शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

कठड्यांच्या जागी वाळूची पोती...

By admin | Updated: February 19, 2015 23:48 IST

सुरक्षा रामभरोसे : खंबाटकीजवळील ‘एस’ वळण ठरतेय वाहतुकीस धोकादायक

खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर इंग्रजी एस आकाराच्या तीव्र वळणावर वारंवार अपघात होत असतात. आजपर्यंत अनेक अपघातांत शेकडो प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, या वळणावर आज तागायत कोणतेही संरक्षक कठडे उभारण्यात आलेले नाहीत. केवळ वळणावरील रस्त्याच्या दुतर्फा वाळूची पोती ठेवून दिशा दाखविण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणचा प्रवास अद्यापही धोकादायकच आहे. हायवे प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे खंबाटकीचा हा डेंजरझोन प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे.खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर घाटाला तीव्र वळण आहे. पुढे ‘एस’ आकाराचे वळण नवीन वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. उतारावरून येणारी वाहने वेगाने धावत असतात. साहजिकच वळणावर कधी-कधी वाहनावरील ताबा सुटून अपघात होत असतात. एखादा मोठा अपघात घडल्यावरच ‘न्हाय’च्या अधिकाऱ्यांचे व रस्त्याच्या ठेकेदारांचे डोळे उघडतात. तात्पुरती उपाययोजना केली जाते. मात्र, त्यानंतर मागचेच दिवस पुढे असतात. प्रवाशांच्या जीविताशी टांगती तलवार बनणारा हा खेळ थांबणार कसा, हाच एकमेव प्रश्न आहे. याकडे ना प्रशासन लक्ष देते ना ठेकेदार!याच ‘एस’ आकाराच्या वळणावर आजपर्यंत जीपचा अपघातात नऊ जण, गुजरातमधील खासगी बसच्या अपघातात ११ जण, कारच्या अपघातात तीन जण, मोटारसायकल एक जण तसेच दोन महिन्यांपूर्वी ट्रक अपघातात दोन जण, कंटेनरच्या अपघातात दोघींना प्राण गमवावे लागले आहे. याशिवाय शेकडो प्रवासी जखमी होऊन कायमचे अपंगत्व झाले आहे. वास्तविक या वळणावरील अशास्त्रीय धोका नाहीसा करून संरक्षक यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. वास्तविक धोम-बलकवडीचा कॅनॉल पार केल्यानंतर वाहनांचा वेग कमी करण्यासंदर्भात उपाययोजना खूप महत्त्वाची आहे. यावर जर तोडगा निघाला तर अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)प्राथमिक बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्षमध्यंतरी ट्रकच्या अपघातानंतर या वळणावर केवळ रबर रिफ्लेक्टर स्ट्रीप बसविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे अपघात रोखण्यास कोणतीही मदत होत नाही. त्यामुळे ही यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. वास्तविक ‘एस’ वळणाच्या दोन्ही बाजूंने संरक्षक कठडे उभारले गेले पाहिजेत. शिवाय या वळणावरील छोट्या पुलालाही कठडे नाहीत. याच पुलाखाली बस पलटी झाली होती. याही ठिकाणी कठडे बांधणे आवश्यक आहे. मात्र, या प्राथमिक बाबींकडे हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. एखादा अपघात घडल्यानंतर सुधारणा करण्यापेक्षा त्यापूर्वीच काळजी घेऊन उपयुक्त सुविधा करण्यात आल्या तर नाहक जीव तरी वाचतील, अशी चर्चा प्रवाशांमधून होत असते.खंबाटकी बोगद्यानंतरचे धोके व एस वळणावरील अपुऱ्या सुविधा याबाबत नेहमी मागणी करण्यात आली. मात्र त्याची पूर्तता झाली नाही मात्र, आता सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापर्यंत या अडचणी मांडणार असून, त्यावर तातडीने उपाययोजनना करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. - प्रदीप माने, उपजिल्हा प्रमुख शिवसेना