शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लोकरी माव्यामुळे उसावर संकट

By admin | Updated: December 3, 2015 23:48 IST

कोपर्डे हवेली : संकट घालविण्यासाठी औषधांची फवारणी; शेतकरी हवालदिल

 कोपर्डे हवेली : साखरेचे उतरलेले भाव आणि साखर कारखान्यांकडून केली जाणारी पाण्याची टंचाई आदी कारणाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता हातातोंडाशी आलेल्या उसाच्या पिकावर लोकरी माव्याचे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर आलेले संकट घालविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्या जात आहे.इतर पिकांच्या तुलनेत हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड करतात. पण गेल्या दोन वर्षांपासून उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले असल्याने साखरेचे बाजार पेठेतील दर ढासळले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडूनही शेतकऱ्यांना उसाचे बिल देता आलेले नाही. केंद्र आणि राज्य शासनाकडून कारखाने मदत मागत आहेत. ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांकडून अनेकवेळा राज्यामध्ये आंदोलने झाली आहेत. एकीकडे बऱ्याच कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे उसास दर दिलेला नाही. अशा परिस्थितीत दुसरीकडे ऊस उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने ऊस शेती तोट्यात येत आहे. याबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये कधी अवकाळीपाऊस तर कधी दुष्काळ, प्रतिकूल हवामान आदी कारणाने उसाच्या वजनावर त्याचा परिणाम होत आहे. गतवर्षामध्ये जून ते आॅगस्ट या महिन्यांमध्ये झालेल्या आडसाली लागणीच्या उसावर लोकरी माव्याचा प्रादूर्भाव झाला आहे. लोकरी माव्याच्या प्रादुर्भावास सुरुवात झाली असल्याने तो लवकर अटोक्यात आणण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधांच्या फवारण्या घेत आहेत. लोकरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे उसाचे वजन घटत असते. शिवाय त्याची वाढ पूर्ण क्षमतेने होत नाही. उसाच्या पानातील रस किडे शोषून घेतात. पाने पांढरी होऊन काळपट होतात. ढगाळ वातावरणामध्ये लोकरी माव्याचा प्रादूर्भाव लवकर होताना दिसून येतो. तर पावसामुळे हा मावा धुतला जातो. उसावर लोकरी माव्याचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन घटून शेतीचे नुकसान होत आहे. (वार्ताहर) पाऊस कमी अन् लोकरी माव्याचे संकटयावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे उसाचे टनेज गत वर्षाच्या तुलनेत भरत नाही. शिवाय भविष्यात पाणी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. त्यामध्ये लोकरी माव्याचे संकट आदी कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत उसाला दर मिळत नाही. अशा परिस्थितीत उसावर आलेले लोकरी माव्याचे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असे आहे.- अरुण चव्हाण, ऊस उत्पादक शेतकरी, कोपर्डे हवेली