शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

‘संग्राम’ योजनेची ग्रामपंचायतींना डोकेदुखी

By admin | Updated: July 31, 2014 23:27 IST

अपुरी यंत्रणा : डोंगरपठारावरील गावांची गैरसोय

ढेबेवाडी : राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींच्या आधुनिकीकरणासाठी करोडो रुपयांचा बोजा शासनाच्या तिजोरीवर टाकला़ पारदर्शकता आणि तातडीची सेवा हा शासनाचा या मागचा उद्देश असला, तरी सुद्धा अपुऱ्या यंत्रणेमुळे डोंगरपठारावरील ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम’ म्हणजे डोके दुखी बनली आहे़ यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयातच हातोहात मिळणाऱ्या दाखल्यांसाठी वीस किलोमीटरच्या पायपिटीसह दोन-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने शासनाने सोय केली की गैरसोय, असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे़ ग्रामविकासाच्या संकल्पनेत ग्रामपंचायत केंद्रबिंदू मानून राज्य शासनाने अलीकडे काही वर्षांत आमूलाग्र बदल करत ग्रामपंचायतींनाच जादा अधिकार देऊ केले आहेत़ ग्रामपंचायतींच्या कारभारात १ ते २७ नमुन्यांंना महत्त्व असूनही जन्म-मृत्यू, मिळकतीचे उतारे, विवाह नोंदी याच बाबींकडे प्रामुख्याने ‘अण्णासाहेब’ लक्ष देत होते़ इतर नमुन्यातील माहिती वर्षांनुवर्षे दुर्लक्षित केली जात असे़ शासनाने राज्यातील सुमारे २७ हजार ग्रामपंचायतींचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला़ प्रत्येक ग्रामपंचायत संगणकीकृत करून स्वतंत्र ‘संग्राम’ कक्षाची निर्मिती केली़ त्यासाठी संपूर्ण यंत्रणा आणि संगणक कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली़ राज्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेसच्या दिशेने चालू झाला आहे़ तर डोंगरपठारावरील ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम कक्ष’ निर्माण झाला़ संगणकतज्ज्ञ कर्मचारी मिळाला; पण याठिकाणी दूरध्वनी अथवा इतर कंपन्यांचे नेटवर्कच नसल्याने आॅनलाइन काम करायचं कसं ? असा प्रश्न पडला असून नेटवर्कअभावी संग्रामचे काम ठप्प आहे़ ग्रामपंचातींचा संपूर्ण कारभार आॅनलाइन करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा होऊ लागल्याने तर दुसरीकडे नेटवर्क नसल्याने मेटाकुटीस आलेल्या ग्रामसेवकांनी अखेर अन्य गावातून ‘संग्राम’चे कामकाज चालू केले आहे़ दरम्यान, यामुळे ग्रामस्थांची तर गैरसोय होतच आहे़, शिवाय संबंधित ग्रामसेवकांच्या खिशाला चाट लागत आहे़ (वार्ताहर)ग्रामपंचायत गावात, संग्राम कक्ष परगावात---ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावरील पळशी, पाणेरी, सातर, कारळे, कसणी आदी गावांत दूरध्वनी यंत्रणा अखंडित नसल्याने या गावांत ग्रामपंचायती असूनही संग्राम कक्ष ढेबेवाडी येथे सुरू करावा लागल्याने ग्रामस्थांची अडचण तर ग्रामसेवकांचा लोढणा झाला आहे़ ----या विभागात कायमस्वरूपी संपर्क यंत्रणा कार्यान्वित व्हावी, जनतेची अडचण दूर व्हावी, यासाठी दूरसंचार विभागाकडे येथील मध्यवर्ती ठिकाणी टॉवर उभारावा, अशी अनेकदा मागणी केली़ त्यासाठी अपेक्षित जागा देण्याचीही व्यवस्था स्वत: केली आहे़; पण दूरसंचार विभाग दखल घेत नाही़ -हणमंतराव साळुंखे