शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

‘संग्राम’ योजनेची ग्रामपंचायतींना डोकेदुखी

By admin | Updated: July 31, 2014 23:27 IST

अपुरी यंत्रणा : डोंगरपठारावरील गावांची गैरसोय

ढेबेवाडी : राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींच्या आधुनिकीकरणासाठी करोडो रुपयांचा बोजा शासनाच्या तिजोरीवर टाकला़ पारदर्शकता आणि तातडीची सेवा हा शासनाचा या मागचा उद्देश असला, तरी सुद्धा अपुऱ्या यंत्रणेमुळे डोंगरपठारावरील ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम’ म्हणजे डोके दुखी बनली आहे़ यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयातच हातोहात मिळणाऱ्या दाखल्यांसाठी वीस किलोमीटरच्या पायपिटीसह दोन-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने शासनाने सोय केली की गैरसोय, असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे़ ग्रामविकासाच्या संकल्पनेत ग्रामपंचायत केंद्रबिंदू मानून राज्य शासनाने अलीकडे काही वर्षांत आमूलाग्र बदल करत ग्रामपंचायतींनाच जादा अधिकार देऊ केले आहेत़ ग्रामपंचायतींच्या कारभारात १ ते २७ नमुन्यांंना महत्त्व असूनही जन्म-मृत्यू, मिळकतीचे उतारे, विवाह नोंदी याच बाबींकडे प्रामुख्याने ‘अण्णासाहेब’ लक्ष देत होते़ इतर नमुन्यातील माहिती वर्षांनुवर्षे दुर्लक्षित केली जात असे़ शासनाने राज्यातील सुमारे २७ हजार ग्रामपंचायतींचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला़ प्रत्येक ग्रामपंचायत संगणकीकृत करून स्वतंत्र ‘संग्राम’ कक्षाची निर्मिती केली़ त्यासाठी संपूर्ण यंत्रणा आणि संगणक कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली़ राज्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेसच्या दिशेने चालू झाला आहे़ तर डोंगरपठारावरील ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम कक्ष’ निर्माण झाला़ संगणकतज्ज्ञ कर्मचारी मिळाला; पण याठिकाणी दूरध्वनी अथवा इतर कंपन्यांचे नेटवर्कच नसल्याने आॅनलाइन काम करायचं कसं ? असा प्रश्न पडला असून नेटवर्कअभावी संग्रामचे काम ठप्प आहे़ ग्रामपंचातींचा संपूर्ण कारभार आॅनलाइन करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा होऊ लागल्याने तर दुसरीकडे नेटवर्क नसल्याने मेटाकुटीस आलेल्या ग्रामसेवकांनी अखेर अन्य गावातून ‘संग्राम’चे कामकाज चालू केले आहे़ दरम्यान, यामुळे ग्रामस्थांची तर गैरसोय होतच आहे़, शिवाय संबंधित ग्रामसेवकांच्या खिशाला चाट लागत आहे़ (वार्ताहर)ग्रामपंचायत गावात, संग्राम कक्ष परगावात---ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावरील पळशी, पाणेरी, सातर, कारळे, कसणी आदी गावांत दूरध्वनी यंत्रणा अखंडित नसल्याने या गावांत ग्रामपंचायती असूनही संग्राम कक्ष ढेबेवाडी येथे सुरू करावा लागल्याने ग्रामस्थांची अडचण तर ग्रामसेवकांचा लोढणा झाला आहे़ ----या विभागात कायमस्वरूपी संपर्क यंत्रणा कार्यान्वित व्हावी, जनतेची अडचण दूर व्हावी, यासाठी दूरसंचार विभागाकडे येथील मध्यवर्ती ठिकाणी टॉवर उभारावा, अशी अनेकदा मागणी केली़ त्यासाठी अपेक्षित जागा देण्याचीही व्यवस्था स्वत: केली आहे़; पण दूरसंचार विभाग दखल घेत नाही़ -हणमंतराव साळुंखे