शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांनी बांधला वनराई बंधारा

By admin | Updated: December 17, 2014 23:03 IST

पाण्याचा प्रश्न मार्गी : विभागात अन्य पाच ठिकाणी साकारले बंधारे

तळमावले : काळगाव आणि कुंंभारगाव ग्रामसेवकांनी हातात खोरे आणि टिकाव घेऊन एका दिवसात सुमारे तीनशे सिमेंट पोत्यांचा श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात वनराई बंधारे बांधण्यात यावेत, अशी सूचना सातारा येथे झालेल्या बैठकीत केली होती़ त्यानुसार पाटणचे गटविकास अधिकारी अरविंद पाटील यांनी हालचाली सुरू केल्या व काळगाव आणि कुंभारगाव विभागातील ग्रामसेवकांना याची कल्पना दिली़ या कल्पनेला ग्रामसेवकांनी तत्काळ होकार देऊन बंधारा बांधण्याचे नियोजन केले आणि चिखलेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात माटेकर जवळील ओढ्यावर बंधारा बांधण्याचे ठरविले. त्यानुसार विभागातील सर्व ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी एकत्र येऊन ओढ्यातील वाळू, दगड एकत्र करून सुमारे तीनशे पोती भरली व एकावर एक रचून पाच तासांमध्ये वनराई बंधारा बांधला़ एवढेच नव्हे तर या बंधाऱ्यातून पाणी गळती होऊ नये, यासाठी उपाययोजनाही आखल्या़ विभागातील ग्रामसेवकांनी श्रमदानातून बांधलेल्या या बंधाऱ्यांमुळे या ठिकाणी पाणीसाठा झाला आह़े़ त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटण्यास मदत होणार आहे़ (वार्ताहर)