शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

चकचकीत रस्त्यावरही ‘छान-छान खड्डे’

By admin | Updated: May 14, 2015 00:29 IST

माची पेठेजवळील स्थिती : पाण्याचे व्हॉल्व्ह उघड्या अवस्थेत; खड्ड्यामुळे पादचाऱ्यांपुढेही संकट

सातारा : माचीपेठेतून शनिवार पेठेकडे येणाऱ्या मार्गावर पालिकेच्या वतीने डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, या उतारावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही ठिकाणी पाण्याचे व्हॉल्व्ह उघड्या अवस्थेत आहे. या व्हॉल्व्हमुळे रस्त्यात सुमारे एक फूट लांबीचे खड्डे पडले असून, नवीन डांबरीकरणाने हे खड्डे अधिकच खोल झाले आहे. रात्रीच्या वेळी हे खड्डे नजरेस पडत नसल्याने दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना वाढत चालल्या आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या वतीने डांबरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, माची पेठेतूून शनिवार पेठेकडे येणाऱ्या तीव्र उतारावर असणारे खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांमध्ये पाण्याचे व्हॉल्व्ह आहे. हे व्हॉल्व्ह नेहमी सुरू केले जातात. यानंतरच परिसरात पाणीपुरवठा होतो.तीव्र उतार असल्यामुळे काही वाहनधारकांच्या रस्त्यात असणारे हे खड्डे नजरेस पडत नाही. त्यामुळे अनेकदा दुचाकी या खड्ड्यांमध्ये आदळते. काही वेळेस नियंत्रण न राहिल्याने दुचाकीस्वार घसरून जखमीही झाले आहेत. डांबरीकणापूर्वी या खड्ड्यांची उंची कमी होती. मात्र, नुकतेच डांबरीकरण करण्यात आल्याने या खड्ड्यांची उंची आणखीनच वाढली आहे. त्यामुळे दुचाकीधारकांबरोच या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी हे खड्डे नजरेस पडत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने या खड्ड्यांवर लोखंडी अच्छादन लावून वाहतुकीस येणारे अडथळे दूर करावे, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)रस्त्यात असणाऱ्या या खड्ड्यांमुळे वाहनधारकांबरोबरच नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. दिवसा धोका नाही मात्र रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांना जर हा खड्डा दिसला नाही, तर गंभीर इजा होवू शकते. त्यामुळे या खड्ड्याची लवकर डागडूजी करणे गरजेचे आहे.- अमोल बाबर, नागरिकअसाही तात्पुरता उपाययेथे असणाऱ्या एका खड्ड्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांकडून उपायोजना म्हणून दगडी टाकण्यात आली आहे. व्हॉल्व्ह सुरू करण्यापूर्वी ही दगडी काढली जातात व बंद करताना पुन्हा दगडी टाकून खड्डा बंदिस्त केला जातो. तात्पुरता उपाय करण्याऐवजी यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.माचीपेठेतून शनिवार पेठेत प्रवेश करतानाच तीव्र उतारावर तीन खड्डे आहेत. हे खड्डे रात्रीच्या वेळी नजरेस पडत नाही. त्यामुळे दुचाकी अचानक खड्ड्यात जाऊन आदळते. प्रशासनाने या खड्ड्यांवर अच्छादन टाकणे गरजेचे आहे. - आनंद शेंडे, वाहनचालक