शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

उसाला एफआरपी अन् दुधाला दरवाढ द्या!

By admin | Updated: May 22, 2015 00:17 IST

कऱ्हाडात स्वाभिमानीचा ठिय्या : ‘कुमुदा-रयत’वर कारवाईची मागणी, मनोज घोरपडेंच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक

कऱ्हाड : शासन निर्णयाप्रमाणे १४ दिवसांच्या आत ऊसदर देणे बंधनकारक असताना, कोल्हापूर जिल्हा सोडला तर इतर कोणत्याही साखर कारखान्याने ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर दिलेला नाही. तसेच रयत-कुमुदा साखर कारखान्याने उसाची १५ जानेवारीनंतर बिले शेतकऱ्यांना अदा केलेली नाहीत. त्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी. ‘एफआरपी’प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, तसेच दुधाला दरवाढ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवारी कऱ्हाडात ठिय्या आंदोलन केले.येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमा होऊ लागले. ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाचा बापाचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो,’ आदी घोषणांनी परिसर दूमदुमून टाकला. कार्यकर्त्यांनी तेथे सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. त्यात मनोज घोरपेडेंसह देवानंद पाटील, सचिन नलवडे, अंजनकुमार घाडगे, धनाजी शिंदे, विकास पाटील, रोहित माने, बापूसाहेब साळुंखे, अमर कदम, राजेंद्र पाटील, संदीप पवार, कृष्णत क्षीरसागर, अमित शिंदे, जितेंद्र घोरपडे, प्रशांत कणसे, अविनाश घोरपडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.दरम्यान, नायब तहसीलदार ज्ञानदेव डुबल यांच्याकडे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर न देणाऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर लवकरात लवकर मिळावा, गायीच्या दुधाला २५ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये लिटरप्रमाणे भाव मिळावा, शासकीय नियमांप्रमाणे दर न देणाऱ्या खासगी व सहकारी दूध संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.(प्रतिनिधी)एकीकडे अर्ज तर दुसरीकडे निवेदनयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे तहसील कार्यालय आवारात स्वाभिमानी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी ऊसदराबाबत निवेदन देण्यासाठी आले असता. त्याठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच अग्रेसर असते. उसाला ‘एफआरपी’प्रमाणे दर व दुधाला दरवाढ मिळणे आज अत्यंत गरजेचे बनले आहे. मात्र, याकडे संबंधितांकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या मागणीची लवकरात लवकर दखल न घेतल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत.-मनोज घोरपडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते