी जवळजवळ नव्वद खातेदारांचे म्हणणे असते की, विकास करा, रस्ता चांगला बांधा.. पण त्याचे चांगले पैसे आणि लवकर द्या, मात्र प्रशासनाच्या लालफिती कारभारामुळे लोकांपर्यंत हे पैसे पोहोचण्यास तसेच लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यास विलंब होत असल्यामुळे सहापरदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याचे बोलले जात आहे.ज्यांची जमीन सहापदीकरणामध्ये गेली आहे, अशा लोकांना जमिनीचा मोबदला देताना प्रत्येकाचा रेडीरेकनर त्या त्या गावाचा ठरलेला असतो. समजा एखाद्याचे शेत बिनशेती असेल तर त्याप्रमाणे त्याला पैसे दिले जातात. तर शेतीचे असेल तर शेतीप्रमाणे पैसे दिले जातात.नॅशनल हायवे अ‍ॅक्ट १९५६ नुसार पहिल्यांदा जर एखाद्या जमिनीमध्ये सर्व्हे करायचा असेल तर ३ सी प्रकाशित करावे लागते. त्याचे राजपत्र होतं. दिल्लीमधून आणि ते ३ सी प्रकाशित झाल्यानंतर मगच सर्व्हेसाठी परवागनी मिळते. हा सर्व्हे करताना कोणालाही बेकायदेशीररीत्या अडथळा करता येत नाही. म्हणजे एखादा म्हणू शकतो, माझ्या शेतात येऊन का मोजणी करताय, पण वास्तविक एका विभागाची मोजणी करायची असेल तर संपूर्ण गट मोजावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्याचे काहीच चालत नाही. प्रशासन दर ठरवेल तो दर घेऊन निमूटपणे स्वत:ची जमीन शासनाच्या स्वाधीन करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरत नसतो. पूर्वी महामार्गाचा विकास करताना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. परंतु ३ सी प्रकाशित केल्यामुळे शेतकऱ्याला अडथळा निर्माण करता येत नाही. त्यामुळे सध्या सहापदरीकरणाचे काम सोपे झाले असले तरी शेतकऱ्यांची मते जाणून घेऊनच काम पूर्णत्वास नेण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)झाडे तोडण्यासाठी दोन कोटी!सहापदरीकरणाचे काम रखडण्यामागे वनविभाग कारणीभूत असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या हद्दीतील झाडे तोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणे वनविभागाकडे तब्बल दोन कोटी रुपये भरले आहेत. असे असताना अद्याप वनविभागकडून कसलीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत देण्यात आलेली मुदत वाढवून घेतल्याशिवाय प्रशासनापुढे गत्यंतर नाही.‘शिवराज’ उड्डाणपुलाचे काम आठ दिवसांत मार्गी लावणारमहामार्ग अधिकाऱ्यांचे शिंदे यांना आश्वासनसातारा : संभाजीनगर ग्रामस्थ व हायवे शेजारच्या सर्व नागरिकांच्या संदर्भात महत्त्वाच्या असलेल्या ‘शिवराज भुयारी मार्ग’चा विषय लवकर मार्गी लागणार असून, येत्या आठ दिवसांत काम सुरू करण्याच्या सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तांत्रिक अडचणींमुळे व काही प्रशासकीय आदेश यामुळे येथील हा विषय लांबणीवर पडला होता; पण सर्व तांत्रिक बाबी आता पूर्ण झाल्या असून, लवकर हे काम सुरू होणार आहे.या संदर्भात येथील नागरिकांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना सर्व माहिती दिली. येथे घडणारे अपघात, वाहतूक गर्दी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ व नागरिक यांना करावे लागणारे क्रॉसिंग हे सर्व विषय महत्त्वाचे आहेत. हायवे अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत काम सुरू होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे संभाजीनगर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी भुयारी मार्गाच्या कामासाठी प्रशासकीय पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांना निवेदन दिले.यावेळी प्रवीण शिंगटे, जगदीश महाजन, विद्याधर थोरात, सुजीत चावरे, सागर तरडे, अक्षयकुमार पाटील, हर्षल जगदाळे, सत्यजित चावरे, पै. संतोष बाबर, बापू पाटील, संजय क्षीरसागर, नीलेश कुलकर्णी, गोरख नलावडे, मल्लकमीर काका, ग्रामपंचायत सदस्य, अनिल खराडे, डॉ. पोळ, राजन भिंताडे व संभाजीनगरमधील ग्रामस्थ व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)