शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धुराच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थ एकवटले !

By admin | Updated: November 27, 2014 00:10 IST

कारंडवाडी : कारखाना बंद करण्याचा इशारा साताऱ्याचा भोपाळ नको !

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमधील भीमेश्वर इस्तात कंपनीतून येणाऱ्या धुराविषयी प्रशासन व संबंधित कंपनीधारकाला कल्पना व निवेदन देऊन देखील याविषयी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. उलट याविषयी ग्रामस्थांना धमकावले जात असल्याने येथील कारंडवाडीच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा कारखाना बंद करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला दिली.मागील सहा महिन्यांपासून या कारखान्यातून काजळी, धूर स्वरूपात कार्बन बाहेर पडत आहे. कधी पांढरा धूर तर कधी काळा धूर या कंपनीतून बाहेर फेकला जात आहे. या धुरामुळे जवळपास पाच किलोमीटर अंतरावरील वस्तीला त्रास सोसावा लागत आहे. तर विहिरीचे पाणी काजळी पडून खराब होत आहे. तर जनावरांना लावण्यात आलेला कडबा व ऊस पिकावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. या कारखान्याविरोधात गावकरी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)धुरामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. पूर्वी एकराला ऊस पन्नास टन निघत होता. आता तीस टनापर्यंत आला आहे. तर ज्वारीच्या पिकावरही रोगराई होत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे, तर काही मोठी वृक्ष वटायला लागले आहेत.-संदीप काशीद (शेतकरी)कारखान्याचे पाणी ओढ्यात सोडल्याने गावातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक विहिरींतील पाणी काजळ पडून खराब झाले आहे, तर या विहिरीतील पाणी जनावरेही पीत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.- बजरंग देशमुख (कारंडवाडी, ग्रामस्थ)आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरया कारखान्यातील धूर हा कारंडवाडी, देगाव, महाडिक, वायकर, वनश्री कॉलनी, भाटवस्ती या भागात पसरत आहे. जवळपास या कारखान्याच्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत हा धूर त्रासदायक ठरत आहे.- संतोष साळुंखे (माजी सरपंच, कारंडवाडी)धुरामुळे पिकांचे नुकसान होत आहे. उसावर काजळी पडल्याने उसाची उंची खुंटली आहे व वजनही भरत नाही. तर उसामध्ये आंतरपीक घेतलेले ज्वारीचे पीक हे खास करून जनावरांना कडबा म्हणून वापरला जातो; परंतु या काजळीमुळे जनावरे कडबाही खात नाहीत. त्यामुळे आमचे उत्पन्न घटले आहे.- आनंदराव साळुंखे (शेतकरी)कारखान्याचा धूर आणि ओढ्यात सोडलेले पाणी यामुळे आरोग्याचा त्रास जाणवत आहे. ओढ्याच्या पाण्यामुळे विहिरीचे पाणीही दूषित झाले आहे. धुरामुळे रस्ताच दिसत नाही. पावसाळ्यात कारखान्याने ओढ्याचे पाणी आडविल्याने अनेक वावरे वाहून गेली, तर रस्ताही खराब झाला आहे.-सुधीर साळुंखे (देगाव ग्रामस्थ)