शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

जिल्ह्यात ग्रामपंचायत रणधुमाळीला सुरुवात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी दीडशेहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून, अर्ज माघारच्या शेवटच्या दिवशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी दीडशेहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून, अर्ज माघारच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटपही झाले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी दुरंगी आणि तिरंगी लढतीच पाहावयास मिळणार आहेत.

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनेक गावांत मनोमिलनाचे वारे होते. त्यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक पूर्णत: बिनविरोध पार पडली. तसेच अशंत: बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांची संख्याही दखल घेण्यासारखी आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये पाटण, माण, कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, वाई या तालुक्यात चुरशीची निवडणूक होईल. माण तालुक्यात ६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी माणमधील १४ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये मोही, मार्डी, लोधवडे, जाशी या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सध्या ३३५ जागांसाठी ७२२ जण रिंगणात राहिले आहेत. फलटण तालुक्यात ८० पैकी ६ ग्रामपंचातींची निवडणूक बिनविरोध पार पडली. आता ५७४ जागांसाठी १२७० जण लढणार आहेत. तर १३८ जणांची निवड बिनविरोध झालेली आहे.

खंडाळा तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे. त्यामधील ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, यामध्ये पळशी, कान्हवडी, घाडगेवाडी, लिंबाचीवाडी आदींचा समावेश आहे. सध्या ३२० जागांसाठी ७५७ जण रिंगणात आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. ४२ पैकी २८ गावांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सध्या ४५ जागांसाठी ९७ जण निवडणूक लढवित आहेत. पाटण तालुक्यात १०७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. १८ गावची निवडणूक बिनविरोध झाली असून ११४४ उमेदवार रिंगणात आहेत.

चौकट :

कऱ्हाडला १७ ग्रामपंचायती बिनविरोध...

कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यामधील १७ गावांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. १०२४ जागा निवडून द्यायच्या असून, २४६ सदस्य बिनविरोध निवडले आहेत. सध्या ७७८ जागांसाठी १६३२ जण निवडणूक रिंगणात आहेत. जावळी तालुक्यातील ७५ पैकी ३७ गावांची निवडणूक होत आहे. कोरेगावमध्ये ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामधील ७ बिनविरोध झाल्या आहेत. वाई तालुक्यात ७६ पैकी ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

................................... ...................