शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थकले!

By admin | Updated: November 28, 2015 00:11 IST

कर वसुली स्थगित : गावा-गावांत वाढल्या अडचणी; निर्णय लवकर घेण्याची मागणी

खटाव : गावातून विविध मार्गांने मिळणारा कर हा ग्रामपंचायतीचा आर्थिक कणा आहे. परंतु क्षेत्रफळावर आधारित या करवसुलीस उच्च न्यायालयाने दि. १ एप्रिलपासून स्थगिती दिल्यामुळे संपूर्ण राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. करआकारणी व वसुली न झाल्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत राब्रवल्या जाणाऱ्या नागरी सुविधा ठप्प होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पगाराचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. ऐन दिवाळीत बोनस तर सोडाच थकित पगारातील जेमतेम एखाद्या महिन्याचा पगार देतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. घर कराच्या फेरआकारणीची प्रक्रिया अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील घर करांची वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. या कारणामुळे सर्वच ग्रामपंचायती आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. आणि याचा परिणाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मानधनावर झाला आहे. आतापर्यत सर्वच ग्रामपंचायतींमध्ये क्षेत्रफळावर आधारित करआकारणी केली जात होती. याच्याविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत निर्णय देताना उच्च न्यायालयाने सध्याच्या करवसुलीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कर आकारणीचे स्वरूप निश्चित करण्यासाठी शासनाकडून अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने गावपातळीवरून शिफारशी मागवल्या आहेत. या शिफारशी आल्यानंतर त्याचा अभ्यास समिती करून याबाबत पुढील धोरण आखले जाणार आहे. आधीच ग्रामपंचायतींना मिळणारे उत्पन्न अल्प असते. या आलेल्या करातूनच वीजबिल भरणे महत्त्वाचे आहे. कर न आल्यास ते भरल्या नसल्याने विजेबरोबरच पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. विशेषत: ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे पगारही याच कर आकारणीतून केले जातात. आणि उच्च न्यायालयाच्या या करवसुली थांबवण्याच्या आदेशामुळे सर्वच व्यवहार ठप्प पडत आहेत. शासनाने उपाय काढण्याची मागणीशासनाने यावर योग्य तो पर्याय शोधून करवसुली सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत पातळीवर जोर धरू लागली आहे. चालू आर्थिक वर्षातील कर वसुली पूर्णपणे ठप्प पडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. दैनंदिन खर्च कसा भागवावा हा प्रश्न आता सर्वच ग्रामपंचायतीसमोर उभा राहिला आहे.