शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

निंभोरे, सुरवडी परिसरातील भूजल पातळी टिकून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:54 IST

फलटण : यावर्षी प्रचंड प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे कधी नव्हे ते वडजल, निंभोरे, सुरवडी परिसरातील भूजल पातळी कमालीची टिकून ...

फलटण : यावर्षी प्रचंड प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे कधी नव्हे ते वडजल, निंभोरे, सुरवडी परिसरातील भूजल पातळी कमालीची टिकून आहे. गेल्या मान्सूनमध्ये झालेला चांगला पाऊस भूजल पातळी स्थिर राखण्यास कारणीभूत आहे. या परिसरातील विहिरींना आजही मुबलक पाणी आहे.

दरवर्षी हे चित्र खूपच विदारक होते. जानेवारीपासूनच भूजल पातळी घटण्यास सुरुवात होते. मार्च, एप्रिल, मेमध्ये तर कूपनलिका कोरड्या पडत असत. भूजल पातळी कमालीची खालावली जाऊन अनेक कूपनलिका बंद पडल्या होत्या. विहिरींनी तळ गाठला होता. नांदलसारख्या गावासाठी टँकरही चालू होते.

यावर्षी मात्र चित्र पूर्णपणे वेगळे आहे. शेतात हिरवीगार पिकं डोलताना दिसत आहेत. गहू, मका, हरभरा पिकांची चांगली उगवण झालेली दिसते. दरवर्षी पिके चांगली येऊन पाणी पातळी कमी झाल्याने पिके सुकून जात. पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच चिंता दिसत असे. यंदा मात्र जमिनीतील पाण्याने शेतकऱ्यांची चिंता मिटवली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच भूजल पातळी जैसे थे आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये काय करायचे, ही चिंता मिटलेली दिसते.

फलटणच्या पश्चिम भागात नेहमीच शेतीच्या पाण्यासाठी ओरड होताना दिसते. नांदल, ढवळेवाडी, सुरवडी, निंभोरे, काशीदवाडी, वडजल या गावांना कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असे; परंतु ज्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते, त्याच पावसाने परिसरातील भूजल पातळी नैसर्गिकपणे टिकून आहे.

चौकट आणि कोट देणार आहे..

फोटो०१फलटण