शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

उसाला एफआरपी अन् दुधाला दरवाढ द्या!

By admin | Updated: May 22, 2015 00:17 IST

कऱ्हाडात स्वाभिमानीचा ठिय्या : ‘कुमुदा-रयत’वर कारवाईची मागणी, मनोज घोरपडेंच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक

कऱ्हाड : शासन निर्णयाप्रमाणे १४ दिवसांच्या आत ऊसदर देणे बंधनकारक असताना, कोल्हापूर जिल्हा सोडला तर इतर कोणत्याही साखर कारखान्याने ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर दिलेला नाही. तसेच रयत-कुमुदा साखर कारखान्याने उसाची १५ जानेवारीनंतर बिले शेतकऱ्यांना अदा केलेली नाहीत. त्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी. ‘एफआरपी’प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, तसेच दुधाला दरवाढ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवारी कऱ्हाडात ठिय्या आंदोलन केले.येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमा होऊ लागले. ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाचा बापाचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो,’ आदी घोषणांनी परिसर दूमदुमून टाकला. कार्यकर्त्यांनी तेथे सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. त्यात मनोज घोरपेडेंसह देवानंद पाटील, सचिन नलवडे, अंजनकुमार घाडगे, धनाजी शिंदे, विकास पाटील, रोहित माने, बापूसाहेब साळुंखे, अमर कदम, राजेंद्र पाटील, संदीप पवार, कृष्णत क्षीरसागर, अमित शिंदे, जितेंद्र घोरपडे, प्रशांत कणसे, अविनाश घोरपडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.दरम्यान, नायब तहसीलदार ज्ञानदेव डुबल यांच्याकडे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर न देणाऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर लवकरात लवकर मिळावा, गायीच्या दुधाला २५ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये लिटरप्रमाणे भाव मिळावा, शासकीय नियमांप्रमाणे दर न देणाऱ्या खासगी व सहकारी दूध संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.(प्रतिनिधी)एकीकडे अर्ज तर दुसरीकडे निवेदनयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे तहसील कार्यालय आवारात स्वाभिमानी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी ऊसदराबाबत निवेदन देण्यासाठी आले असता. त्याठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच अग्रेसर असते. उसाला ‘एफआरपी’प्रमाणे दर व दुधाला दरवाढ मिळणे आज अत्यंत गरजेचे बनले आहे. मात्र, याकडे संबंधितांकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या मागणीची लवकरात लवकर दखल न घेतल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत.-मनोज घोरपडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते