शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उसाला एफआरपी अन् दुधाला दरवाढ द्या!

By admin | Updated: May 22, 2015 00:17 IST

कऱ्हाडात स्वाभिमानीचा ठिय्या : ‘कुमुदा-रयत’वर कारवाईची मागणी, मनोज घोरपडेंच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक

कऱ्हाड : शासन निर्णयाप्रमाणे १४ दिवसांच्या आत ऊसदर देणे बंधनकारक असताना, कोल्हापूर जिल्हा सोडला तर इतर कोणत्याही साखर कारखान्याने ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर दिलेला नाही. तसेच रयत-कुमुदा साखर कारखान्याने उसाची १५ जानेवारीनंतर बिले शेतकऱ्यांना अदा केलेली नाहीत. त्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी. ‘एफआरपी’प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, तसेच दुधाला दरवाढ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवारी कऱ्हाडात ठिय्या आंदोलन केले.येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमा होऊ लागले. ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाचा बापाचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो,’ आदी घोषणांनी परिसर दूमदुमून टाकला. कार्यकर्त्यांनी तेथे सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. त्यात मनोज घोरपेडेंसह देवानंद पाटील, सचिन नलवडे, अंजनकुमार घाडगे, धनाजी शिंदे, विकास पाटील, रोहित माने, बापूसाहेब साळुंखे, अमर कदम, राजेंद्र पाटील, संदीप पवार, कृष्णत क्षीरसागर, अमित शिंदे, जितेंद्र घोरपडे, प्रशांत कणसे, अविनाश घोरपडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.दरम्यान, नायब तहसीलदार ज्ञानदेव डुबल यांच्याकडे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर न देणाऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर लवकरात लवकर मिळावा, गायीच्या दुधाला २५ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये लिटरप्रमाणे भाव मिळावा, शासकीय नियमांप्रमाणे दर न देणाऱ्या खासगी व सहकारी दूध संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.(प्रतिनिधी)एकीकडे अर्ज तर दुसरीकडे निवेदनयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे तहसील कार्यालय आवारात स्वाभिमानी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी ऊसदराबाबत निवेदन देण्यासाठी आले असता. त्याठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच अग्रेसर असते. उसाला ‘एफआरपी’प्रमाणे दर व दुधाला दरवाढ मिळणे आज अत्यंत गरजेचे बनले आहे. मात्र, याकडे संबंधितांकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या मागणीची लवकरात लवकर दखल न घेतल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत.-मनोज घोरपडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते