शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

साथ उद्रेक होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात : विनय गौडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जलजन्य आजारांचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा करताना टाकी स्वच्छता, पाणी ...

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जलजन्य आजारांचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा करताना टाकी स्वच्छता, पाणी शुद्धीकरण करून इतर उपाययोजनाही राबवाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गौडा यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यात २०२१मध्ये जलजन्य आजारांच्या साथीचा उद्रेक झाला आहे. याविषयीची माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की, हा उद्रेक मुख्य जलवाहिनीला गळती, खासगी नळ कनेक्शन गळती, तुंबलेली गटारे आणि गटारातून जलवाहिनी जाणे तसेच टाकी व विहिरीची अस्वच्छता, पाण्याचे शुद्धीकरण न होणे यामुळे झालेला आहे. गतवर्षाची तुलना करता २०२१मध्ये सुरुवातीपासूनच जलजन्य आजाराच्या साथीचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढे अशी स्थिती राहिल्यास पुढील नऊ महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात साथ उद्रेक होण्याची भीती आहे. पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना तत्काळ राबवाव्यात. त्यामुळे संभाव्य धोका टळण्यास मदत होईल.

ग्रामपंचायतींमार्फत दैनंदिन पाणीपुरवठा हा नियमित शुद्धीकरण करूनच व पुरेशा प्रमाणात करावा. पाणी उद्भव व पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात ५० फुटापर्यंत शौचालय, जनावराचा गोठा तसेच सांडपाण्याचा निचरा असता कामा नये. पाणी उद्भवाशेजारी पाणी साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कपडे आणि जनावरे धुणे टाळणे गरजेचे आहे. नळ योजनेला कोठेही गळती असता कामा नये. याबाबत वारंवार पाहणी करावी. शुद्धीकरणानंतर अर्ध्या तासाने पाण्याचे वितरण करावे. शुद्धीकरणानंतर पाण्याची गुणवत्ता (ओटी टेस्ट) टाकीजवळ, प्रत्येक एंड पाईपच्या ठिकाणी असणाऱ्या शेवटच्या नळाची घेऊन त्याची नोंद ठेवावी. तीन महिने पुरेल एवढा टीसीएल साठा करून ठेवावा. तीन महिन्यांतून एकदा सार्वजनिक हातपंपांचे शुद्धीकरण करावे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे उद्भवाचे नमुने तीन महिन्यांतून एकदा तपासणीसाठी पाठवावेत. यासाठी ग्रामपंचायतींनी स्पीकरद्वारे लोकांमध्ये जागृती करावी, असेही गौडा यांनी सांगितले.

.........................................................................