शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

कठड्यांच्या जागी वाळूची पोती...

By admin | Updated: February 19, 2015 23:48 IST

सुरक्षा रामभरोसे : खंबाटकीजवळील ‘एस’ वळण ठरतेय वाहतुकीस धोकादायक

खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर इंग्रजी एस आकाराच्या तीव्र वळणावर वारंवार अपघात होत असतात. आजपर्यंत अनेक अपघातांत शेकडो प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, या वळणावर आज तागायत कोणतेही संरक्षक कठडे उभारण्यात आलेले नाहीत. केवळ वळणावरील रस्त्याच्या दुतर्फा वाळूची पोती ठेवून दिशा दाखविण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणचा प्रवास अद्यापही धोकादायकच आहे. हायवे प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे खंबाटकीचा हा डेंजरझोन प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे.खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर घाटाला तीव्र वळण आहे. पुढे ‘एस’ आकाराचे वळण नवीन वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. उतारावरून येणारी वाहने वेगाने धावत असतात. साहजिकच वळणावर कधी-कधी वाहनावरील ताबा सुटून अपघात होत असतात. एखादा मोठा अपघात घडल्यावरच ‘न्हाय’च्या अधिकाऱ्यांचे व रस्त्याच्या ठेकेदारांचे डोळे उघडतात. तात्पुरती उपाययोजना केली जाते. मात्र, त्यानंतर मागचेच दिवस पुढे असतात. प्रवाशांच्या जीविताशी टांगती तलवार बनणारा हा खेळ थांबणार कसा, हाच एकमेव प्रश्न आहे. याकडे ना प्रशासन लक्ष देते ना ठेकेदार!याच ‘एस’ आकाराच्या वळणावर आजपर्यंत जीपचा अपघातात नऊ जण, गुजरातमधील खासगी बसच्या अपघातात ११ जण, कारच्या अपघातात तीन जण, मोटारसायकल एक जण तसेच दोन महिन्यांपूर्वी ट्रक अपघातात दोन जण, कंटेनरच्या अपघातात दोघींना प्राण गमवावे लागले आहे. याशिवाय शेकडो प्रवासी जखमी होऊन कायमचे अपंगत्व झाले आहे. वास्तविक या वळणावरील अशास्त्रीय धोका नाहीसा करून संरक्षक यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. वास्तविक धोम-बलकवडीचा कॅनॉल पार केल्यानंतर वाहनांचा वेग कमी करण्यासंदर्भात उपाययोजना खूप महत्त्वाची आहे. यावर जर तोडगा निघाला तर अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)प्राथमिक बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्षमध्यंतरी ट्रकच्या अपघातानंतर या वळणावर केवळ रबर रिफ्लेक्टर स्ट्रीप बसविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे अपघात रोखण्यास कोणतीही मदत होत नाही. त्यामुळे ही यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. वास्तविक ‘एस’ वळणाच्या दोन्ही बाजूंने संरक्षक कठडे उभारले गेले पाहिजेत. शिवाय या वळणावरील छोट्या पुलालाही कठडे नाहीत. याच पुलाखाली बस पलटी झाली होती. याही ठिकाणी कठडे बांधणे आवश्यक आहे. मात्र, या प्राथमिक बाबींकडे हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. एखादा अपघात घडल्यानंतर सुधारणा करण्यापेक्षा त्यापूर्वीच काळजी घेऊन उपयुक्त सुविधा करण्यात आल्या तर नाहक जीव तरी वाचतील, अशी चर्चा प्रवाशांमधून होत असते.खंबाटकी बोगद्यानंतरचे धोके व एस वळणावरील अपुऱ्या सुविधा याबाबत नेहमी मागणी करण्यात आली. मात्र त्याची पूर्तता झाली नाही मात्र, आता सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापर्यंत या अडचणी मांडणार असून, त्यावर तातडीने उपाययोजनना करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. - प्रदीप माने, उपजिल्हा प्रमुख शिवसेना