शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

लोकसभा, विधानसभा इतकीच ग्रामसभा महत्त्वाची

By admin | Updated: April 26, 2016 00:27 IST

पंकजा मुंडे : ‘ग्राम उदय से भारत उदय’ अंतर्गत विशेष ग्रामसभा उत्साहात

दहिवडी : ‘लोकसभा आणि विधानसभा इतकीच ग्रामसभा महत्त्वाची असून, सलग चार वेळा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या लोधवडेचा आदर्श अन्य गावांनीही घ्यावा,’ असे आवाहन ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.माण तालुक्यातील लोधवडे येथे ‘ग्राम उदय से भारत उदय’ अंतर्गत तेथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री मुंडे बोलत होत्या. या ग्रामसभेला जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जावेद शेख, कार्यकारी अभियंता दिलीप पालवे, गटविकास अधिकारी सीमा जगताप, सरपंच अर्पणा नष्टे, उपसरपंच मंदाकिनी कदम, सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, ‘ग्रामसभेला लोकशाहीमध्ये फार महत्त्व आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्या लोधवडे गावात बागायती शेती होत आहे, ही बाब अन्य गावांना प्रेरणा देणारी आहे. सगळ्या निवडणुकीत ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वात अवघड असते. सलग चारवेळा लोधवडे गावाने बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही हा आदर्श घेऊन आपल्या गावाचा विकास करावा. ’गावे जलयुक्त करण्यासाठी सर्व गावांनी सहभाग द्यावा, असे आवाहन सचिव देशमुख यांनी यावेळी केले. सभेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर गटविकास अधिकारी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर दादासो चोपडे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय पंचायत राज दिनाची शपथ दिली. तसेच सभेचे विषयवाचन केले. यावेळी सुकन्या योजनेंतर्गत मुलींच्या नावे १ हजार रुपयांच्या मुदत ठेव पत्राचे वाटप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रामसभेत राष्ट्रीय पंचातय राज दिनावेळी घ्यावयाची शपथ, राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त ग्रामसभेमध्ये शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीचे वाचन, राष्ट्रीय पंचायत दिनाचे महत्त्व आणि ७३ व्या घटनादुरुस्तीने पंचायत संस्थांमध्ये झालेले बदल, १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधींच्या खर्चाचे नियोजन ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणे, स्त्री भ्रूणहत्या, कुपोषण निर्मूलन, महिलांचा सहभाग, ग्रामविकासामध्ये योगदान, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी व अन्य विकास योजनांची अंमलबजावणी सन २०१६-२०१७ साठी पाणी व पीक पद्धती ठरविणे आदी विषयांवर चर्चा करून मंजूर करण्यात आले.या ग्रामसभेला ग्रामविकास अधिकारी नरेंद्र जगदाळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)